शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
4
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
7
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
8
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
10
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
11
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
12
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
13
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
14
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
15
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
16
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
17
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
18
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
19
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
20
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

खेडेगावात डॉक्टर देता का डॉक्टर?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2021 04:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : ठाणे जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागात मागील दीड वर्षापासून कोरोना या आजाराने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : ठाणे जिल्ह्यात शहरी भागासह ग्रामीण भागात मागील दीड वर्षापासून कोरोना या आजाराने थैमान घातले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील विविध भागात तसेच ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा मजबूत करण्यासाठी आरोग्य विभागाकडून डॉक्टरांची टीम उभी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत; मात्र ग्रामीण भागात असलेली सार्वजनिक वाहतुकीची कमतरता, शहरी आणि ग्रामीण भागात डॉक्टरांच्या वेतनात तफावत आदी कारणांमुळे डॉक्टर त्या ठिकाणी जाण्यास तयार नाहीत. कोरोना काळात ३३ डॉक्टरांची नियुक्ती केली होती; परंतु अवघ्या १७ डॉक्टरांनी कामाच्या ठिकाणी हजेरी लावली असून उर्वरितांनी नकार घंटा वाजविली आहे.

मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोना या आजाराने शिरकाव केला. अचानकपणे आलेल्या या महामारीने आरोग्य व्यवस्था पुरती कोलमडली होती. ही आरोग्य सुविधा सक्षम करण्यासाठी आरोग्य विभागाने कंबर कसली. कोरोनाकाळात जिल्ह्यातील विविध शहरी भागात तसेच ग्रामीण भागातील शहापूर, मुरबाड आणि कल्याण वरप येथील ग्रामीण भागासाठी एमबीबीएस आणि बीएएमएस आशा ३३ डॉक्टरांना नियुक्तीपत्रे दिली होती. त्यापैकी केवळ १७ डॉक्टर कर्तव्यावर हजर झाले आहेत. यामध्ये मुरबाड तालुक्यासाठी तीन एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती केली. त्यापैकी केवळ एकच डॉक्टर हजर झाले, तर सहा बीएएमएस डॉक्टरांपैकी तीन डॉक्टर कर्तव्य बजावात आहेत. शहापूर तालुक्यासाठी एका एमबीबीएस डॉक्टरांची नियुक्ती केली. तो ही डॉक्टर हजर झाला नाही. तर तीन बीएएमएस डॉक्टरांपैकी एक डॉक्टर कर्तव्य बजावत आहे. त्यात कल्याण वरप येथे एक एमबीबीएस डॉक्टराची नियुक्ती केली. तेही हजर झाले नाहीत तर, बीएएमएस दोन डॉक्टरांपैकी केवळ एक डॉक्टर कर्तव्य बजावत आहे.

कोरोनाकाळातील एकूण नियुक्त्या -३३

एमबीबीएस नियुक्ती - १०

हजर झाले किती - ६

बीएएमएस, बीडीएस - २३

हजर झाले किती - ११

व्यवस्थाही नाही, अन्‌ पगारही नाही

शहरी भागात म्हणजे महापालिकांच्या ठिकाणी जास्तीचा पगार दिला जात आहे. परंतु ग्रामीण भागात नियुक्तीनंतर कमी पगार मिळत आहे. त्यातही येण्या-जाण्याची अडचण असल्याने नियुक्ती होऊनही गेलो नाही.

(एक डॉक्टर)

ठाणे जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात सार्वजनिक वाहतुकीचा अभाव असल्याने तसेच स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा प्रशासनाकडून डॉक्टरांना देण्यात येणाऱ्या वेतनात यातील तफावत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात गेलो नाही.

(एक डॉक्टर)

कारणे काय?

महापालिकांच्या तुलनेत ग्रामीण भागासाठी पगार तुटपुंजा दिला जात आहे. तसेच जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा अभाव आहे. शिवाय शहरात वास्तव्यास असल्याने येण्या जाण्यासाठी जो काही वेळ लागतो, त्यामुळेदेखील जाण्यास नकार दिला जात आहे. तसेच इतर सोयीसुविधा देखील ग्रामीण भागात उपलब्ध होत नाही. ही काही महत्त्वाची कारणे पुढे आली आहेत.

ग्रामीण भागात एकूण किती जागा रिक्त

केवळ ग्रामीण भागाचा विचार केल्यास या ठिकाणी १६ डॉक्टरांची नियुक्ती कोरोनाकाळात केली होती, परंतु त्यातील अवघ्या सहा डॉक्टरांनीच जाण्यास पसंती दिली असून १० जागा येथील आजही रिक्त आहेत. त्यामुळेच नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषदेच्या महासभेत देखील याविरोधात ग्रामीण भागातील सदस्यांनी आवाज उठवून डॉक्टर उपलब्ध करून देण्याची मागणी झाली होती.

....

शहरी भागाच्या तुलनेत ग्रामीण भागात सेवा देणाऱ्या डॉक्टरांना कमी पगार मिळत आहे. हेच मुख्य कारण तूर्तासतरी समोर आले आहे. त्यामुळेच ग्रामीण भागात डॉक्टर तयार होत नाहीत.

(डॉ. मनीष रेंघे - जिल्हा आरोग्य अधिकारी, ठाणे)