शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
टेस्टमधील खतरनाक स्पेल! स्टार्कनं १५ चेंडूत २ धावा खर्च करत साधला ५ विकेट्सचा विश्वविक्रमी डाव
5
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
6
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
7
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
8
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
9
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
10
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
11
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
12
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
13
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

ती रात्र आमच्यासाठी काळरात्रच ठरली...

By admin | Updated: July 28, 2016 03:40 IST

२८ जुलैला दिवसभर पाऊस पडत होता. रात्रीचे दहा वाजून गेल्याने काही मंडळी आपली कामे उरकत होती. काहीची जेवणाची तयारी सुरु होती. इतक्यात सव्वा दहाच्या सुमारास मोठ्ठा

- मुरलीधर भवार, डोंबिवली

२८ जुलैला दिवसभर पाऊस पडत होता. रात्रीचे दहा वाजून गेल्याने काही मंडळी आपली कामे उरकत होती. काहीची जेवणाची तयारी सुरु होती. इतक्यात सव्वा दहाच्या सुमारास मोठ्ठा आवाज झाला. सगळ््यांची धावपळ उडाली. मातृकृपा पडली... काही रहिवासी इमारतीखाली अडकले. ‘फायर ब्रिगेडला बोलवा,’ असा ओरडा सुरु झाला. ती रात्र आमच्यासाठी काळरात्र ठरली... वर्षभरापूर्वी पडलेल्या धोकादायक ‘मातृकृपा’ इमारतीमधील रहिवासी रवींद्र रेडीज सांगत होते. त्या दिवसाचे वर्णन करताना आजही त्याच्या काळजात धस्स होते. डोळ््यासमोर सगळा प्रसंग जसाच्या तसा उभा राहतो. या दुर्घटनेत रवींद्रला त्याची आई गमवावी लागली. दोन्ही भाऊ पोरके झाले... रवींद्र इस्टेट एजंटचे काम करतो. त्याचा भाऊ दीपक पानटपरीवर काम करतो. ते ‘मातृकृपा’तील भाडेकरु होते. त्यांची आई सुलोचना ७३ वर्षांची होती. उठताही येत नसल्याने अंथरूणाला खिळून होती. इमारत कोसळली तेव्हा ढिगाऱ्याखाली गाडली गेली. रवींद्र व त्यांचा भाऊ दीपक भाड्याच्या खोलीत राहतात. त्यांच्या राहण्याची पर्यायी व्यवस्था पालिकेने केली नाही. कारण तशी व्यवस्थाच पालिकेकडे नाही. राज्य सरकारने मदतीचे आश्वासन दिले. मृतांच्या कुटुंबीयांना पाच लाखांच्या मदतीची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली होती. पण तिची दखल सरकराने घेतली नाही. घटनास्थळी भेट देण्यासही मुख्यमंत्र्यांना वेळ मिळाला नाही. दुर्घटनेनंतर सात महिन्यांनी तहसीलदारांनी मृतांच्या कुटुंबीयांना लाखाचा धनादेश दिला. आर्थिक मदत कमी मिळाली. घरही मिळाले नाही. रेडीजना भाडे परवडत नाही. घटनेनंतर इमारतीचा मालक रामदास पाटील याला पोलिसांनी अटक केली. नंतर त्याची जामिनावर सुटकाही झाली. या घटनेत नऊ जणांचा मृत्यू झाला. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झालेला मालक पाटील याने भाडेकरुंना त्याची अनामत रक्कम परत केलेली नाही. कोसळण्यापूर्वीच त्याने ही इमारत एका बिल्डरला विकल्याची कुणकूण भाडेकरुंना लागली होती. पालिका आयुक्त ई. रवींद्रन यांनी पुनर्वसन करणे ही पालिकेची जबाबदारी नसल्याचे दुसऱ्याच दिवशी स्पष्ट केले. त्यामुळे आठवडाभर संक्रमण शिबिरात राहिलेल्या भाडेकरुंना स्वत:च पर्यायी व्यवस्था करावी लागली.