शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

पाणीबाणीवर आपत्कालीन आराखडा

By admin | Updated: January 19, 2016 02:12 IST

बारवी आणि आंध्र धरणात मार्चअखेरपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा असल्याने सध्या ३० टक्के पाणीकपात लागू करूनही परिस्थिती चिंताजनक बनली आहे.

कल्याण : बारवी आणि आंध्र धरणात मार्चअखेरपर्यंत पुरेल इतकाच पाणीसाठा असल्याने सध्या ३० टक्के पाणीकपात लागू करूनही परिस्थिती चिंताजनक बनली आहे. त्यासाठी पालिकेने पाणी व्यवस्थापनाचा आपत्कालीन आराखडा तयार केला असून तो मंगळवारी महासभेत मांडला जाणार आहे. आराखड्याची मागणी महापौर राजेंद्र देवळेकर यांनी केली होती. त्यानुसार, प्रशासनाने पालिकेच्या आठ प्रभाग क्षेत्रांत पुरविल्या जाणाऱ्या टँकरची संख्या वाढवून २० वरून २५ केली आहे. पालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या २७ गावांना जादा पाणी पुरवण्याचेही सुचविण्यात आले आहे. प्रत्येक प्रभागात दोन बोअरवेल खोदल्या जाणार आहेत. नादुरुस्त असलेल्या बोअरवेल दुरुस्त करणे, विहिरी स्वच्छ करणे, शुद्ध पाण्याचा वापर केवळ पिण्यासाठी करण्याच्या आवाहनाचा यात समावेश आहे. पाण्यासाठी महिला पुन्हा रस्त्यावर कल्याण-शीळ रोडलगत असलेल्या टाटा पॉवर नाक्याजवळ पाणीटंचाईने त्रस्त असलेल्या महिला सोमवारी उत्स्फूर्तपणे रस्त्यावर आल्या. त्यांनी दुपारी रास्ता रोको केला. या वेळी शिवसेनेचे माजी नगरसेवक कैलास शिंदे यांनी धाव घेतली. स्थानिक नगरसेविका पाणीप्रश्नावर महिलांना दाद देत नसल्याचा आरोप महिलांनी केला. त्या वेळी या प्रश्नावर खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चेचे आश्वासन मिळाल्यावर महिलांनी आंदोलन मागे घेतले. खासदार निधीतून पाणीप्रश्न सोडविण्यासाठी पाच लाख रुपये देण्याचे आश्वासन शिंदे यांच्यातर्फे देण्यात आले आहे.