शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

मंडईची वास्तू पडूनच; रहिवाशांना घ्यावी लागते डोंबिवलीत धाव

By admin | Updated: August 21, 2015 02:17 IST

वाढत्या शहरीकरणात अल्पावधीतच ठाकुर्लीचा चेहरामोहरा बदलला. जेथे कधीकाळी जायलाही भयावह वाटायचे, त्या खंबाळपाडा परिसरात टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत

अनिकेत घमंडी, डोंबिवलीवाढत्या शहरीकरणात अल्पावधीतच ठाकुर्लीचा चेहरामोहरा बदलला. जेथे कधीकाळी जायलाही भयावह वाटायचे, त्या खंबाळपाडा परिसरात टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. केडीएमसी क्षेत्रातील एकमेव असा ९० फुटी रस्ता ही नव्याने ओळख असलेला हा वॉर्ड तुलनेने मोठाही आहे. नियोजनबद्ध इमारती-रस्ते या ठिकाणी तयार होत असतानाच मूलभूत गरजांसाठी मात्र या ठिकाणच्या नागरिकांना डोंबिवलीवरच अवलंबून राहावे लागत आहे. विशेष म्हणजे भाजी मंडईची प्रशस्त जागा असूनही केवळ महापालिकेच्या आडमुठ्या धोरणामुळे ती सुविधा मिळत नसल्याने महिलावर्गासह ज्येष्ठ नागरिकांची कुचंबणा होते.येथील मंगलकलश सोसायटीमध्ये मंडईसाठी महापालिकेची सुमारे १५०० स्क्वे. फूट ग्राउंड प्लस वन सुसज्ज जागा आहे. तेथे इमारतीचे काम पूर्ण झाले, नागरिक वास्तव्याला गेले, पाठोपाठ परिसरात टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या. त्यात २४ तास पाण्याची सुविधा, डांबरीकरणाचे चांगले रस्ते आदी असले तरीही भाजी, मच्छी, किराणा या जीवनावश्यक बाबींसाठी नागरिकांना अद्यापही डोंबिवली अथवा ठाकुर्ली रेल्वे स्थानक परिसरात १.५ ते २ किमी जावे लागते. वॉर्डाचा बहुतांशी भाग हा एमआयडीसी क्षेत्रालगत असल्याने प्रदूषणाचीही समस्या आहेच. अनेकदा संध्याकाळच्या वेळी या ठिकाणाहून प्रवास करणे नकोसे होते, तशा अवस्थेत वर्षानुवर्षे लोक येथे राहतात. खंबाळपाड्यातच परिवहनचा मोठा भूखंड आहे, मात्र तेथेही प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे बसेस उभ्या राहण्याऐवजी कचऱ्याच्या गाड्या उभ्या राहतात. असे असूनही या ठिकाणची कचरा निर्मूलनाची समस्या आहेच. लाखाच्या घरात असलेल्या वस्तीसाठी अवघे ६ सफाई कर्मचारी, तेही पूर्णपणे येत नाहीत. या ठिकाणी तीन स्मशानभूमी असून एक स्मशानभूमी अद्ययावत आहे, तर अन्य एका ठिकाणी २९ लाख खर्चून शोकसभागृह व १४ लाखांच्या लाद्या बसवण्यात येणार आहेत. सध्या तरी त्या ठिकाणी प्रचंड गैरसोय असून तो गर्दुले व तळीरामांचा अड्डा बनला आहे. तिसरी रस्त्यालगत असून त्याबाबतचा निर्णय प्रलंबित आहे. कृत्रिम तलाव असून या ठिकाणी बहुतांशी सार्वजनिक मंडळे, घरगुती गणपतींचे विसर्जन केले जाते.परिवहन सेवेचा लाभही येथील नागरिकांना मिळत नाही. येथूनच हाकेच्या अंतरावर पेंढरकर महाविद्यालय, मंजूनाथ कनिष्ठ महा., सावित्रीबाई फुले नाट्यमंदिर, क्रीडा संकुल, डोंबिवलीकरांचे भूषण असलेल्या कॅ. विनयकुमार सच्चान यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ असलेला शौर्यगाथा सांगणारा ‘रणगाडा’, घरडा सर्कलचे फाउंटन आदी महत्त्वाची, विरंगुळ्याची ठिकाणे आहेत. त्यामुळे येथे नागरिकांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर असते. मात्र, रात्री-अपरात्री नाटक सुटल्यावर बसची सुविधा नसल्याने रिक्षा, टॅक्सी वाहने शोधताना नागरिकांच्या नाकीनऊ येतात. त्यामुळे खंबाळ पाड्यातून ठाकुर्ली - डोंबिवलीसाठी मध्यरात्रीपर्यंत परिवहनची सुविधा असणे आवश्यक आहे.