शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

पाणीबाणीवर आपत्कालीन आराखडा

By admin | Updated: January 19, 2016 02:12 IST

बारवी आणि आंध्र धरणात मार्चअखेरपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा असल्याने सध्या ३० टक्के पाणीकपात लागू करूनही परिस्थिती चिंताजनक बनली आहे.

कल्याण : बारवी आणि आंध्र धरणात मार्चअखेरपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा असल्याने सध्या ३० टक्के पाणीकपात लागू करूनही परिस्थिती चिंताजनक बनली आहे. त्यासाठी पालिकेने पाणी व्यवस्थापनाचा आपत्कालीन आराखडा तयार केला असून तो मंगळवारी महासभेत मांडला जाणार आहे. आराखड्याची मागणी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केली होती. त्यानुसार, प्रशासनाने पालिकेच्या आठ प्रभाग क्षेत्रांत पुरविल्या जाणाऱ्या टँकरची संख्या वाढवून २० वरून २५ केली आहे. पालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांना जादा पाणी पुरवण्याचेही सुचविण्यात आले आहे. प्रत्येक प्रभागात दोन बोअरवेल खोदल्या जाणार आहेत. नादुरुस्त असलेल्या बोअरवेल दुरुस्त करणे, विहिरी स्वच्छ करणे, शुद्ध पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठी करण्याच्या आवाहनाचा यात समावेश आहे. पाण्यासाठी महिला पुन्हा रस्त्यावर कल्याण-शीळ रोडलगत असलेल्या टाटा पॉवर नाक्याजवळ पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या महिला सोमवारी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर आल्या. त्यांनी दुपारी रास्ता रोको केला. या वेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनी धाव घेतली. स्थानिक नगरसेविका पाणीप्रश्नावर महिलांना दाद देत नसल्याचा आरोप महिलांनी केला. त्या वेळी या प्रश्नावर खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चेचे आश्वासन मिळाल्यावर महिलांनी आंदोलन मागे घेतले. खासदार निधीतून पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पाच लाख रुपये देण्याचे आश्वासन शिंदे यांच्यातर्फे देण्यात आले आहे.