शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
2
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात
3
सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस कंपनीचा मोठा निर्णय; भारताने करार रद्द केल्यावर हायकोर्टात धाव
4
IND vs ENG: इंग्लंड दौऱ्यासाठी भारताच्या 'अ' संघाची घोषणा, 'या' खेळाडूकडे कर्णधारपद!
5
पाकिस्तानला साथ देणाऱ्या तुर्कीचे जिवंत ड्रोन लागला भारताच्या हाती; नेमका कुठे सापडला ड्रोन?
6
राज्यात वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या!
7
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
8
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
9
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
10
Dharashiv Accident: धाराशिवमध्ये दोन कारची समोरासमोर धडक, १० जण जखमी
11
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
12
पीककर्ज नाकारणाऱ्या बँकांविरुध्द कायदेशीर कारवाई होणार, चंद्रशेखर बावनकुळेंचे निर्देश
13
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
14
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
15
अल्पसंख्यांक विद्यार्थिनीला प्रवेश नाकारला, शाळा सचिवाविरोधात गुन्हा दाखल
16
Pune: वाघोलीतील १० एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न; पीआयसह चौघांवर गुन्हा दाखल
17
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
18
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
19
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
20
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार

आरटीओने वसईत नष्ट केल्या जेसीबीने दीडशे रिक्षा

By admin | Updated: January 11, 2016 01:47 IST

आरटीओने वसईतील भंगार रिक्षांविरोधात धडक मोहिम हाती घेतली असून आतापर्यत ३५० रिक्षा जप्त करून त्यापैकी १५० रिक्षा जेसीबीच्या साहय्याने कायमच्या नष्ट करण्यात आल्या आहेत

शशी करपे, वसईआरटीओने वसईतील भंगार रिक्षांविरोधात धडक मोहिम हाती घेतली असून आतापर्यत ३५० रिक्षा जप्त करून त्यापैकी १५० रिक्षा जेसीबीच्या साहय्याने कायमच्या नष्ट करण्यात आल्या आहेत. तर कारवाईत नऊ महिन्यांत १६ लाखांचा दंडवसूल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे अधिकृत रिक्षा स्टँण्डसाठी १५० ठिकाणांची पाहणी करण्यात आली असून त्याबाबत लवकरच निर्णय होणार आहे.बेकायदा आणि भंगार रिक्षांमुळे वसईत वाहतूककोंडीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. म्हणून आरटीओ कार्यालयातून अशा रिक्षांविरोधात धडक मोहिम हाती घेण्यात आली आहे. गेल्या नऊ महिन्यात वसईतून सुमारे ३५० भंगार रिक्षा शोधण्यात आल्या आहेत. पूर्वी भंगार रिक्षा मोडित काढण्यासाठी गॅस कटरचा वापर केला जात होता. पण, कटरने कापल्यानंतर पुन्हा रिक्षा तयार करून बेकायदेशिरपणे वापरात आणल्या जात होत्या. म्हणूनच उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अभय देशपांडे यांनी जेसीबी मशिनने रिक्षा कायमस्वरुपी नष्ट करण्यास सुरुवात केली. आहे. अशा पद्धतीने आतापर्यंत १५० रिक्षा नष्ट करण्यात आल्या आहेत. आरटीओने रिशांची तपासणी करून अधिकृत रिक्षावर परवाना क्रमांक आणि परवान्यांची मुदत ठळक अक्षरश: रिक्षांच्या दोन्ही बाजूला लिहीणे बंधनकारक केले. त्यामुळे अधिकृत रिक्षा कोणत्या हे ओळखणे सोपे झाले आहे.