शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

राज्य सरकारचे दुर्लक्ष; केंद्राच्या जलयुक्त मंत्रालयानेही फिरविली पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2021 04:20 IST

कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढल्यामुळे कोल्हापूर, सांगली भागात प्रत्येक पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होते. कृष्णा, भीमा या नद्यांच्या खोऱ्यात ...

कर्नाटकातील अलमट्टी धरणाची उंची वाढल्यामुळे कोल्हापूर, सांगली भागात प्रत्येक पावसाळ्यात पूर परिस्थिती निर्माण होते. कृष्णा, भीमा या नद्यांच्या खोऱ्यात आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी असते. हे अतिरिक्त पाणी कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात वाहून जाते. ते पाणी भीमा नदीच्या खोऱ्यात आणण्यासाठी हा प्रकल्प प्रस्तावित करण्यात आला होता. केंद्रात भाजपची सत्ता आल्यावर गेली १७ वर्षे वनवासात असलेल्या कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजनेला आता गती मिळेल अशी आशा पल्लवित झाली होती.

पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील सहा जिल्ह्यांतील ३१ तालुक्यांतील १४ लाख हेक्‍टर जमीन सिंचनाखाली येणार होती. माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील व विधानपरिषदेचे आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील त्यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा, कोयना, पंचगंगा या नद्यांचे पावसाळ्यात वाहून जाणारे ११५ टीएमसी पाणी अडवून ते दुष्काळी भागात देण्यासाठी २६ मे २००४ साली कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना शासन दरबारी मांडली.

दुर्लक्षामुळे १७ वर्षे योजना रखडली

तत्कालीन काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी शासनाने प्रशासकीय मान्यता दिली. त्यानंतर या योजनेकडे शासनाने दुर्लक्ष केले. त्यामुळे ही योजना १७ वर्षे रखडली. या योजनेअंतर्गत ११५ टीएमसी पाण्यातील ५५ टीएमसी पाणी उजनी धरणात येणार असल्यामुळे दुष्काळी भागातील सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, उस्मानाबाद व बीड जिल्ह्यातील विविध तालुक्यांना वरदान ठरणार होते.

कृष्णा पाणी तंटा लवादचा निर्णय

कृष्णा नदी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रप्रदेश या तीन राज्यातून वाहते. या नदीच्या खोऱ्यातून उपलब्ध पाण्याचे वाटप तीन राज्यांमध्ये ५८५ टीएमसी पाणी महाराष्ट्र राज्याच्या वाट्याला, ७३४ टीएमसी पाणी कर्नाटक व ८११ टीएमसी पाणी आंध्रप्रदेशसाठी वाटप करण्यात आले आहे. हे पाणी कृष्णा खोऱ्यातून भीमा खोऱ्यामध्ये पाणी वळविण्यास मनाई केली आहे. त्यामुळे कृष्णा-भीमा स्थिरीकरण योजना राबविता येणार नाही हा निर्णय देण्यात आला. त्यामुळे लवादाच्या निर्णयाच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयातसुद्धा जाता येत नाही. कायदेशीर अडचणीमुळे हा प्रकल्प गुंडाळून ठेवण्यात आला.