शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

शुद्धीकरणासाठी बायोसॅनिटायझर

By admin | Updated: April 6, 2016 01:58 IST

पाण्याच्या भीषण टंचाईमुळे राज्यातील जलस्रोत आटले आहेत. त्यामुळे खेडी आणि उपनगरेही होरपळून निघाली आहेत. नैसर्गिक जलस्रोत बायोसॅनिटायझर पद्धतीने शुद्ध करू

मुरलीधर भवार, कल्याणपाण्याच्या भीषण टंचाईमुळे राज्यातील जलस्रोत आटले आहेत. त्यामुळे खेडी आणि उपनगरेही होरपळून निघाली आहेत. नैसर्गिक जलस्रोत बायोसॅनिटायझर पद्धतीने शुद्ध करून त्यातील पाणी पिण्यायोग्य व पुन्हा वापरता येऊ शकते. त्यासाठी प्रोजेक्ट राबवण्याची तयारी जलतज्ज्ञ गुणवंत पाटील यांनी दर्शवली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्याकरिता पुढाकार घेतल्यास पाणीटंचाईवर मात करता येईल. तसेच प्रदूषित झालेले नैसर्गिक जलस्रोत वापरायोग्य करता येऊ शकतात, असा दावा पाटील यांनी केला आहे.बायोसॅनिटायझरचा शोध पुण्यातील डॉ. उदय भवाळकर यांनी लावला आहे. त्यांच्या संस्थेसाठी पाटील काम करीत आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे स्थायी समिती सभापती संदीप गायकर यांची पाटील यांनी नुकतीच भेट घेतली. प्रदूषित झालेले जलस्रोत बायो सॅनिटायझरद्वारे शुद्ध करता येऊ शकतात, असा दावा त्यांनी यावेळी केला. कल्याण शहरातील काळातलाव एक किलोमीटर परिघाचा आहे. त्यात बराच मोठा जलसाठा आहे. तसेच उल्हास नदीतील जलपर्णीने जवळपास सात किलोमीटरचा परिसर व्यापला आहे. नाल्यांद्वारे मलमूत्रमिश्रित सांडपाणी थेट या नदीपात्रात सोडले जाते. हे प्रदूषण रोखण्यासाठी नदीत तसेच काळातलावात बायोसॅनिटायझरचा वापर केल्यास दोन्ही ठिकाणचे पाणी शुद्ध होईल. त्याचबरोबर उल्हास नदीच्या वाहत्या पाण्यात बायोसॅनिटायझरचा वापर अधिक उपयुक्त ठरू शकतो. त्यासाठी किमान ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, असे जलतज्ज्ञ गुणवंत पाटील यांनी पुढे सांगितले.