शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

शुद्धीकरणासाठी बायोसॅनिटायझर

By admin | Updated: April 6, 2016 01:58 IST

पाण्याच्या भीषण टंचाईमुळे राज्यातील जलस्रोत आटले आहेत. त्यामुळे खेडी आणि उपनगरेही होरपळून निघाली आहेत. नैसर्गिक जलस्रोत बायोसॅनिटायझर पद्धतीने शुद्ध करू

मुरलीधर भवार, कल्याणपाण्याच्या भीषण टंचाईमुळे राज्यातील जलस्रोत आटले आहेत. त्यामुळे खेडी आणि उपनगरेही होरपळून निघाली आहेत. नैसर्गिक जलस्रोत बायोसॅनिटायझर पद्धतीने शुद्ध करून त्यातील पाणी पिण्यायोग्य व पुन्हा वापरता येऊ शकते. त्यासाठी प्रोजेक्ट राबवण्याची तयारी जलतज्ज्ञ गुणवंत पाटील यांनी दर्शवली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्याकरिता पुढाकार घेतल्यास पाणीटंचाईवर मात करता येईल. तसेच प्रदूषित झालेले नैसर्गिक जलस्रोत वापरायोग्य करता येऊ शकतात, असा दावा पाटील यांनी केला आहे.बायोसॅनिटायझरचा शोध पुण्यातील डॉ. उदय भवाळकर यांनी लावला आहे. त्यांच्या संस्थेसाठी पाटील काम करीत आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे स्थायी समिती सभापती संदीप गायकर यांची पाटील यांनी नुकतीच भेट घेतली. प्रदूषित झालेले जलस्रोत बायो सॅनिटायझरद्वारे शुद्ध करता येऊ शकतात, असा दावा त्यांनी यावेळी केला. कल्याण शहरातील काळातलाव एक किलोमीटर परिघाचा आहे. त्यात बराच मोठा जलसाठा आहे. तसेच उल्हास नदीतील जलपर्णीने जवळपास सात किलोमीटरचा परिसर व्यापला आहे. नाल्यांद्वारे मलमूत्रमिश्रित सांडपाणी थेट या नदीपात्रात सोडले जाते. हे प्रदूषण रोखण्यासाठी नदीत तसेच काळातलावात बायोसॅनिटायझरचा वापर केल्यास दोन्ही ठिकाणचे पाणी शुद्ध होईल. त्याचबरोबर उल्हास नदीच्या वाहत्या पाण्यात बायोसॅनिटायझरचा वापर अधिक उपयुक्त ठरू शकतो. त्यासाठी किमान ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, असे जलतज्ज्ञ गुणवंत पाटील यांनी पुढे सांगितले.