शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
3
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
4
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
5
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
6
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
7
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
8
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
9
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
10
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
11
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
12
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
13
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
14
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
15
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
16
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
17
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
18
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
19
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS
20
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं

लोकसंख्येच्या घनतेपुढे पायाभूत सुविधा अपुऱ्या पडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : मुंबई महानगर प्रदेशातील सर्वच महानगरांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्र शासनाच्या मिलिनियम प्लस शहरांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : मुंबई महानगर प्रदेशातील सर्वच महानगरांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्र शासनाच्या मिलिनियम प्लस शहरांच्या यादीतही या प्रदेेेशातील सर्वाधिक शहरे आहेत. या याेजनेंतर्गत केंद्र सरकारने येथील महानगरांतील प्रदूषण कमी करण्यासह पाणीपुरवठ्यासह इतर मूलभूत सुविधांसाठी कोट्यवधींची अनुदाने देऊ केली आहेत. मात्र, लोकसंख्येच्या वाढत्या घनतेपुढे महानगर प्रदेशातील सर्वच शहरांमध्ये वॉटर, मीटर, गटरच नव्हे सर्वच सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. सार्वजनिक बससेवा, लोकल सेवेसह आता मेट्रो १२ मार्गही आकार घेत आहेत. मात्र, तरीही वाढते उद्योग, आयटी पार्क, व्यापारउदीमामुळे प्रवाशांची गैरसोय कमी झालेली नाही.

राज्याची राजधानी मुंबईचा जगात सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेल्या महानगरांत समावेश झाल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र, मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रात लघु उद्योगांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उल्हासनगर शहराची घनता २०११च्या जनगणणेनुसार मुंबई शहारापेक्षा तब्बल दहा हजाराहून अधिक तर जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या ठाणे शहरापेक्षा तब्बल २४ हजाराहून अधिक आहे. मुंबईची लोकसंख्या घनता प्रति चौरस किलोमीटरला २८ हजार ४२६ आहे. तर उल्हासनगरची सुमारे ३८ हजार ९३१ इतकी प्रचंड आहे. तर ठाणे शहराची लोकसंख्या घनता १४ हजार ३६१ इतकी आहे. ठाणे शहराहून अधिक लोकसंख्येची घनता उल्हासनगर पाठोपाठ भिवंडी २६ हजार ८७१ आणि कल्याण-डोंबिवली २२ हजार २१८ यांची आहे. एमएमआरडीएनेच आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे. उल्हासनगरचे भौगोलिक क्षेत्रफळ अवघे १३ चौरस किलोमीटर असल्याने त्यांची लोकसंख्या घनता देशात कदाचित सर्वाधिक असावी.

देशातील सर्वाधिक लोकसंख्या आणि महापालिका असलेला जिल्हा म्हणून ठाणे जिल्ह्याकडे पाहिले जाते. २०११च्या जनगणणेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या एक कोटी १० लाख सहा हजार १४८ इतकी आहे. जिल्ह्यात ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, भिवंडी अशा सहा महापालिका आहेत. तर वसई-विरार नव्या पालघर जिल्ह्यात गेले आहे. राजधानी मुंबईत लोकसंख्येच्या वृद्धीचा स्थिर असला तरी २००१-२०११च्या दरम्यान मुंबईची लोकसंख्या अडीच लाखांहून कमी झालेली आहे. ती नजीकच्या ठाणे जिल्ह्यात मात्र वाढली आहे. यात ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर आणि वसईचा वेग झपाट्याने वाढत आहे. पाठोपाठ अंबरनाथ-बदलापूर, उरण-पनवेलची लोकसंख्याही वेगाने वाढत असल्याचे एमएमआरडीएने केलेल्या अभ्यासात उघड झाले आहे.

मुंबई महानगर प्रदेशाच्या शहरी विभागाची लोकसंख्येची घनता ही एकूण सकल लोकसंख्येच्या तिप्पट आहे. महानगर प्रदेशातील एकूण ८६.२६ टक्के लोकसंख्या महापालिका क्षेत्रातील आहे. त्यात मुंबईचा वाटा ५४.५६ तर उर्वरित सात महानगरपालिकांचा वाटा ३२.०७ टक्के इतका आहे. या सातपैकी ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि वसई-विरार या चार महापालिका दहा लाखांहून लोकसंख्येच्या तेव्हा होत्या. उर्वरित तीन महापालिकाही लवकरच दहा लाखांच्या होतील, असा अंदाज होता, आता कदाचित २०२१ मध्ये खरा झालेला असेल.

वाढत्या लोकसंख्येपुढे पाणीटंचाईचे संकट

महानगर प्रदेशातील शहरी भागातच आजघडीला पाण्याचा सुमारे १२४५ दशलक्ष लीटर इतका प्रचंड तुटवडा आहे. चितळे आयोगानुसार या भागात २०११ मध्ये पाण्याची मागणी ७६१० दशलक्ष लीटर एवढी होती. ती २०३४ मध्ये ११,२७९ दशलक्ष लीटरवर जाणार आहे. २०११ ते आता २०२१ पर्यंत लोकसंख्या प्रचंड वाढली असून आताच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. मात्र, त्याचा विचार न करता महाविकास आघाडी सरकारने क्लस्टर आणि एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीच्या नावाखाली चटईक्षेत्रात खैरात वाटून भविष्यातील संकटात आणखी भर घातली आहे.