शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

नंदकेश्वरला शिवकालीन महादेव मंदिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 01:40 IST

दुर्गप्रेमी काचरे यांचा दावा : आजही आढळतात अवशेष

पंडित मसणे

वासिंद : शहापूर तालुक्यातील वासिंदपासून १० ते १२ किलोमीटर अंतरावर असलेल्या वांद्रे येथील नंदकेश्वर या ठिकाणी महाशिवरात्रीनिमित्ताने जत्रा भरते. वासिंद-कांबारा या रस्त्यावर पिवळीजवळ वांद्रे हे आदिवासी व जंगल परिसराचे गाव आहे. माहुली किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या लहान भवारी नावाच्या टेकडीवर छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात महादेवाचे मंदिर बांधण्यात आले होते. पुढे मुघलांनी हे मंदिर उद्ध्वस्त केले. त्याचे अवशेष आजही येथे आढळतात, असा दावा दुर्गप्रेमी महेश काचरे यांनी केला आहे.

१९७५ मध्ये टेकडीच्या पायथ्याशी असलेल्या पिवळी-वांद्रे येथील ग्रामस्थांना मंदिराच्या ठिकाणी मातीत गाडलेले एक शिवलिंग सापडले. याच शिवलिंगाची पूजा करून परिसरातील ग्रामस्थांनी छोटेसे कौलारू मंदिर बांधले. या ठिकाणी एक पाण्याचा झरा बाराही महिने वाहतो. हा झरा नंदीचे पाणी (नांदीचे पाणी) म्हणून प्रसिद्ध आहे. यावरूनच मंदिराला नंदकेश्वर असे नाव पडले. या झऱ्याच्या ठिकाणी पुरातत्त्व विभागाने कुंड्यांना संरक्षक बांधकाम केले. या परिसरात कोरीव काम केलेले दगड पाहायला मिळतात. बरेच दगड मंदिराजवळ एकत्रित ठेवल्याचे काचरे यांनी सांगितले. या परिसरात जाण्यासाठी रस्ताही तयार केला आहे. परंतु, येथे तीव्र उतार असल्याने वाहनचालकांना कसरत करावी लागते. ठाणे, पालघर येथून भाविक मोठ्या संख्येने येतात. वर्षभर धार्मिक कार्यक्र म सुरू असतात. दरम्यान, भक्तांसाठी विविध समस्या भेडसावतात. विकासकामांना प्राधान्य द्यावे, असे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :thaneठाणे