या घटनेतून बचावलेले कुटुंबीय श्रीनिवास सावंत याच इमारतीत नऊ वर्षे पागडी पद्धतीने भाडेकरु होते. घटना घडली त्या रात्री ते कामावर गेले होते. या दुमजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला होता अर्धा भाग कोसळण्याच्या बेतात होता. त्यात त्यांची पत्नी श्रुती व मुलगा निनाद अडकले होते. इमारत पडल्याचे कळताच त्यांच्या पोटात भीतीचा गोळा आला. पण त्यांचे कुटुंबीय थोडक्यात बचावले. मालकाने त्यांची जवळपास दीड लाखाची अनामत रक्कम अद्याप दिलेली नाही.पुनर्वसन धोरणाचा घोळ : क्लस्टरमध्ये समूहविकास अपेक्षित आहे. पण एकेकट्या धोकादायक इमारतीबाबत सरकार-पालिकेकडे धोरणच नाही. इमारत दुरूस्ती आणि पुनर्ररचना मंडळ नाही. पुनर्विकासाची नियमावली नाही, हे गेल्या वर्षभरात पुन्हा स्पष्ट झाले. कोणतीच यंत्रणा याबाबत जलद गतीने काम करण्यास तयार नाही. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असल्यापासून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदी येईपर्यंत अनेकदा अधिवेशनातही हा विषय गाजला. पण सरकार निर्णय घेण्यास तयार नाही. आता क्लस्टरवर काम सुरू झाले आहे. इरादा जाहीर झाल्यावर इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट तयार होऊन नगरविकास खात्याच्या मंजुरीनंतर ती योजना प्रत्यक्षात येणार आहे. क्लस्टर पुरेसे नाही : चौधरी धोरण नसल्याने मदतीत अडचणी आल्या. धोकादायक इमारतीतील नागरिकांना बीएसयूपी योजनेत घरे देण्याची मागणी महासभेत केली. वर्षभरानंतर महापौर व आयुक्तांनी त्याचा विचार केला. तो लगेच व्हायला हवा होता, असे सांगून स्थानिक माजी नगरसेवक श्रीकर चौधरी म्हणाले, आता क्लस्टरचाअभ्यास पालिकेने सुरु केला असला, तरी सर्वांसाठी हा व्यवहार्य पर्याय नाही. भाडेकरु, मालक आणि बिल्डर यांचे समाधान होणार असेल तरच क्लस्टर कार्यान्वित होईल. पण एकट्यादुकट्या इमारतीसाठी त्याचा उपयोग नाही. पुनर्वसन योजना हवी : वेळासकरधोकादायक इमारतींच्या पुनर्वसनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. शहरातील ६५० पेक्षा जास्त धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनासाठी योजना लागू करण्याची मागणी त्यात करण्यात आली आहे. पण पालिका व राज्य सरकार डोळ््याला झापड लावून बसले आहे. क्लस्टर हा पूर्णपणे उपाय होऊ शकत नाही. क्लस्टरमध्ये भाडेकरुंचे हित जपले जाणार असेल तर त्याला आमचा विरोध नाही, अशी भूमिका भाकप माक्सवादी लेनिनवादी पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अरुण वेळासकर यांनी घेतली.भाडेकरूंचा हक्क राहावा : कदमभाडेकरुंचा घरावरील हक्क अबाधित राहील, असे लेखी आश्वासन महापालिकेने मालकांकडून घेतल्यास भाडेकरु धोकादायक इमारती सोडून पर्यायी ठिकाणी जातील. अन्यथा धोकादायक इमारतींचा प्रश्न सुटणे कठीण आहे, याकडे मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी लक्ष वेधले. क्लस्टर योजना बिल्डरधार्जिणी आहे. ती लागू करण्याऐवजी एसआरए किंवा राजीव गांधी आवास योजना लागू का करण्यात आली नाही, असा सवाल त्यांनी केला.