शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान विष्णू यांच्यावरील वक्तव्यासंदर्भात CJI बीआर गवई यांचं स्पष्टिकरण; 'संयम राखायला हवा...', विश्वहिंदू परिषदेचा सल्ला
2
IND vs PAK हस्तांदोलन वादाचा खरा आरोपी सापडला... सामनाधिकारी पॉयक्रॉफ्टची चूकच नव्हती!
3
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
4
अंगणवाडी सेविकांना मिळणार स्मार्टफोन, वाढणार मानधन; योगी आदित्यनाथ यांची मोठी घोषणा
5
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
6
सुनेला वाचवण्यासाठी धावली सासू, पण तेवढ्यात धडाधड कोसळली भिंत, सून वाचली पण...  
7
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
8
सावधान! आयफोन १७च्या नावाखाली फसवणूक, सायबर गुन्हेगार 'असे' करतात खाते रिकामी
9
Sarva Pitru Amavasya 2025: सर्वपित्री अमावस्येला आहे सूर्यग्रहण; काळजीपूर्वक टाळा 'या' चुका!
10
बंगळुरुतील योग गुरुचा 8 महिलांवर अत्याचार; अल्पवयीन पीडितेने दाखवले धाडस, पोलिसांनी आवळल्या मुसक्या
11
३० पैशांवरुन २४ रुपयांवर आला 'हा' शेअर; १ लाखाचे केले ८ कोटी, गुंतवणूकदार मालामाल
12
GST कपातीनंतर Maruti ची मोठी घोषणा! S-Presso ₹ 3.50 लाखात तर Wagon R फक्त...
13
Surya Grahan 2025: ग्रहण सूर्याला मात्र 'या' राशींचे भाग्य येईल फळाला; १०० वर्षांनी जुळून आलाय अपूर्व योग!
14
पेन्शनधारकांसाठी गुड न्यूज! १ ऑक्टोबरपासून NPS चे नियम बदलणार, तरुणांना सर्वाधिक फायदा
15
पोहे आणि उपमा नेहमीच खातो पण त्याचे फायदे माहितीहेत का, दोघांपैकी आरोग्यासाठी बेस्ट काय?
16
पितृपक्ष २०२५ शिवरात्री: व्रतात ‘हे’ मंत्र म्हणा, महादेव प्रसन्न होतील, पूर्वज वरदान देतील!
17
Gold Silver Price 18 September: अचानक का कमी होताहेत सोन्या-चांदीचे दर; पुढेही सुरू राहणार का ही घसरण?
18
ऑनलाइन पद्धतीने मतदाराचे नाव मतदार यादीतून हटवता येते का? निवडणूक आयोग म्हणाले...
19
११ वर्षांनी लहान मुलाच्या प्रेमात पडली २८ वर्षांची तरुणी; लग्नाला नकार मिळाल्यावर मागू लागली ५० लाख!
20
Navi Mumbai: 'कपडे काढ नाहीतर तुझ्या भावालाच संपवेन'; 12 वर्षाच्या मुलीवर घरी नेऊन केला बलात्कार, नवी मुंबईतील घटना

‘एबीएल’चे ६ कोटींचे साहित्य पडून, चौकशीसाठी सदस्य सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 02:29 IST

- सुरेश लोखंडेठाणे : अ‍ॅक्टिव्हिटी बेस लर्निंग (एबीएल) या नावाचे नावीन्यपूर्ण मूल्यवर्धित शिक्षण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने तीन वर्षांपूर्वी लागू केले. त्यासाठी लागणारे प्रिंटेड कार्ड, ट्रे आणि रॅक, टेबल आदी खरेदीसाठी १० कोटींपैकी सुमारे सहा कोटी रुपये खर्चही झाले. मात्र, त्याचा लाभ अद्यापही विद्यार्थ्यांना झाला नाही. अधिकाऱ्यांनी मनमानी करून ...

- सुरेश लोखंडेठाणे : अ‍ॅक्टिव्हिटी बेस लर्निंग (एबीएल) या नावाचे नावीन्यपूर्ण मूल्यवर्धित शिक्षण जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने तीन वर्षांपूर्वी लागू केले. त्यासाठी लागणारे प्रिंटेड कार्ड, ट्रे आणि रॅक, टेबल आदी खरेदीसाठी १० कोटींपैकी सुमारे सहा कोटी रुपये खर्चही झाले. मात्र, त्याचा लाभ अद्यापही विद्यार्थ्यांना झाला नाही. अधिकाऱ्यांनी मनमानी करून सेसचा निधी खर्च केल्याचा आरोप आता जिल्हा परिषदेच्या सदस्यांकडून होत आहे. या घोटाळ्याच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्याचेही सध्या प्रयत्न सुरू आहेत.विभाजनानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना विलंब झाला. दरम्यानच्या काळात प्रशासकाद्वारे जिल्हा परिषदेचे कामकाज सुरू होते. याच कालावधीत शिक्षण विभागाने सेस निधीतून सुमारे १० कोटी खर्चाचे ‘एबीएल’ हे नावीन्यपूर्ण शिक्षण देण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी सहा कोटी खर्चही झाले. मात्र, हे साहित्य शाळांमध्ये धूळखात पडून आहे. त्यावर, जि.प. सदस्यांनी लक्ष केंद्रित करून या घोटाळ्याच्या चौकशीसाठी समिती गठीत करण्याचा निर्णयही घेतला. पण, प्रशासनाकडून अद्यापही त्यास प्रतिसाद मिळत नसल्यामुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.पुणे जिल्ह्यातील काही शाळांमध्ये हा एबीएलचा प्रयोग करण्यात आला होता. पण, तो यशस्वी झाला नव्हता. तरीदेखील तत्कालीन शिक्षणाधिकारी मीना यादव यांनी हट्ट करून ठाणे जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये एबीएल लागू केले. त्यास तत्कालीन प्रशासकांचाही पाठिंबा होता.काही शाळांमध्ये हा प्रयोग प्रायोगिक तत्त्वावर करता आला असता. परंतु, मनमानी करून जिल्ह्यातील सुमारे एक हजार ३६३ शाळांमध्ये एकाच वेळी तो लागू केल्याने पूर्णत: फसला. महिनाभरही विद्यार्थ्यांना या एबीएलचे ज्ञान मिळाले नाही. सहा कोटींपेक्षा जास्त निधी खर्च झालेल्या या एबीएलचे मूल्यमापनही प्रशासनाने केले नाही. पण, आता हा विषय जोर धरून सदस्यांनी प्रशासनास अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.शासनाची परवानगी नाहीएबीएलचा हा खर्चिक प्रयोग करण्यापूर्वी प्रशासनाने राज्य शासनाची परवानगी घेणेही गरजेचे होते. शासनाच्या परवानगीशिवाय एबीएलच्या नावाखाली शिक्षण विभागाने साडेसहा कोटींपेक्षा अधिक रक्कम खर्च करण्याची मनमानी केल्याचा आरोप सध्या होत आहे. या घोटाळ्याची चौकशी करून संबंधित अधिकाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी सदस्यांकडून आहे. प्रशासन मात्र हा विषय गांभीर्याने घेत नसल्याचे दिसून येत आहे. समिती गठीत करण्याचा निर्णय होऊनही ती करण्यास टाळाटाळ होत असल्याच्या वृत्तास जिल्हा परिषदेचे सदस्य सुभाष घरत यांनीही दुजोरा दिला आहे. दोषींना पाठीशी घालणाºया प्रशासनाने प्रतिसाद न मिळाल्यास न्यायालयात धाव घेणार असल्याचेही लोकमतला सांगितले.

टॅग्स :thaneठाणे