शहरं
Join us  
Trending Stories
1
आता खामेनेईचा खात्मा करणारच..: हॉस्पिटलवरील हल्ल्यानंतर इस्त्रायलचे खुले चॅलेंज
2
'हवाई हलकल्लोळ' सुरूच! आधी दिल्ली-लेह फ्लाइट... नंतर हैदराबाद-तिरूपती विमानाचा 'यू टर्न'
3
बसच्या तिकिटामुळे हत्या उघडकीस आली! पाच वर्षाचे रिलेशन, लग्नाची इच्छा, घडलं वेगळंच
4
Air India Plane Crash: 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला, चार मित्र गमावले'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला थरार
5
ठाकरेंसोबत रात्रीतून खेळ झाला! काल मातोश्रीवर आलेले 'ते' दोन नेते आज शिंदेंच्या शिवसेनेत
6
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
7
लीड्स टेस्टपूर्वीच टीम इंडियाला मोठा झटका, 259 धावा करणाऱ्या 'या' क्रिकेटरला दुखापत! नेमकं काय घडलं? आता कशी असेल प्लेइंग 11?
8
Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राहुल गांधी यांना वाढदिवसानिमित्त दिल्या खास शुभेच्छा, म्हणाले...
10
चालत्या रिक्षात अचानक झाला स्फोट; आगीत महिला प्रवासी जिवंत जळाली, ५ जण जखमी
11
अहमदाबाद विमान अपघात: Air India ४,०८० कोटी रुपयांचा 'इन्श्युरन्स क्लेम' करणार, इतिहासातील सर्वाधिक आकडा ठरणार?
12
Shree Swami Samarth: एक पैशाचा खर्च नाही, ‘हा’ उपाय एकदा करून पाहा; स्वामी कायम पाठीशी असतील, अशक्यही शक्य होईल!
13
Pandharpur Wari 2025: वारकऱ्यांसाठी टोलमाफी! पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना कसे मिळणार टोलमाफीचे पास?
14
Monolithisch India IPO Listing: ६२ टक्क्यांच्या प्रीमिअमसह लिस्टिंग, नंतर लागलं अपर सर्किट; पहिल्याच दिवशी गुंतणूकदार मालामाल
15
प्यार तूने क्या किया! बॉयफ्रेंडच्या घरात बसलेली बायको, संतापलेल्या नवऱ्याने घेतला नाकाचा चावा
16
Sonam Raghuvanshi : बनावट मृतदेह, संजय वर्मा...; राजा रघुवंशीच्या हत्येसाठी सोनम आणि राजचं खतरनाक प्लॅनिंग
17
Israel Rran War: अमेरिका आणि इस्रायलला इराणच्या अयातुल्लाह खामेनींनाच का संपवायचं आहे?
18
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात: हजारो कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार! AI खाणार का तुमच्या नोकऱ्या?
19
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, दोघांचा मृत्यू, सात जण जखमी
20
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं

