शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू काश्मीरपासून पंजाब, दिल्लीपर्यंत महापूर! अनेक रस्ते पाण्याखाली, वाहनांच्या भल्या मोठ्या रांगा...
2
...तर सर्व मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळणार; सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ विधिज्ञ सिद्धार्थ शिंदे म्हणाले...
3
सरकारनं जीआर काढला, मनोज जरांगेंनी उपोषण सोडलं; नेमका कुणाला मिळणार लाभ? फडणवीसांनी सांगितलं!
4
जीएसटी कपातीबाबत ऑटो कंपन्यांना आधीच माहिती होते? विक्री घसरली की मुद्दाम कमी केली... 
5
हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेट म्हणजे काय? मराठा आरक्षणाशी काय संबंध? जाणून घ्या...
6
मोठ्ठा विकेंड? ८ सप्टेंबरला ईदची सार्वजनिक सुट्टी मिळणार? आमदार असलम शेख यांची मागणी, मुख्यमंत्र्यांना पत्र
7
अफगाणिस्तान पुन्हा भूकंपाने हादरला, २४ तासांत दुसरा मोठा धक्का; मदतकार्यात अडथळे
8
Big Breaking: ते तिघे आले नाहीत तर नाराजी तशीच राहणार; अखेर मनोज जरांगेंनी उपोषण सोडले
9
रिलायन्स-सुझलॉनसह 'हे' ५ शेअर करणार कमाल! ब्रोकरेज फर्मने दिली टार्गेट प्राइज; ३८ टक्केंपर्यंत होणार वाढ?
10
जगभरातील प्रेमी युगुलांना एकत्र आणणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सीईओची नोकरी गेली; कर्मचाऱ्यासोबत प्रेमसंबंध भोवले
11
कन्नड अभिनेत्री रान्या राव हिला DRI ने ठोठावला 102 कोटी रुपयांचा दंड
12
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: सर्व मागण्या मान्य; मनोज जरांगे पाटील यांनी अखेर आपले उपोषण सोडले
13
'मराठा-कुणबी एक' जीआर काढण्यासंदर्भात काय म्हणालं सरकारचं शिष्टमंडळ? जरांगेंनी स्वतःच सांगितलं
14
तुमच्या ताकदीवर आपण जिंकलो, मनोज जरांगेंची घोषणा; वाचा, ८ मागण्या अन् ८ सरकारी आश्वासने कोणती?
15
टीम इंडियाला लवकरच मिळणार नवा Sponsor! या मंडळींसाठी BCCI नं लावली नो एन्ट्रीची पाटी
16
मुकेश अंबानींच्या कंपनीचा शेअर १०% नं वाढला, खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड; आता ₹१९ वर आला
17
लग्नाच्या १७ वर्षांनंतर राहुल देशपांडेच्या संसाराचे सूर बिघडले, पत्नीपासून झाला विभक्त
18
चेन स्मोकर आहे किम जोंग उन! उत्तर कोरियाचा हुकूमशहा एका दिवसात किती सिगारेट ओढतो?
19
मराठा आरक्षणाबाबत हैदराबाद गॅझेटिअरवर पहिला GR प्रसिद्ध; वाचा जशाच्या तसा संपूर्ण शासन निर्णय
20
लाखोंचा खर्च टाळला, अवघ्या २ हजारांत केले लग्न; IAS युवराज अन् IPS मोनिका यांची प्रेम कहाणी

