शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
3
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
4
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
5
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
6
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
7
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
8
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
9
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
10
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
11
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
12
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
13
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
14
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  
15
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश
16
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
17
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
18
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
19
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
20
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!

लक्ष्मी मार्केटवर मॉल?

By admin | Updated: January 10, 2016 00:33 IST

रेल्वे स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आणि मोक्याचा भूखंड म्हणून गेली अनेक वर्षे चर्चेत असलेल्या लक्ष्मी मार्केटच्या जागी मॉल उभारण्याचा आणि तेथील किरकोळ

- मुरलीधर भवार,  कल्याणरेल्वे स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या आणि मोक्याचा भूखंड म्हणून गेली अनेक वर्षे चर्चेत असलेल्या लक्ष्मी मार्केटच्या जागी मॉल उभारण्याचा आणि तेथील किरकोळ व्यापाऱ्यांना तेथून हटवण्याच्या हालचाली सुरू असल्याचा आरोप व्यापाऱ्यांनी केला आहे. शहर स्मार्ट करण्याच्या नावाखाली ही जागा बळकावण्याचा घाट घातला जात असून आम्हालाच मालक करा आणि या मॉलमध्ये सामावून घ्या, अशी मागणी तेथील गाळेधारकांनी केली आहे. तसे न झाल्यास मॉलचा प्रयत्न हाणून पाडला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.कल्याण शहराची ओळख म्हणून सांगितल्या जाणाऱ्या प्रमुख ठिकाणांपैकी लक्ष्मी मार्केट एक. ७० वर्षे जुने असलेले हे भाजीपाला-फळ मार्केट हटविण्याचे प्रयत्न पालिकेकडून सुरू आहे. भरवस्तीत, स्टेशन परिसरात कचरा होतो, या कारणास्तव मार्केट हलवण्याच्या प्रक्रियेला वेग आला आहे. त्याला व्यापाऱ्यांचा विरोध असून येथे मॉल संस्कृती आणून मराठी व्यापारी कल्याणमधून हद्दपार करण्याचा घाट घातला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याविरोधात व्यापारी एकवटले आहेत. हे मार्केट हटविल्यास शहराची ओळख संपुष्टात येईल. तसेच हजारो कुटुंबांच्या रोजगारावर गदा येईल, याकडे व्यापाऱ्यांनी लक्ष वेधले आहे. शिवाजी चौक ते महम्मद अली चौक या रस्त्यालगत असलेली दुकाने हटविण्याची मोहीम महापालिकेने हाती घेतल्याने पुढच्या टप्प्यात भाजी मार्केटही जाईल, अशी भीती व्यापाऱ्यांत आहे. लक्ष्मी मार्केटमुळे कचरा होतो, कोंडी होते, असे कारण पुढे करून महापालिकेने व्यापाऱ्यांना नोटिसा बजावल्या होत्या. वास्तविक, महापालिकेच्या कचरा उचलणाऱ्या यंत्रणेकडून योग्य प्रकारे कचरा उचलला जात नाही, असा व्यापाऱ्यांचा आरोप आहे. जेथे