शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रावण सोमवारी दु:खाचा डोंगर; पाथरीत कावड यात्रेत कार घुसली, दोन भाविकांचा जागीच मृत्यू
2
इस्रायलने पत्रकारांच्या छावणीवर हल्ला केला; अल-जझीराचे पाच पत्रकार ठार, आयडीएफ म्हणतेय...
3
कोण म्हणतोय प्रेमात धोका... भारतीय सुधारले; २ वर्षांत १६% कमी झाले, नात्यात हे निवडू लागले...
4
सरकार बँक ऑफ महाराष्ट्र-LIC सह 'या' ५ बँकांमधील हिस्सा विकणार, गुंतवणूकदारांना काय फायदा?
5
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय कधी आहे? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, मान्यता
7
रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; पतीचा मृतदेह घेऊन जाणाऱ्या पत्नीचा दुर्दैवी अंत
8
भावाचा जीव वाचवण्यासाठी गेलेल्या बहिणीलाच मृत्यूने कवटाळलं; रक्षाबंधनच्या दिवशीच कुटुंबावर शोककळा
9
भयंकर! भाजपा नेत्याने पत्नीच्या हत्येचा कट रचला, काटा काढला, नंतर स्वत:वरच केला हल्ला, अखेर...
10
श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: धन-धान्य-ऐश्वर्य लाभेल, ‘हे’ उपाय अवश्य करा; गणपती शुभच करेल!
11
निम्म्यापेक्षाही अधिक घसरण, ५ दिवसांत ४०% नं घसरला हा मल्टिबॅगर शेअर; तुमच्याकडे आहे का?
12
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
13
फक्त १०,००० रुपये गुंतवून जमा होईल ३ कोटी रुपयांचा फंड! १०:१२:३० चा फॉर्म्युला असा करतो काम
14
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
15
Festival: तिथीवरून वर्षभराचे सण आणि महिने कसे लक्षात ठेवायचे ते शिका आणि मुलांनाही शिकवा!
16
पगारवाढीचा 'T' फॅक्टर! TOR म्हणजे काय? ज्याशिवाय ८ वा वेतन आयोग लागू होणार नाही, लगेच जाणून घ्या!
17
असित मोदींनी 'दयाबेन'सोबत साजरा केला रक्षाबंधनाचा सण, दिशा वकानीबद्दल म्हणाले...
18
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
19
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
20
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी

मुख्यमंत्र्यांच्या कोलांटीवर महापालिकेचे शिक्कामोर्तब

By admin | Updated: March 17, 2016 02:52 IST

कल्याण-डोंबिवली शहरे स्मार्ट करण्यासाठी ६,५०० कोटींचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान भाजपाच्या विकास परिषदेत

कल्याण : कल्याण-डोंबिवली शहरे स्मार्ट करण्यासाठी ६,५०० कोटींचा निधी देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका निवडणूक प्रचारादरम्यान भाजपाच्या विकास परिषदेत केली होती. नंतर, मात्र त्यांनी त्या निर्णयावर कोलांटउडी घेत ती माझी घोषणा नव्हती, तर तो पालिकेचाच आराखडा होता, अशी भूमिका घेतली. पालिकेने मात्र आपल्या अर्थसंकल्पात स्मार्ट सिटीसाठी अवघ्या २५० कोटींची तरतूद करत त्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या आणि मुख्यमंत्र्यांकडून स्मार्ट सिटीसाठी निधीच मिळालेला नाही, असे माहिती अधिकारात उघड करत या घोषणेतील फोलपणा उघड केला.हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी ती माझी घोषणा नव्हती, तर ते पालिकेचे नियोजन होते, असे सांगत सर्व जबाबदारी पालिकेवर ढकलली होती. त्यानंतर, माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांनी महापालिका प्रशासनाला मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या ६,५०० कोटींच्या निधीपैकी काही सरकारकडून प्राप्त झाला का, त्याचे नियोजन कसे असेल, अशी माहिती विचारली. त्यावर महापालिकेचे माहिती अधिकारी विनय कुलकर्णी यांनी सरकारकडून अद्याप कोणताही निधी प्राप्त झालेला नसल्याचे उत्तर दिले आहे.मुख्यमंत्र्यांनी निवडणुकीवेळी कल्याण-डोंबिवली स्मार्ट आणि सेफ सिटी करण्यासाठी भरीव निधी देण्याचे आश्वासन देत सहा हजार ५०० कोटींचा आराखडाच जाहीर केला होता. त्यांच्या घोेषणेमुळे निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. पण, तेव्हाही त्यांनी ते पालिकेचे स्मार्ट सिटीचे नियोजन असल्याचे स्पष्ट केल्याने आयोगाने मुख्यमंत्र्यांना क्लीन चिट दिली होती. नंतर, सभागृहातही त्यांनी स्मार्ट सिटीच्या घोषणेवर घूमजाव केल्याने विरोधकांनी टीका करत ती भाजपाची निवडणूक प्रचाराची खेळी असल्याचे म्हटले होते. त्यांच्या कोलांटउडीला माहिती अधिकाराच्या तपशिलाने दुजोरा दिला आहे. स्मार्ट सिटीचा आराखडा पालिकेने ज्या वेळी केंद्र सरकारला सादर केला, तेव्हाही तो ६,५०० कोटींचा नव्हता, तर १,४४५ कोटींचा होता. त्यामुळे त्याच वेळी स्मार्ट सिटीचे आश्वासन हा भाजपाचा निवडणूक प्रचाराचा भाग होता, अशी टीका विरोधी पक्षांनी केली होती. महापालिकेने स्मार्ट सिटीचा 1,445 कोटींचा प्रकल्प अहवाल सरकारला सादर केला. पण, पहिल्या यादीत कल्याण-डोंबिवलीचा समावेश झाला नाही. आता दुसऱ्या यादीची प्रतीक्षा महापालिकेसह राजकीय मंडळींना आहे. विशेषत: भाजपाच्या नेत्यांना दुसऱ्या यादीत कल्याण-डोंबिवलीचा समावेश स्मार्ट सिटीत नक्की होईल, असा विश्वास आहे. तोवर भाजपाचे सदस्य आणि स्थायी समितीचे सभापती संदीप गायकर यांनी मात्र स्मार्ट सिटीसाठी 250 कोटींची तरतूदही अर्थसंकल्पात केली आहे.