शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
2
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
3
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
4
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
5
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
6
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
7
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
8
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
9
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
10
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
11
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
12
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
13
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
14
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
15
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
16
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
17
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
18
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
19
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
20
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त वसुलीवर फलकाचा उतारा

By admin | Updated: August 10, 2015 23:09 IST

निश्चित दरापेक्षा जास्त दराने बाजार फी वसूल होत असल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने मीरा-भार्इंदर पालिका कर्मचाऱ्याला रंगेहाथ अटक केल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे.

- राजू काळे,  भार्इंदर निश्चित दरापेक्षा जास्त दराने बाजार फी वसूल होत असल्याप्रकरणी लाचलुचपत विभागाने मीरा-भार्इंदर पालिका कर्मचाऱ्याला रंगेहाथ अटक केल्यानंतर प्रशासनाला जाग आली आहे. प्रशासनाकडून बाजार परिसरात निश्चित दराप्रमाणेच बाजार फी देण्याचे माहिती फलक लावण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.तत्कालीन महासभेने फेरीवाल्यांकडून प्रति चौरस मीटर जागेच्या वापरापोटी २५ रु. प्रति दिवसाप्रमाणे बाजार फी वसुलीला मान्यता दिली आहे. परंतु, पालिकेने नियुक्त केलेल्या ठेकेदारांकडून निश्चित दरापेक्षा जास्त दराने बाजार फी वसूल होत असल्याने त्रस्त फेरीवाल्यांनी प्रशासनाला अनेकदा तक्रारी केल्या आहेत. फेरीवाला संघटनेतील राजकीय तसेच प्रशासनातील भ्रष्ट अधिकाऱ्यांचे हित ठेकेदारांकडून जोपासले जात असल्याने फेरीवाल्याच्या तक्रारींकडे नेहमीच दुर्लक्ष करण्यात आले आहे. राजकीय वरदहस्त लाभलेल्या ठेकेदारांकडून ठेका घेतेवेळी जमा केली जाणारी अनामत रक्कमही बोगस असल्याचे अनेकदा उघड झालेले असतानाही प्रशासनाने त्यावर पांघरूण घालून बाजार फी च्या जाचक वसुलीला प्रत्यक्षात पाठिंबा देत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. ठेकेदारांच्या या जाचक वसुलीला कंटाळून भार्इंदर पश्चिमेकडील आठवडाबाजारातील एका फेरीवाल्याने ठाणे एसीबी (अ‍ॅण्टी करप्शन विभाग) कडे ३ आठवड्यांपूर्वी तक्रार केली होती. ठेकेदारांना एसीबीची कुणकुण लागल्याने त्यांनी प्रशासनाला ठेका परवडत नसल्याचे कारण देत वसुली बंद केली. हा महसूल बुडू नये, यासाठी प्रशासनाने सफाई कर्मचाऱ्यांसह शिपायांना वसुलीच्या कामाला जुंपले. त्यातील राकेश कारभारी त्रिभुवन या शिपायानेसुद्धा २५ रु. या निश्चित दराखेरीज ३० रु. वसूल करून फेरीवाल्याला पावती न देता रकमेचा अपहार करताना एसीबीने २६ जुलैला रंगेहाथ पकडले. यात पालिकेच्या कर्मचाऱ्याचा बळी गेल्यानंतर प्रशासनाने निश्चित दराप्रमाणे वसुली व्हावी, यासाठी बाजार परिसरात फेरीवाल्यांच्या माहितीस्तव फलक लावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात प्रति चौरस मीटरला २५ रु.प्रमाणे अतिरिक्त जागेच्या वापरानुसार बाजार फी वसूल करण्यात येणार आहे. फेरीवाल्याने एकाच दिवसात जागा बदलल्यास अतिरिक्त बाजार फी वसूल करण्यात येणार आहे. ना-फेरीवाला क्षेत्रातील वसुलीस बंदी असतानाही ठेकेदार त्यांच्याकडून वसुली करीत आहेत. ही वसुली केल्यास ठेकेदारावर दंडात्मक तसेच तेथील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. वसुली करणाऱ्याने मान्यतेचे ओळखपत्र बाळगणे बंधनकारक करण्यात आले आहे. - अनेक नियम आणि कायदे करूनही फेरीवाल्यांकडून पालिका कर्मचारी अतिरिक्त बाजार फी वसूल करत होते. लाचलुचपत विभागाने असा प्रकार करणाऱ्या कर्मचाऱ्याला रंगेहाथ पकडल्यानंतर पालिका प्रशासनाला जाग आली. आणि त्यांनी याबाबत निश्चित दराप्रमाणेच बाजार फी देण्याचा माहिती फलकच बाजार परिसरात लावला आहे.पालिकेच्या या निर्णयाचा आता कितपत फायदा होतो, आणि यामुळे पालिका कर्मचाऱ्यांवर काही वचक बसतो का, हे पाहणे गरजेचे आहे. आता नव्याने लावण्यात आलेल्या या माहिती फलकामुळे हे देखील लवकरच कळेल.