बाजार आहे, तेथेच कचरा होतो. व्यापारी दोन ट्रक भरून स्वत: कचरा डम्पिंग ग्राउंडला नेत होते. पण, त्या ठिकाणी जास्त कचरा आणू नका, असे महापालिका अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे व्यापाऱ्यांची कोणाला अडचण नाही. आहे त्या ठिकाणीच व्यापार करण्याचा आमचा ठाम निर्धार आहे, अशी भूमिका व्यापाऱ्यांचे प्रतिनिधी मोहन नाईक यांनी घेतली. इतक्या वर्षांपासून आम्ही भाडे भरत आहोत. त्यामुळे कायद्यानुसार भाडेकरूच मालक झाला पाहिजे. लक्ष्मी मार्केटवर हमाल, व्यापारी, खरेदीदार, विक्रेते अशा जवळपास १० हजार लोकांचे पोटपाणी आहे. त्यात ७० टक्के मराठी माणूस आहे. मराठी माणसाला हद्दपार करून तेथे कोणी मॉल उभारण्याचा घाट घालणार असेल, तर तो प्रयत्न व्यापाऱ्यांकडून हाणून पाडला जाईल. आयुक्त स्मार्ट सिटी करण्यासाठी १० हजार व्यापाऱ्यांना बेरोजगार करणार आहेत का? शहरातील सगळ्याच मोक्याच्या जागा स्मार्ट सिटीसाठी तोडून नागरिकांना नेमक्या अशा काय सुविधा पुरविणार आहेत, असा सवाल नाईक यांनी उपस्थित केला आहे. अडते व्यापार संपला, आता उरला किरकोळ व्यवहारबाजार समितीचा कायदा अस्तित्वात आल्यावर माजी मुख्यमंत्री शरद पवार यांनी कल्याण बाजार समितीसाठी ४० एकरची जागा पत्रीपुलानजीक दिली. लक्ष्मी मार्केटमध्ये सेस वसूल करण्यासाठी आरक्षण टाकण्यात आले होते. आरक्षणाची अधिसूचना १९८२ साली काढण्यात आली. जोवर बाजार समितीची वास्तू तयार होत नाही, तोवर हे आरक्षण कायम राहील, असे सहकार आणि पणन खात्याकडून नमूद करण्यात आले. बाजार समितीची इमारत विकसित झालेली नसल्याने अडते व्यापार लक्ष्मी मार्केटमध्ये सुरू होता. २००९ साली बाजार समितीची इमारत विकसित झाली. त्यानंतर, लक्ष्मी मार्केटमधील अडते बाजार बाजार समितीच्या आवारात स्थलांतरित झाला. १९८२ साली टाकण्यात आलेले आरक्षण रद्द करण्याची अधिसूचना काढण्यात आली. अडते व्यापार स्थलांतरित झाल्याने सध्या लक्ष्मी मार्केटमध्ये केवळ किरकोळ व्यापार चालतो. व्यापारी बाजार समितीतून होलसेल दरात भाजीपाला व फळे खरेदी करून तो लक्ष्मी मार्केटमध्ये किरकोळ दरात विकतात. बाजार समितीचे तत्कालीन प्रशासक राजेश लव्हेकर यांनी हा निर्णय घेतला होता. इतिहास लक्ष्मी मार्केटचा!70वर्षांपूर्वी कबा कानजी शेठ या नावाने हे मार्केट ओळखले जात होते. त्यानंतर, गोविंद करसन मार्केट या नावाने भाडेकरू असलेल्या व्यापाऱ्यांना भाडेपावती दिली जात होती. त्यानंतर, हे मार्केट इराणी कंपनीला विकण्यात आले. आद्रेसर इराणी या नावाने भाडेपावती मिळू लागली. 1984साली ठाण्याचे तत्कालीन महापौर नईम खान यांच्या नावे भाडेपावती येऊ लागली. 2009सालानंतर लक्ष्मी मार्केट (सन इन्फ्रा) या नावाने भाडेपावती मिळू लागली. 70 वर्षांच्या कालखंडात मार्केटचे मालक बदलत राहिले. पण, भाडेकरू तेच राहिले. भाडेकरू व्यापाऱ्यांना भाड्याची पक्की पावती मिळत राहिली. व्यापाऱ्यांच्या चार पिढ्या या मार्केटमध्ये व्यापार करीत आहेत. साडेचार एकर जागेत हे मार्केट वसले आहे. त्यात पक्क्या भाडेकरूंची संख्या 650तर लहान-मोठ्या व्यापाऱ्यांची संख्या 200च्या घरात आहे. या मार्केटमध्ये देशाच्या सर्व भागांतून फळ व भाजीपाला माल येतो. मध्यरात्री 02वाजल्यापासून खरेदी- विक्रीला सुरुवात होते, असा तपशील लक्ष्मी भाजी मार्केट व्यापारी प्रतिनिधी आणि कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सदस्य मोहन नाईक यांनी दिला.