शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तिलारी रस्ता धोकादायक

By admin | Updated: August 9, 2014 00:37 IST

दुरूस्तीची मागणी : ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य

शिरीष नाईक - कसई दोडामार्ग - तालुक्यातील राज्य मार्ग व जिल्हा परिषद अंतर्गत रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषद बांधकाम विभागाचा दुर्लक्ष झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करणे म्हणजे अपघातास निमंत्रण देणे आहे. रस्त्यावरील खड्डे पावसाळी डांबरीकरणाने दुरुस्त करणे आवश्यक होते. मात्र, या खड्ड्यामध्ये माती टाकून रस्ते दुरुस्त केले जात असल्यामुळे वाहनचालक व ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. तालुक्यातील दोडामार्ग ते तिलारी हा राज्यमार्ग पूर्णपणे वाहतुकीस खराब झाला आहे. या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. रस्त्यावरील मोऱ्याही निकृष्ट झाल्या आहेत, तर काही ठिकाणी भगदाडे पडली आहेत. या खड्ड्यामध्ये पावसात पाणी साचल्याने खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत. हा रस्ता हॉटमिक्स डांबरीकरण मंजूर करण्यात आला, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत होते. मात्र, अद्यापपर्यंत या रस्त्याचे डांबरीकरण न झाल्याने निधी कुठे गेला, असा प्रश्न पडणे साहजिकच आहे. तसेच दोडामार्ग ते आयी रस्ता, दोडामार्ग ते पिकुळे, उसप, सासोली ते कोलझर, कळणे ते तळकट या रस्त्याची अवस्थाही बिकट झाली आहे. याही रस्त्यावर मोठ्याप्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे या रस्त्यावरून वाहतूक करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. कोकणवासीयांचे आराध्य दैवत श्री गणेशाचे आगमन २९ आॅगस्टला होणार असल्याने या खड्डेमय रस्त्यांवरून ‘गणपती बाप्पाला कसे आणायचे’ असा प्रश्न ग्रामस्थांना पडला आहे. ‘घरी येताना आणि परत जाताना स्वत:ची काळजी घेत सुखरूप रहा’ असे गणपती बाप्पालाही सांगण्याची वेळ यावी, अशी स्थिती रस्त्यांची झाली आहे. बांधकाम विभागाने रस्त्याच्या डागडुजीकडे व नवीन डांबरीकरण रस्त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे. नवीन शाखा डांबरीकरण करताना त्यामध्ये डांबराचा वापर कमी व आॅईल, रॉकेलचा वापर जास्त केला जातो. ५० टक्के रक्कम आपल्याला कशी शिल्लक राहील, याकडेच ठेकेदाराचे जास्त लक्ष असते. त्यामुळे तालुक्यातील रस्ते खराब झाले आहेत. अशा ठेकेदारांनी केलेले रस्ते खराब निघाल्यास त्यांंची नावे काळ्या यादीत टाकावीत. तरच कामे दर्जेदार होतील. अन्यथा रस्त्यांची अवस्था अशीच राहणार आहे. रस्त्यांना गटार नसल्याने गटाराचे पाणी रस्त्यावर येत आहेत. त्यामुळे जास्तीत जास्त रस्ते खड्डेमय झाले आहेत. तसेच रस्त्याच्या बाजूला वाढलेल्या झाडीमुळेही वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे संपूर्ण रस्त्याची डागडुजी करताना, गटार, झाडी तोडणे व बांधकाम विभागाने कमिशन न घेणारा अधिकारी ठेवला तरच रस्त्यांची कामे दर्जेदार होणार आहेत.