शेतकऱ्यांना मिळणार मृद् आरोग्य कार्ड

By admin | Updated: April 30, 2015 00:28 IST

मृद् आरोग्य पत्रिका अभियान : मातीलाही द्यावी लागणार आता सुपिकतेची परीक्षा

मेहरुन नाकाडे - रत्नागिरी --शेतकऱ्यांच्या शेतातील मातीपरीक्षण करुन त्याला आवश्यक ती खते समतोल प्रमाणात दिल्याने जमिनीची सुपिकता टिकून उत्पादन क्षमता वाढते. पिकांना आवश्यक असलेल्या अन्न द्रव्यांचा समतोलपणा टिकून रहाण्यास मदत होते. यासाठी महाराष्ट्र शासनाने मृद् आरोग्य पत्रिका अभियान राबविण्याचे ठरविले आहे. त्यानुसार माती परीक्षण झाल्यानंतर शेतकऱ्यांना मृद् आरोग्य कार्ड देण्यात येणार आहेत.जिल्ह्यातील १५२५ गावातील शेतकऱ्यांच्या मातीची तपासणी केली जाणार आहे. १० हेक्टरला एक गट नमुन्याप्रमाणे ४० हजार नमुन्यांची तपासणी तीन वर्षात पूर्ण केली जाणार आहे. वर्षाला ५०० गावांचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. शासकीय प्रयोगशाळेत ७ हजार ६०० नमुन्यांची तपासणी केली जाणार आहे तर उर्वरित नमुने खासगी प्रयोगशाळेत तपासले जाणार आहेत. दापोली, अर्बन बँक, सायन्स कॉलेज, दापोली, डीबीजे महाविद्यालय, चिपळूण, कृ षी विज्ञान केंद्र देवधे, अ‍ॅग्रीकल्चर कॉलेज मांडकी, खरवते दहिवली कृषी महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत तपासण्या केल्या जाणार आहेत.शासनाकडून मृद् आरोग्य तपासणी विनामूल्य करण्यात येणार असून २०१५ ते २०१८ पर्यंत तपासणी पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्र तपासणी कार्ड वितरण केले जाणार आहे.जमिनीतील उपलब्ध घटकांचे प्रमाण तसेच दोष, जमिनीच्या प्रतीनुसार पिकांची निवड व नियोजन, जमिन सुधारण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना, खतांची संतुलीत मात्रा, संतुलीत खताचा पुरवठा झाल्याने उत्पादन क्षमता टिकून रहाते. या बाबींची पुर्तता माती परीक्षणामुळे होत असल्याने शेतकरी परीक्षण अहवाल प्रयोगशाळेतून स्वतंत्ररित्या मिळविण्याचा प्रयत्न आजपर्यंत करीत होते. परंतु आता हे परीक्षण शासनाकडून विनामुल्य होणार असल्याने शेतकरी वर्गाला आपल्या जमिनीची पोत, सुपिकता, उत्पादनक्षमता कळून येण्यास मदत होणार आहे.जिल्ह्याचे मुख्य पिक भात असून ७० हजार १९३ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात येते. दरवर्षी जिल्ह्यात सुमारे १ लाख ९६ हजार ५४०.४ मेट्रिक टन भाताचे उत्पादन होते़ नागली पिक दुय्यम पिक घेतले जाते. नागलीची लागवड १५ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर करण्यात येते. इतर तृणधान्य १८३० हेक्टर, उडीद १८८ हेक्टर, तूर २८० हेक्टर, कडधान्यांमध्ये मूग १४ हेक्टर, भुईमूग ९ हेक्टर, तीळ ४१ हेक्टर, कारळा ६२८ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात येते. कोकणच्या अर्थव्यवस्थेत आंबा पिकाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे. पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम विद्यापिठाने दिलेल्या सल्यानुसार दहा वर्षाचे आंब्याच्या झाड लावलेल्या मातीमध्ये १३८० ग्रॅम नत्र, ४८० ग्रॅम स्पुरद, ११६० ग्रॅम पालाशचे प्रमाण असणे आवश्यक आहे. तर भात लावलेल्या मातीमध्ये १०० किलो नत्र, ५० किलो स्पुरत, ५० किलो पालाश असणे आवश्यक आहे.उपयुक्त अभियानमातीतील घटकांचे प्रमाण कमी आढळल्यास त्याप्रमाणे खताचे डोस वाढविण्याचा सल्ला देण्यात येत असल्याने जमिनीची उत्पादकता वाढविणे, किंवा पोत सुधारण्यासाठी अभियान उपयुक्त ठरणार आहे.1अभियानातंर्गत जमिनीच्या सर्वसाधारण तपासणीमध्ये सामु, क्षारता, सेंद्रीय कर्ब, स्फुरद, पालाश तपासणी केली जाणार आहे.2सामु, क्षारता, सेंद्रीय कर्ब, स्फुरद, पालाश, सोडीयम, कॅल्शियम, मेग्नेशिअम, मुक्त चुना, जलधारणा, माती घनता, पोत तपासली जाणार आहे. 3सूक्ष्म मुलद्रव्ये मृद नमुन्यांतर्गत मातीमधील तांबे, जस्त, लोह, मंगल याचीही स्वतंत्रपणे तपासणी केली जाणार आहे.