शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळीदरम्यानच करणार होते ब्लास्ट, पण...; दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात धक्कादायक खुलासा!
2
गुप्त दौरा... अन डील पक्की...! इस्रायल भारताला दोन शक्तिशाली क्षेपणास्त्रे देणार; पाकिस्तान, चीन सगळेच टप्प्यात...
3
Delhi Blast : "मला डिस्टर्ब करू नका, महत्त्वाचं काम करतोय..."; कुटुंबाशी अनेक महिने बोलायचा नाही उमर
4
गाड्या पुढे सरकल्या अन्....; दिल्ली कार स्फोटाचा 'तो' भीषण VIDEO पहिल्यांदाच समोर, CCTV पडले बंद
5
३० हजारांपेक्षा कमी आहे सॅलरी तरी, SIP द्वारे बनवू शकता १ कोटींचा फंड; महिन्याला किती करावी लागेल गुंतवणूक?
6
"सकाळी मुलीला शाळेत सोडायला गेली अन् पतीसह एकाने बंधक बनवले, मग..."; IAS पत्नीचा खळबळजनक दावा
7
Accident:पोलीस व्हॅनच्या धडकेत एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू, परिसरात हळहळ!
8
२३ नोव्हेंबरपर्यंत कोकण रेल्वेवर मेगा ब्लॉक; सेवांवर मोठा परिणाम, तुमचं तिकीट याच वेळेत आहे?
9
Samudra Shastra: नुसत्या हसण्यावरून स्वभाव ओळखता येतो? समुद्र शास्त्रात मिळते उत्तर
10
वनडे करिअर टिकवण्यासाठी हिटमॅन रोहित शर्माला BCCI ची 'ती' अट मान्य; विराट कोहलीचं काय?
11
Groww IPO Listing: केवळ ५% होता GMP, पण कंपनीची धमाकेदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी 'या' शेअरनं दिला २३% पेक्षा जास्त फायदा
12
Delhi Blast: दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी महत्त्वाची अपडेट, संशयितांना कार विकणारा डीलर ताब्यात!
13
Delhi Blast : २६ जानेवारी, दिवाळीला स्फोट करण्याचा होता प्लॅन, पण...; दिल्ली स्फोट प्रकरणात मुझम्मिलचा मोठा खुलासा
14
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात आणखी एक दहशतवादी डॉक्टर अटकेत; देशभरात छापेमारी सुरू...
15
निवृत्तीनंतरचे जीवन सुरक्षित! एकदाच गुंतवणूक करा आणि आयुष्यभर १ लाखाहून अधिक पेन्शन मिळवा
16
“महायुती विजयी झाली पाहिजे”; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांना सूचना
17
प्रसिद्ध अभिनेत्रीच्या मैत्रिणीचा दिल्ली स्फोटात मृत्यू, दु:ख व्यक्त करत म्हणाली, "इतका क्रूर..."
18
कोल्हापूर: बिबट्याच्या हल्ल्यात बैल ठार, गगनबावडा तालुक्यात भीतीचे वातावरण
19
पतीसोबत तलाक, मग बनली प्रोफेसर; 'जैश-ए-मोहम्मद'मध्ये महिलांच्या भर्तीची होती जबाबदारी! दहशतवादी डॉ. शाहीनची संपूर्ण कुंडली
20
AQIS: मुंब्रा येथील शिक्षकाच्या घरावर एटीएसचा छापा; पुण्यातील'अल-कायदा' प्रकरणाशी कनेक्शन

ठाण्यात घरी उपचार घेणारे रुग्ण अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2021 04:40 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठामपा हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याने रुग्णदुपटीचा कालावधी ४०० दिवसांवरून १८३ वर ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : ठामपा हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याने रुग्णदुपटीचा कालावधी ४०० दिवसांवरून १८३ वर आला आहे. नवीन रुग्णांमध्ये घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. सध्या मनपा हद्दीत प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या दोन हजार ४८७ असून, त्यापैकी विविध कोविड सेंटरमध्ये उपचार घेणाऱ्यांची संख्या एक हजार ११४, तर घरी उपचार घेणाऱ्यांची संख्या एक हजार १५३ एवढी आहे.

फेब्रुवारीअखेरपासून पुन्हा कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याने ठामपाने शहरात कोरोनाची दुसरी लाट आल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे मनपाने खबरदारीचे उपाय आखण्यास सुरुवात केली आहे. मनपा हद्दीत आतापर्यंत ६५ हजार ५४४ रुग्ण आढळले असून, त्यातील ६१ हजार ७०६ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. तर, एक हजार ३५१ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर, सध्या दोन हजार ४८७ रुग्णांवर प्रत्यक्ष उपचार सुरू आहेत.

१ ते १२ मार्चदरम्यान शहरात नवीन दोन हजार ५३८ कोरोना रुग्ण सापडले आहेत. सध्या रोज २०० ते ३०० रुग्ण आढळत आहेत. आजही एखाद्याला कोरोनाची लागण झाली, तर त्याच्या संपर्कातील ४० ते ४२ जणांचा शोध घेतला जात असल्याचा दावा मनपाने केला आहे. दुसरीकडे रुग्ण वाढत असताना रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही ९७ टक्क्यांवरून ९४.१४ टक्क्यांवर घटले आहे. मृत्युदर हा २.०६ टक्के, तर रुग्णवाढीचा दर ५.५९ टक्क्यांवर आला आहे.

१४२ रुग्णांची प्रकृती चिंताजनक

- सध्या प्रत्यक्ष उपचार घेणाऱ्या दोन हजार ४८७ रुग्णांपैकी विविध कोरोना सेंटरमध्ये एक हजार ११४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर, एक हजार १५३ रुग्ण हे घरीच उपचार घेत असल्याचा दावा पालिकेने केला आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचार घेणाऱ्यांपेक्षा घरी उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या काही प्रमाणात जास्त आहे.

- त्यातही काही प्रमाणात लक्षणे असलेले ९६५ रुग्ण आहेत. तर, लक्षणे नसलेल्यांची संख्या एक हजार ३८० एवढी आहे. १४२ रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्यातील १३५ जण आयसीयू, तर सात जण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती मनपाने दिली. त्यामुळे अधिक प्रमाणात न घाबरता नागरिकांना केवळ शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन मनपाने केले आहे.

---------