शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! उद्धव ठाकरेंसह २ प्रमुख नेते 'शिवतीर्थ'वर दाखल; मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची घेतली भेट
2
जगदीप धनखड यांना किती मते मिळाली होती?; उपराष्ट्रपती निवडणुकीत विरोधकांची मते यंदा दुपटीनं वाढली
3
एकीकडे मोदींना 'मित्र' म्हणायचं तर दुसरीकडे 'हे' पाऊल उचलायचं; ट्रम्पचा नेमका 'प्लॅन' काय?
4
बायकोने नवऱ्याला ट्रॅक करून पकडलेले आठवतेय...; Jio ने तस्सेच डिव्हाईस आणले, एकदा चार्ज केले की...
5
आधी चर्चेला बोलावलं अन् नंतर हाकलून लावलं; नेपाळमध्ये Gen-Zसोबत चर्चेचा खेळ गडबडला?
6
ITR भरण्याची अंतिम तारीख जवळ; आता मोबाईल ॲपवरूनही सहज करता येणार रिटर्न फाइल
7
Gold Silver Price 10 September: मोठ्या तेजीनंतर सोन्या-चांदीचे दर आज घसरले; पाहा १४ ते २४ कॅरेटसाठी आता किती खर्च करावा लागणार
8
Video - परिस्थिती भीषण! जे दिसलं, ते सर्वच लुटलं... नेपाळमध्ये Gen-Z आंदोलनकर्त्यांचा धुडगूस
9
नेपाळच्या माजी पंतप्रधानांना पत्नीसह बेदम मारले; जमावाच्या तावडीतून सैन्यानं कसं वाचवले?
10
iPhone 17: भारत, दुबई, अमेरिका की इतर कुठे; कोणत्या देशात आयफोन १७ मिळतोय स्वस्त? वाचा
11
जीएसटी कपातीच्या तोंडावर TVS NTORQ 150 लाँच; नव्या रुपात आली हायपर स्पोर्ट्स स्कूटर
12
सगळ्यात स्वस्त ७ सीटर असणाऱ्या 'या' कारची किंमत ९६ हजारांनी झाली कमी! आता कितीला मिळणार?
13
'मुंबईत घर घेणं आम्हाला परवडत नाही'; ८१ टक्के लोकांचं स्पष्ट मत, सर्वेक्षणात काय म्हटलंय? 
14
'हॉटेल जाळले, लोक पर्यटकांनाही सोडत नाहीत'; नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय महिलेने सांगितली आपबिती
15
फेसबुक, इन्स्टाग्राम की ट्विटर सर्वाधिक कमाई नेमकी कुठून होते? जाणून घ्या सविस्तर
16
आलिशान कार, ३२ किलो सोन्या-चांदीची बिस्किटं, दागिने; काँग्रेस आमदाराकडे कोट्यवधींचं घबाड
17
दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, देशभरातून ९ संशयित ISIS दहशतवादी ताब्यात!
18
पोलिसांना पाहताच उठून उभा राहिला पाण्यात पडलेला मृतदेह, व्हिडीओ काढणारे झाले अवाक्
19
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! 'या' दिवशी ९० मिनिटांसाठी बंद राहणार UPI सेवा, जाणून घ्या
20
राहा फिट! वेट लॉससाठी व्हायरल होतंय ६-६-६ वॉकिंग चॅलेंज; बारीक होण्याचा सुपरहिट फॉर्म्युला?

