शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

लोकसंख्येच्या घनतेपुढे पायाभूत सुविधा अपुऱ्या पडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : मुंबई महानगर प्रदेशातील सर्वच महानगरांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्र शासनाच्या मिलिनियम प्लस शहरांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : मुंबई महानगर प्रदेशातील सर्वच महानगरांची लोकसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. केंद्र शासनाच्या मिलिनियम प्लस शहरांच्या यादीतही या प्रदेेेशातील सर्वाधिक शहरे आहेत. या याेजनेंतर्गत केंद्र सरकारने येथील महानगरांतील प्रदूषण कमी करण्यासह पाणीपुरवठ्यासह इतर मूलभूत सुविधांसाठी कोट्यवधींची अनुदाने देऊ केली आहेत. मात्र, लोकसंख्येच्या वाढत्या घनतेपुढे महानगर प्रदेशातील सर्वच शहरांमध्ये वॉटर, मीटर, गटरच नव्हे सर्वच सुविधा अपुऱ्या पडू लागल्या आहेत. सार्वजनिक बससेवा, लोकल सेवेसह आता मेट्रो १२ मार्गही आकार घेत आहेत. मात्र, तरीही वाढते उद्योग, आयटी पार्क, व्यापारउदीमामुळे प्रवाशांची गैरसोय कमी झालेली नाही.

राज्याची राजधानी मुंबईचा जगात सर्वाधिक लोकसंख्येची घनता असलेल्या महानगरांत समावेश झाल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र, मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रात लघु उद्योगांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उल्हासनगर शहराची घनता २०११च्या जनगणणेनुसार मुंबई शहारापेक्षा तब्बल दहा हजाराहून अधिक तर जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या ठाणे शहरापेक्षा तब्बल २४ हजाराहून अधिक आहे. मुंबईची लोकसंख्या घनता प्रति चौरस किलोमीटरला २८ हजार ४२६ आहे. तर उल्हासनगरची सुमारे ३८ हजार ९३१ इतकी प्रचंड आहे. तर ठाणे शहराची लोकसंख्या घनता १४ हजार ३६१ इतकी आहे. ठाणे शहराहून अधिक लोकसंख्येची घनता उल्हासनगर पाठोपाठ भिवंडी २६ हजार ८७१ आणि कल्याण-डोंबिवली २२ हजार २१८ यांची आहे. एमएमआरडीएनेच आपल्या अहवालात ही माहिती दिली आहे. उल्हासनगरचे भौगोलिक क्षेत्रफळ अवघे १३ चौरस किलोमीटर असल्याने त्यांची लोकसंख्या घनता देशात कदाचित सर्वाधिक असावी.

देशातील सर्वाधिक लोकसंख्या आणि महापालिका असलेला जिल्हा म्हणून ठाणे जिल्ह्याकडे पाहिले जाते. २०११च्या जनगणणेनुसार जिल्ह्याची लोकसंख्या एक कोटी १० लाख सहा हजार १४८ इतकी आहे. जिल्ह्यात ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर, नवी मुंबई, मीरा-भाईंदर, भिवंडी अशा सहा महापालिका आहेत. तर वसई-विरार नव्या पालघर जिल्ह्यात गेले आहे. राजधानी मुंबईत लोकसंख्येच्या वृद्धीचा स्थिर असला तरी २००१-२०११च्या दरम्यान मुंबईची लोकसंख्या अडीच लाखांहून कमी झालेली आहे. ती नजीकच्या ठाणे जिल्ह्यात मात्र वाढली आहे. यात ठाणे, नवी मुंबई, मीरा-भाईंदर आणि वसईचा वेग झपाट्याने वाढत आहे. पाठोपाठ अंबरनाथ-बदलापूर, उरण-पनवेलची लोकसंख्याही वेगाने वाढत असल्याचे एमएमआरडीएने केलेल्या अभ्यासात उघड झाले आहे.

मुंबई महानगर प्रदेशाच्या शहरी विभागाची लोकसंख्येची घनता ही एकूण सकल लोकसंख्येच्या तिप्पट आहे. महानगर प्रदेशातील एकूण ८६.२६ टक्के लोकसंख्या महापालिका क्षेत्रातील आहे. त्यात मुंबईचा वाटा ५४.५६ तर उर्वरित सात महानगरपालिकांचा वाटा ३२.०७ टक्के इतका आहे. या सातपैकी ठाणे, नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली आणि वसई-विरार या चार महापालिका दहा लाखांहून लोकसंख्येच्या तेव्हा होत्या. उर्वरित तीन महापालिकाही लवकरच दहा लाखांच्या होतील, असा अंदाज होता, आता कदाचित २०२१ मध्ये खरा झालेला असेल.

वाढत्या लोकसंख्येपुढे पाणीटंचाईचे संकट

महानगर प्रदेशातील शहरी भागातच आजघडीला पाण्याचा सुमारे १२४५ दशलक्ष लीटर इतका प्रचंड तुटवडा आहे. चितळे आयोगानुसार या भागात २०११ मध्ये पाण्याची मागणी ७६१० दशलक्ष लीटर एवढी होती. ती २०३४ मध्ये ११,२७९ दशलक्ष लीटरवर जाणार आहे. २०११ ते आता २०२१ पर्यंत लोकसंख्या प्रचंड वाढली असून आताच पाणीटंचाई जाणवू लागली आहे. मात्र, त्याचा विचार न करता महाविकास आघाडी सरकारने क्लस्टर आणि एकात्मिक विकास नियंत्रण नियमावलीच्या नावाखाली चटईक्षेत्रात खैरात वाटून भविष्यातील संकटात आणखी भर घातली आहे.