शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

सेना सक्षम, पण युतीवर गणित अवलंबून; युतीत फायदा भाजपपेक्षा शिवसेनेलाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 00:13 IST

२0१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-सेनेचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत युती तुटल्याने सेना भाजपने ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवली

नितीन पंडित भिवंडी : भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघावर तब्बल २५ वर्षे भाजपचे वर्चस्व राहिले आहे. १९९0 पासून २0१४ पर्यंत भाजपचे विष्णू सवरा सलग पाचवेळा निवडून आले होते. मात्र १ ऑगस्ट २0१४ रोजी ठाणे जिल्ह्यातून पालघर जिल्हा विभक्त झाल्यामुळे २0१४ च्या निवडणुकीत सवरा यांनी पालघर जिल्ह्यातील विक्र मगड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. जिल्हा विभाजनाबरोबरच युतीतही बिनसल्यामुळे २0१४ च्या निवडणुकीत शिवसेनेने हा मतदारसंघ भाजपकडून स्वत:च्या ताब्यात घेतला. सद्य:स्थितीत या मतदारसंघात भाजपची ताकद वाढली असली तरी, युतीमुळे त्याचा फायदा भाजपपेक्षा शिवसेनेलाच जास्त होणार आहे.

१९८0 ते १९९0 या दहा वर्षांच्या काळात या मतदारसंघावर काँग्रेसचे वर्चस्व होते. काँग्रेसचे शंकर गोवारी हे या मतदारसंघाचे आमदार होते. १९९0 च्या निवडणुकीत विष्णू सवरा यांनी काँग्रेसच्या लक्ष्मण दुमाडा यांचा १२ हजार ५२८ मतांनी पराभव करून हा मतदारसंघ भाजपकडे खेचून घेतला. त्या निवडणुकीत विष्णू सवरा यांना ४८ हजार १८४, तर काँग्रेसचे लक्ष्मण दुमाडा यांना ३५ हजार ६५६ मते मिळाली होती. काँग्रेसकडून खेचून घेतलेला हा मतदारसंघ तब्बल २५ वर्षे भाजपकडेच होता. मधल्या काळात भाजपला आव्हान देण्यासाठी राष्ट्रवादीने प्रयत्न केला, मात्र तो यशस्वी झाला नाही.

२0१४ च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत युतीचं गणित बिनसल्याने शिवसैनिकांनी करो या मरोची लढत देत या मतदारसंघावर वर्चस्व सिद्ध केले. त्यावेळी शिवसेनेचे शांताराम मोरे हे ९ हजार १६0 च्या मताधिक्क्याने निवडून आमदार झाले. भाजपचे शांताराम पाटील यांनी सेनेला कडवी टक्कर देत ४७ हजार ९२२ मतं मिळवली होती.

२0१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप-सेनेचे उमेदवार मोठ्या संख्येने निवडून आले होते. मात्र विधानसभा निवडणुकीत युती तुटल्याने सेना भाजपने ही निवडणूक स्वतंत्रपणे लढवली. लोकसभा निवडणुकीत भाजपला साथ देऊनही विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सेनेवर ताशेरे ओढणाऱ्या भाजपच्या पक्षश्रेष्ठींना ताकद दाखवून देण्यासाठी शिवसैनिकांनी एकजुटीने प्रयत्न केले. भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव असल्याने २0१४ च्या निवडणुकीत शिवसेनेच्या वतीने शांताराम मोरे यांना पहिल्यांदाच उमेदवारी मिळाली होती. शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांच्यासह सेना कार्यकर्त्यांनी या निवडणुकीत विशेष लक्ष देऊन हा मतदारसंघ भाजपकडून शिवसेनेने खेचून घेतला. २0१४ च्या निवडणुकीनंतर शिवसेनेने ग्रामीण मतदारसंघात आपली पकड मजबूत करत, ग्रामपंचायत निवडणुकांसह कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये वेळोवेळी आपले वर्चस्व सिद्ध केले. यावेळी मात्र या मतदारसंघाची गणितं बदलली आहेत. युतीच्या विजयाची शक्यता वाढल्याने सेना कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. युती झाली तर हा मतदारसंघ पुन्हा सेनेच्याच वाट्याला येणार असून, मागील पाच वर्षांत सेनेने या मतदारसंघात केलेली कामे, त्यामुळे पक्षाची वाढलेली ताकद याचा फायदा या निवडणुकीत सेनेला होणार आहे.

विशेष म्हणजे, २0१४ च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे कपिल पाटील यांनी भाजप प्रवेश करून खासदारकी मिळवली. कपिल पाटील यांच्या भाजप प्रवेशापासून राष्ट्रवादीची झालेली वाताहत आजही सुरूच आहे. कपिल पाटलांनी विष्णू सवरा यांची उणीव भरून काढण्याचे काम करत या मतदारसंघात भाजपला मजबूत करण्याचे प्रयत्न केले आहेत. २0१४ च्या विधानसभा निवडणुकीत सेना, भाजपविरोधात लढलेल्या राष्ट्रवादी आणि मनसेच्या नेत्यांना भाजपमध्ये खेचण्याचे काम कपिल पाटील यांनी केले आहे.राष्ट्रवादीचे महादेव घाटाळ व मनसेचे दशरथ पाटील यांच्या प्रवेशाने भाजपची ताकद वाढली. राष्ट्रवादी आणि काँग्रेसची वाताहत झाली असून, याचा फायदाही भाजपला होत आहे. त्यामुळे या मतदारसंघासाठी भाजपने काही डावपेच आखलेत.मात्र २0१९ च्या लोकसभा निवडणुकीत युती करताना भाजपने दिलेल्या शब्दामुळे राजकीय ताकद वाढवूनही भाजपला या मतदारसंघावर पाणी फेरावे लागणार आहे. शिवसेनेसाठी हा मुद्दा फायद्याचा ठरण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाbhiwandi-rural-acभिवंडी ग्रामीण