शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

राज्य सरकारचे दुर्लक्ष; केंद्राच्या जलयुक्त मंत्रालयानेही फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:20 IST

कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढल्यामुळे कोल्हापूर, सांगली भागात प्रत्येक पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होते. कृष्णा, भीमा या नद्यांच्या खोऱ्यात ...

कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढल्यामुळे कोल्हापूर, सांगली भागात प्रत्येक पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होते. कृष्णा, भीमा या नद्यांच्या खोऱ्यात आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी असते. हे अतिरिक्त पाणी कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात वाहून जाते. ते पाणी भीमा नदीच्या खोऱ्यात आणण्यासाठी हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला होता. केंद्रात भाजपची सत्ता आल्यावर गेली १७ वर्षे वनवासात असलेल्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेला आता गती मिळेल अशी आशा पल्लवित झाली होती.

पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांतील ३१ तालुक्यांतील १४ लाख हेक्‍टर जमीन सिंचनाखाली येणार होती. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा, कोयना, पंचगंगा या नद्यांचे पावसाळ्यात वाहून जाणारे ११५ टीएमसी पाणी अडवून ते दुष्काळी भागात देण्यासाठी २६ मे २००४ साली कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना शासन दरबारी मांडली.

दुर्लक्षामुळे १७ वर्षे योजना रखडली

तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी शासनाने प्रशासकीय मान्यता दिली. त्यानंतर या योजनेकडे शासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे ही योजना १७ वर्षे रखडली. या योजनेअंतर्गत ११५ टीएमसी पाण्यातील ५५ टीएमसी पाणी उजनी धरणात येणार असल्यामुळे दुष्काळी भागातील सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यांना वरदान ठरणार होते.

कृष्णा पाणी तंटा लवादचा निर्णय

कृष्णा नदी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या तीन राज्यातून वाहते. या नदीच्या खोऱ्यातून उपलब्ध पाण्याचे वाटप तीन राज्यांमध्ये ५८५ टीएमसी पाणी महाराष्ट्र राज्याच्या वाट्याला, ७३४ टीएमसी पाणी कर्नाटक व ८११ टीएमसी पाणी आंध्रप्रदेशसाठी वाटप करण्यात आले आहे. हे पाणी कृष्णा खोऱ्यातून भीमा खोऱ्यामध्ये पाणी वळविण्यास मनाई केली आहे. त्यामुळे कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना राबविता येणार नाही हा निर्णय देण्यात आला. त्यामुळे लवादाच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयातसुद्धा जाता येत नाही. कायदेशीर अडचणीमुळे हा प्रकल्प गुंडाळून ठेवण्यात आला.