शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

सहा लाखांचे उत्पन्न असूनही नायगाव रेल्वे स्थानक दुर्लक्षित

By admin | Updated: January 21, 2016 02:26 IST

दिवसाला सरासरी ५० हजारांच्या आसपास प्रवासी, सुमारे सहा लाखांचे उत्पन्न असलेले नायगाव रेल्वे स्टेशन पूर्वीपासून दुर्लक्षित आणि उपेक्षित राहिल्याने येथे कोणत्याही प्राथमिक

वसई : दिवसाला सरासरी ५० हजारांच्या आसपास प्रवासी, सुमारे सहा लाखांचे उत्पन्न असलेले नायगाव रेल्वे स्टेशन पूर्वीपासून दुर्लक्षित आणि उपेक्षित राहिल्याने येथे कोणत्याही प्राथमिक सुविधा नाहीत. परिणामी, प्रवाशांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. या स्टेशनवरून मुंबईत नोकरी-व्यवसाय करणारेच प्रवास अधिक असल्याने सतत धकाधकी आणि धावपळीच्या युगात वावरणाऱ्या प्रवाशांना स्टेशनवरील गैरसोयी जणू काही अंगवळणी पडल्या आहेत.कित्येक वर्षे रखडलेला पूर्व-पश्चिमेस जोडणारा सब वे काही महिन्यांपासून सुुरू करण्यात आला आहे. पण, रात्रीच्या वेळी सब वेत सुरक्षारक्षकाची व्यवस्था नसल्याने महिलांना सब वे ने ये-जा करण्याची भीती वाटत असते. सब वेचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याने पावसाळ्यात पाणी गळत असते. तसेच पाणी साचून राहिलेले असते. साफसफाई केली जात नसल्याने सब वेत घाण आणि दुर्गंधी पसरलेली असते. सब वेतील लाद्या अनेक ठिकाणी तुटलेल्या आहेत. स्टेशनवर कायमस्वरूपी पोलीस नसल्याने रात्री-अपरात्री महिला प्रवाशांना ये-जा करताना काळजी घ्यावी लागते. रात्रीच्या वेळी स्टेशनवर भिकारी आणि गर्दुल्ले निवाऱ्यासाठी येतात. पोलीस नसल्याने त्यांचा उपद्रव प्रवाशांना सहन करावा लागतो. स्टेशनवर पुरेसे पंखे नाहीत. विजेची सोय नसल्यानेही स्टेशनवर अधिकतर उजेड कमी असल्याने अंधुक प्रकाशात गाडीची वाट पाहत उभ्या असलेल्या विशेषत: महिला प्रवाशांची गैरसोय होताना दिसते. चारही फलाटांवर बसण्यासाठी पुरेशी बाके नाहीत. रेल्वे फलाटांची उंची जास्त असल्याने गाडीतून चढउतार करताना प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. स्टेशनवर सीसीटीव्हीची व्यवस्था नाही. काही अनुचित प्रकार घडल्यास वसई रेल्वे स्टेशनवर येऊन पोलिसांकडे तक्रार करावी लागते. स्टेशनच्या पूर्व आणि पश्चिमेला एकेक तिकीट खिडकी आहे. त्यातही दोन्ही बाजूला एकेक खिडकी उघडी असते. पूर्वेला तिकीट खिडकीजवळ दोन आणि पश्चिमेला तीन एटीव्हीएम मशिन्स आहेत. स्टेशनवर आरपीएफ आणि रेल्वे पोलीस दिसत नाहीत. रात्रीच्या वेळी काही अनुचित प्रकार घडल्यास कुणाकडे धाव घ्यायची, असा महिला प्रवाशांचा सवाल आहे. गेल्या वर्षभरात स्टेशन परिसरात रेल्वे अपघातात ११ प्रवाशांना जीव गमवावा लागला आहे. कित्येक वेळा रेल्वे अपघात झाल्यानंतर जखमींना तातडीने मदत मिळणे खूपच कठीण असते. स्टेशनवर सोयीसुविधांची कमतरता असून स्टेशनबाहेरही प्रवाशांना कोणत्याही सुविधा दिलेल्या नाहीत. रेल्वेने प्रवास करणारे बहुतांश प्रवासी दुरून मोटारसायकलीवरून येतात. पण, स्टॅण्डमध्ये अपुरी जागा असल्याने प्रवासी बाहेर मुख्य रस्त्याच्या दुतर्फा गाड्या पार्क करून दिवसभरासाठी निघून जातात. (प्रतिनिधी)