दुष्काळ परिस्थितीवर हळवे पीक योग्य

By admin | Updated: July 19, 2015 23:37 IST

कमी पाऊस : पर्यायी उपायाचा स्वीकार करण्याची गरज

शिवाजी गोरे- दापोली -कोकणात दरवर्षी नैसर्गिक बदलाचा परिणाम जाणवतो. कधी काळी कोकणात धो-धो कोसळणाऱ्या पावसाचे प्रमाण आता कमी होऊ लागले आहे. त्यामुळे भविष्यात कोकणचे मुख्य पीक भात धोक्यात येऊ शकते. नैसर्गिक बदलाला सामोरे जाण्यासाठी शेतकऱ्याने आता नागली व हळव्या भातपिकाकडे वळण्याची गरज आहे. कारण हळवी भात पिके १०० ते १२० दिवसात तयार होतात. या पिकांना पाऊसही कमी लागतो. त्यामुळे शेतकऱ्याने कमी पावसात कोणती पिके घ्यावीत, याचा प्राधान्याने विचार करायला हवा, असे मत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे (डायरेक्टर आॅफ रिसर्च सीड) डॉ. ए. के. शिंदे यानी व्यक्त केले.कोकणात गेली दोन वर्षे ऐन भात लावणीत पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्याची भातलावणीची कामे रखडतात. भात लावणीला उशीर झाल्याने त्याचा पिकावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे कमी पावसात कोणती पिके घेता येतील, यावर कृ षी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ संशोधन करीत असून, उशिरा भात लावणी होऊनसुद्धा भातपीक घेण्यासाठी कमी कालावधीतील हळव्या भाताच्या जातीचा पर्याय समोर आला आहे. त्याचप्रमाणे नागली पीकसुद्धा कमी पावसाचा पर्याय म्हणून समोर आले आहे. कमी पावसात उशिरा लावणीसाठी रत्नागिरी - ७३, कर्जत - १८४, रत्ना कर्जत -१, रत्नागिरी - २४, रत्नागिरी - ७११, रत्नागिरी - १, कर्जत - ४ या हळव्या जातीच्या वाणांचा वापर करता येईल. यामुळे उशिरा पेरणी व लावणी करुनसुद्धा फायदा होईल.नागली पिकाची लागवड वरकस आणी उतार असलेल्या जमिनीत केली जाते. खरीप हंगामात कोकणात नागलीची लागवड केली जाते. हलक्या सरीचा पाऊससुद्धा यासाठी चालू शकतो. रोपे तयार झाल्यावर उशिरा लावणी करुनसुद्धा नागलीचे चांगले पीक येऊ शकते. त्यामुळे नागली पीक घेणे योग्य आहे.पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. भाताची लावणी अजूनही संपलेली नाही. भात लावणीला उशीर झाला आहे. त्यामुळे भात पिकाच्या कालावधीत वाढ होण्याची शक्यता आहे. पाणथळ जमिनीत शेतकऱ्यानी भातलावणी केली आहे. परंतु ज्या ठिकाणी पाणीच नाही, त्या ठिकाणच्या शेतकऱ्याची भात लावणी रखडली आहे. शेतकऱ्यांनी शेततळ्यांचा पर्याय स्वीकारायला हवा. पेरणी झाल्यावर किंवा लावणी झाल्यावर पावसाने दडी मारली तर शेततळ्यातील पाणी देऊन भाताची रोपे जगवता आली पाहिजेत. त्यादृष्टीने शेतकऱ्याने आपल्या शेतीत पाण्याची सोय करायला हवी. भविष्यातील अडचणी लक्षात घेऊन शेतकऱ्याने सर्व पर्याय उपलब्ध करुन घ्यायला हवेत.शेतकरी दोन - तीन वर्षे जुनेच भात बियाणे वापरतात. परंतु दरवर्षी संकरित बियाणे वापरल्यास भातपीक जोमाने येते. परंतु तेच बियाणे दरवर्षी वापरल्यास त्याचा जोम कमी कमी होत जातो. भात पिकात अनेक संशोधन करुन शास्त्रज्ञ शेतकऱ्याला वेगवेगळे पर्याय उपलब्ध करुन देत आहे. बियाणे अधिक काळ टिकविण्यासाठी साठवण पद्धतीत सुधारणा करणे आवश्यक आहे. सध्या भात बियाण्याची साठवण करणारी पिशवी कापडी आहे. ही पिशवी केवळ एक ते दोन वर्षे टिकते. परंतु भात बियाण्याची साठवण क्षमता वाढविण्यासाठी बियाणे तीन ते चार वेळा वाळवून, प्लास्टिकच्या पिशवीत पॅकिंग केल्याने दोन ते तीन वर्षे बियाणे चांगल्या पद्धतीने राहू शकते.