बनावट कॉल्सचा सुळसुळाट

By admin | Updated: September 16, 2016 23:49 IST

पोलिसांकडून जागृती : नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे

मालवण : अलीकडील काही काळात बनावट कॉल्सचे प्रमाण वाढले आहे. याबाबत जनजागृती करूनही सुशिक्षित नागरिक फसले जात आहेत. कॉल करणाऱ्या संबंधित कंपनीकडून दाखविण्यात येणाऱ्या आर्थिक प्रलोभनांना अनेकजण बळी पडत असून, त्यांच्यावर पश्चात्ताप करत बसण्याची वेळ आली आहे. बनावट कॉल्सचा सुळसुळाट फार वाढला असून विविध आर्थिक आमिषांची गाजरे दाखवून क्षणार्धात ‘कंगाल’ करण्याची किमया बनावट कॉल्सधारक करत आहे. याबाबत पोलिसांकडून वारंवार जागृती केली जात असली तरी बनावट कॉल्सच्या मुळापर्यंत पोहोचण्यास यश मिळाल्याचे ऐकिवात नाही. त्यामुळे अशा कॉल्सचा धुमाकूळ थांबणार तरी कधी? असा सवाल उपस्थित केला जात आहे.मालवण शहरातील अनेक जणांना आॅगस्ट महिन्यात बनावट कॉल्सनी हैराण केले होते. सर्वसामान्यांसह शिक्षक, प्राध्यापक, पोलीस, राजकीय पदाधिकारी यांना अशा पद्धतीने कॉल्स आले होते. मात्र, यातील एकानेही त्यांच्या प्रलोभनाला बळी न पडता सावधगिरी बाळगली. मात्र, काहीजण प्रलोभनाला बळी पडतात. भारतभर मोबाईलचे जाळे व्यापक बनल्याने कोणत्याही प्रांतातून फोन येतात. अधिकतर ते बँकेतून बोलतोय, एटीएम अपडेट करायच्या बहाण्याने गंडा घालतात, तर काही विमा पॉलिसीसाठी तुमची निवड झाली असून काही रक्कम भरणा करा, असे सांगतात. तुम्ही लाखो डॉलर्सचे बक्षीस जिंकला आहात, दिलेल्या खात्यात पैसे भरा मग तुमचे बक्षीस अदा केली जाईल, अशा बनावट मेल्स आणि कॉल्सच्या माध्यमातून फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. अशा प्रकारच्या कॉल्सला प्रतिसाद देणाऱ्या अनेकांची फसवणूक झाल्यामुळे त्यांच्यावर मन:स्ताप सहन करण्याची वेळ येत आहे. मालवणात दोन दिवसांपूर्वी एका युवकाला कर्जाचे आमिष दाखवून दोन लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. (प्रतिनिधी)पोलिसांकडून जागरूकता पण...बनावट कॉल्स तसेच फसवणुकीबाबत पोलिस प्रशासनाकडून दखल घेण्यात येत आहे. ठिकठिकाणी फसवणुकीचा धंदा करणाऱ्यांबाबत जनजागृती फलक लावण्यात येत आहेत.मात्र, एखादा नागरिक बनावट कॉल्सच्या प्रलोभनास बळी पडला तर त्याला न्याय मिळत नाही. बनावट कॉल्स करणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचण्यास पोलिस अयशस्वी ठरले आहेत. ४फसवणूक करणाऱ्या संबंधितांना गजाआड करण्यासाठी सायबर क्राईमअंतर्गत उपाययोजना होणे गरजेचे आहे. गरजू पडतात बळीगेल्या काही वर्षांत बनावट कॉल्सला अनेकजण बळी पडले असून, यातील अनेकांना पैशाची गरज असते. त्यांच्या दुर्दैवाने अशाच वेळी एखादा कॉल आल्यास ते आपली वस्तुस्थिती सांगून बँक नंबर, पिन नंबर देऊन मोकळे होतात. काहीवेळा तर उसने पैसे घेऊन संबंधिताच्या खात्यात जमा करावे लागतात. अशा घटना घडत असताना हे प्रकार मात्र थांबत नाहीत. बनावट कॉलच्या भूलभुलैयाला अधिकारी वर्गही भुलला असून 'कंगाल' होण्याची नामुष्की ओढवल्याच्या घटना घडल्या आहेत. बनावट कॉल्सद्वारे आर्थिक फसवणुकीचा धंदा काही भामट्यांनी सुरू केला असून, याबाबत पोलिसांत तक्रारी येण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगणे गरजेचे आहे.'त्यांची' अशीही दहशतसुज्ञ नागरिकाने बनावट कॉल्सधारकांची फिरकी घेण्याचा प्रयत्न केला तर ते उलटपक्षी धमकी देताना शिवीगाळ करून कॉल्स कट करतात. त्यानंतर त्याच नंबरवर कॉल करून त्यांना पोलिसात तक्रार दिली आहे, असे सांगितल्यावर आमच्या नावाची तुम्ही बदनामी केली आहात. तुमच्याच विरोधात तक्रार दिली असून तुम्हालाच पोलिस पकडतील. शिवाय शिवीगाळ करूनही फोन कट करण्याचे प्रतापही केले जातात.