शहरं
Join us  
Trending Stories
1
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
2
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
3
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
4
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
5
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
6
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
7
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
8
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
9
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
10
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
11
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
12
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
13
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
14
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
15
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण
16
टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसंदर्भात ICC ची मोठी घोषणा; सलामीच्या लढतीसह फायनलची तारीख ठरली!
17
छाया कदम यांनी 'ती' गोष्ट अभिमानाने सांगितली अन् अडचणी वाढल्या; अभिनेत्रीची होणार चौकशी
18
Traffic News: पुणे-मुंबई एक्सप्रेसवेवर मोठी वाहतूक कोंडी, ५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा
19
अरे व्वा! रुग्णालयात अनोखा विवाहसोहळा, आजारी वधूला उचलून घेऊन नवरदेवाने घेतल्या सप्तपदी
20
'वेव्हज हे फक्त नाव नाही तर...'; PM मोदींनी WAVES परिषदेमध्ये मनोरंजन क्षेत्रासाठी केली मोठी घोषणा

कोरोनाकाळात ठाण्यातील ९९ कुपोषित बालके दगावली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2021 05:36 IST

जिल्ह्यातील गावपाड्यांत आजही १४७ बालके तीव्र (सॅम) कुपोषित आहेत. तर मध्यम (मॅम) कुपोषित १ हजार ५४३ बालके आहेत. कोरोनाची तिसरी लाट बालकांच्या दृष्टीने चिंता करणारी असल्याचे ऐकायला मिळत आहे

सुरेश लोखंडे

ठाणे : सध्याचा कोरोना महामारीचा काळ सर्वांसाठीच जीवघेणा ठरला आहे. यातही तग धरून, जीव मुठीत घेऊन जिल्ह्यात आदिवासी, दुर्गम, अतिदुर्गम आणि ग्रामीण भागांत १ हजार ६९० कुपोषित बालके जिल्ह्यात जगत आहेत. यातील तब्बल ९९ बालकांचा या महामारीच्या काळातील दीड वर्षात मृत्यू झाल्याचे वास्तव उघडकीस आले आहे.

जिल्ह्यातील गावपाड्यांत आजही १४७ बालके तीव्र (सॅम) कुपोषित आहेत. तर मध्यम (मॅम) कुपोषित १ हजार ५४३ बालके आहेत. कोरोनाची तिसरी लाट बालकांच्या दृष्टीने चिंता करणारी असल्याचे ऐकायला मिळत आहे. त्यात सध्या म्युकरमायकोसिस आणि आता डेल्टा प्लस या कोरोनाच्या विषाणूने डोकेवर काढले आहे. यावर मात करीत असतानाच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची टांगती तलवार चिंता करायला भाग पाडणारी आहे. तिचा कहर लहानग्यांच्या जिवावर उठणारा असल्यामुळें त्यावर मात करण्यासाठी यंत्रणा सज्ज झाली आहे.

गावपाड्यांतील बालकांचे विविध स्वरूपाचे रखडलेले लसीकरण करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी आरोग्य यंत्रणेस तैनात केले आहे. गेल्या दीड वर्षांच्या कालावधीत ९९ बालकांचा मृत्यू झाल्याचे आढळून आहे. यामध्ये मार्चपर्यंत ० ते १ वर्षापर्यंतच्या ६९ बालकांच्या मृत्यू झाला आहे. तर एक ते सहा वयोगटातील १८ बालके दगावली आहेत. याशिवाय मे अखेरपर्यंत १२ बालकांचा मृत्यू झाला आहे. यात एक वर्षापर्यंतची नऊ आणि सहा वर्षांची तीन बालके दगावली आहेत. तीन वर्षांच्या तुलनेत दगावलेली ९९ बालके आहेत. यामध्ये २०१७-१८ या वर्षाचा विचार करता ७५ बालके दगावली आहेत, तर २०१९ ला ६६ बालके आणि २०२० या वर्षात ६७ बालके दगावली आहेत.

ही आहेत मृत्यूची कारणेअँसपेक्शिया म्हणजे गुदमरून दगावलेल्या सर्वाधिक १४ बालकांचा समावेश आहे. याखालोखाल ॲस्पिरेशन न्यूमोनियाने नऊ बालके दगावली आहेत. कमी वजनाची आठ बालके व कमी दिवसांची पाच बालके दगावली आहेत. जन्मतः व्यंगाची तीन, हृदय विकाराचे दोन, हायपोथर्मियाची दोन बालके दगावली आहेत. एआरडीएसने दोन, श्वासावरोखाने तीन बालकांचा मृत्यू झाला. सेप्टिसिमियाने सहा बालके, अतिज्वराने एक, एपीलेप्सीने, अपघाताने दोन मयत झाली. हेड इंज्युरी, भाजल्याने, श्वानदंश, सर्पदंश प्रत्येकी एक आणि इतर आजाराने ११ बालके दगावलेली आहेत.

कोरोनाच्या कालावधीत दगावलेल्या बालकांची गांभीर्याने दखल घेऊन जिल्ह्यातील बालकांची आरोग्य तपासणी बालरोगतज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. यासाठी ग्रामीण भागातील गावपाड्यात आरोग्य यंत्रणा तैनात केली आहे.- डाॅ. मनीष रेंघे,आरोग्य अधिकारी, जि.प. ठाणे

टॅग्स :thaneठाणे