शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
3
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
4
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
5
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
6
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
7
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
8
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
9
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
10
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
11
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
12
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
13
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
14
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
15
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
16
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
17
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
18
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
19
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
20
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

शुद्धीकरणासाठी बायोसॅनिटायझर

By admin | Updated: April 6, 2016 01:58 IST

पाण्याच्या भीषण टंचाईमुळे राज्यातील जलस्रोत आटले आहेत. त्यामुळे खेडी आणि उपनगरेही होरपळून निघाली आहेत. नैसर्गिक जलस्रोत बायोसॅनिटायझर पद्धतीने शुद्ध करू

मुरलीधर भवार, कल्याणपाण्याच्या भीषण टंचाईमुळे राज्यातील जलस्रोत आटले आहेत. त्यामुळे खेडी आणि उपनगरेही होरपळून निघाली आहेत. नैसर्गिक जलस्रोत बायोसॅनिटायझर पद्धतीने शुद्ध करून त्यातील पाणी पिण्यायोग्य व पुन्हा वापरता येऊ शकते. त्यासाठी प्रोजेक्ट राबवण्याची तयारी जलतज्ज्ञ गुणवंत पाटील यांनी दर्शवली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्याकरिता पुढाकार घेतल्यास पाणीटंचाईवर मात करता येईल. तसेच प्रदूषित झालेले नैसर्गिक जलस्रोत वापरायोग्य करता येऊ शकतात, असा दावा पाटील यांनी केला आहे.बायोसॅनिटायझरचा शोध पुण्यातील डॉ. उदय भवाळकर यांनी लावला आहे. त्यांच्या संस्थेसाठी पाटील काम करीत आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेचे स्थायी समिती सभापती संदीप गायकर यांची पाटील यांनी नुकतीच भेट घेतली. प्रदूषित झालेले जलस्रोत बायो सॅनिटायझरद्वारे शुद्ध करता येऊ शकतात, असा दावा त्यांनी यावेळी केला. कल्याण शहरातील काळातलाव एक किलोमीटर परिघाचा आहे. त्यात बराच मोठा जलसाठा आहे. तसेच उल्हास नदीतील जलपर्णीने जवळपास सात किलोमीटरचा परिसर व्यापला आहे. नाल्यांद्वारे मलमूत्रमिश्रित सांडपाणी थेट या नदीपात्रात सोडले जाते. हे प्रदूषण रोखण्यासाठी नदीत तसेच काळातलावात बायोसॅनिटायझरचा वापर केल्यास दोन्ही ठिकाणचे पाणी शुद्ध होईल. त्याचबरोबर उल्हास नदीच्या वाहत्या पाण्यात बायोसॅनिटायझरचा वापर अधिक उपयुक्त ठरू शकतो. त्यासाठी किमान ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे, असे जलतज्ज्ञ गुणवंत पाटील यांनी पुढे सांगितले.