शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
3
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
4
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
5
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
6
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
7
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
8
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
9
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
10
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
11
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
12
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
13
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
14
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
15
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
16
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
17
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
18
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
19
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
20
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा

ठाण्यात घरी उपचार घेणारे रुग्ण अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठामपा हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याने रुग्णदुपटीचा कालावधी ४०० दिवसांवरून १८३ वर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : ठामपा हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याने रुग्णदुपटीचा कालावधी ४०० दिवसांवरून १८३ वर आला आहे. नवीन रुग्णांमध्ये घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. सध्या मनपा हद्दीत प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या दोन हजार ४८७ असून, त्यापैकी विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या एक हजार ११४, तर घरी उपचार घेणाऱ्यांची संख्या एक हजार १५३ एवढी आहे.

फेब्रुवारीअखेरपासून पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने ठामपाने शहरात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मनपाने खबरदारीचे उपाय आखण्यास सुरुवात केली आहे. मनपा हद्दीत आतापर्यंत ६५ हजार ५४४ रुग्ण आढळले असून, त्यातील ६१ हजार ७०६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर, एक हजार ३५१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, सध्या दोन हजार ४८७ रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार सुरू आहेत.

१ ते १२ मार्चदरम्यान शहरात नवीन दोन हजार ५३८ कोरोना रुग्ण सापडले आहेत. सध्या रोज २०० ते ३०० रुग्ण आढळत आहेत. आजही एखाद्याला कोरोनाची लागण झाली, तर त्याच्या संपर्कातील ४० ते ४२ जणांचा शोध घेतला जात असल्याचा दावा मनपाने केला आहे. दुसरीकडे रुग्ण वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ९७ टक्क्यांवरून ९४.१४ टक्क्यांवर घटले आहे. मृत्युदर हा २.०६ टक्के, तर रुग्णवाढीचा दर ५.५९ टक्क्यांवर आला आहे.

१४२ रुग्णांची प्रकृती चिंताजनक

- सध्या प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या दोन हजार ४८७ रुग्णांपैकी विविध कोरोना सेंटरमध्ये एक हजार ११४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, एक हजार १५३ रुग्ण हे घरीच उपचार घेत असल्याचा दावा पालिकेने केला आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांपेक्षा घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या काही प्रमाणात जास्त आहे.

- त्यातही काही प्रमाणात लक्षणे असलेले ९६५ रुग्ण आहेत. तर, लक्षणे नसलेल्यांची संख्या एक हजार ३८० एवढी आहे. १४२ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यातील १३५ जण आयसीयू, तर सात जण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती मनपाने दिली. त्यामुळे अधिक प्रमाणात न घाबरता नागरिकांना केवळ शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन मनपाने केले आहे.

---------