शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळ परिस्थितीवर हळवे पीक योग्य

By admin | Updated: July 19, 2015 23:37 IST

कमी पाऊस : पर्यायी उपायाचा स्वीकार करण्याची गरज

शिवाजी गोरे- दापोली -कोकणात दरवर्षी नैसर्गिक बदलाचा परिणाम जाणवतो. कधी काळी कोकणात धो-धो कोसळणाऱ्या पावसाचे प्रमाण आता कमी होऊ लागले आहे. त्यामुळे भविष्यात कोकणचे मुख्य पीक भात धोक्यात येऊ शकते. नैसर्गिक बदलाला सामोरे जाण्यासाठी शेतकऱ्याने आता नागली व हळव्या भातपिकाकडे वळण्याची गरज आहे. कारण हळवी भात पिके १०० ते १२० दिवसात तयार होतात. या पिकांना पाऊसही कमी लागतो. त्यामुळे शेतकऱ्याने कमी पावसात कोणती पिके घ्यावीत, याचा प्राधान्याने विचार करायला हवा, असे मत डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे (डायरेक्टर आॅफ रिसर्च सीड) डॉ. ए. के. शिंदे यानी व्यक्त केले.कोकणात गेली दोन वर्षे ऐन भात लावणीत पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्याची भातलावणीची कामे रखडतात. भात लावणीला उशीर झाल्याने त्याचा पिकावर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे कमी पावसात कोणती पिके घेता येतील, यावर कृ षी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ संशोधन करीत असून, उशिरा भात लावणी होऊनसुद्धा भातपीक घेण्यासाठी कमी कालावधीतील हळव्या भाताच्या जातीचा पर्याय समोर आला आहे. त्याचप्रमाणे नागली पीकसुद्धा कमी पावसाचा पर्याय म्हणून समोर आले आहे. कमी पावसात उशिरा लावणीसाठी रत्नागिरी - ७३, कर्जत - १८४, रत्ना कर्जत -१, रत्नागिरी - २४, रत्नागिरी - ७११, रत्नागिरी - १, कर्जत - ४ या हळव्या जातीच्या वाणांचा वापर करता येईल. यामुळे उशिरा पेरणी व लावणी करुनसुद्धा फायदा होईल.नागली पिकाची लागवड वरकस आणी उतार असलेल्या जमिनीत केली जाते. खरीप हंगामात कोकणात नागलीची लागवड केली जाते. हलक्या सरीचा पाऊससुद्धा यासाठी चालू शकतो. रोपे तयार झाल्यावर उशिरा लावणी करुनसुद्धा नागलीचे चांगले पीक येऊ शकते. त्यामुळे नागली पीक घेणे योग्य आहे.पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहे. भाताची लावणी अजूनही संपलेली नाही. भात लावणीला उशीर झाला आहे. त्यामुळे भात पिकाच्या कालावधीत वाढ होण्याची शक्यता आहे. पाणथळ जमिनीत शेतकऱ्यानी भातलावणी केली आहे. परंतु ज्या ठिकाणी पाणीच नाही, त्या ठिकाणच्या शेतकऱ्याची भात लावणी रखडली आहे. शेतकऱ्यांनी शेततळ्यांचा पर्याय स्वीकारायला हवा. पेरणी झाल्यावर किंवा लावणी झाल्यावर पावसाने दडी मारली तर शेततळ्यातील पाणी देऊन भाताची रोपे जगवता आली पाहिजेत. त्यादृष्टीने शेतकऱ्याने आपल्या शेतीत पाण्याची सोय करायला हवी. भविष्यातील अडचणी लक्षात घेऊन शेतकऱ्याने सर्व पर्याय उपलब्ध करुन घ्यायला हवेत.शेतकरी दोन - तीन वर्षे जुनेच भात बियाणे वापरतात. परंतु दरवर्षी संकरित बियाणे वापरल्यास भातपीक जोमाने येते. परंतु तेच बियाणे दरवर्षी वापरल्यास त्याचा जोम कमी कमी होत जातो. भात पिकात अनेक संशोधन करुन शास्त्रज्ञ शेतकऱ्याला वेगवेगळे पर्याय उपलब्ध करुन देत आहे. बियाणे अधिक काळ टिकविण्यासाठी साठवण पद्धतीत सुधारणा करणे आवश्यक आहे. सध्या भात बियाण्याची साठवण करणारी पिशवी कापडी आहे. ही पिशवी केवळ एक ते दोन वर्षे टिकते. परंतु भात बियाण्याची साठवण क्षमता वाढविण्यासाठी बियाणे तीन ते चार वेळा वाळवून, प्लास्टिकच्या पिशवीत पॅकिंग केल्याने दोन ते तीन वर्षे बियाणे चांगल्या पद्धतीने राहू शकते.