शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
3
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
4
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
5
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
6
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
7
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
8
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
9
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
10
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
11
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
12
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
13
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
14
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
15
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
16
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
17
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
18
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
19
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
20
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांना मिळणार मृद् आरोग्य कार्ड

By admin | Updated: April 30, 2015 00:28 IST

मृद् आरोग्य पत्रिका अभियान : मातीलाही द्यावी लागणार आता सुपिकतेची परीक्षा

मेहरुन नाकाडे - रत्नागिरी --शेतकऱ्यांच्या शेतातील मातीपरीक्षण करुन त्याला आवश्यक ती खते समतोल प्रमाणात दिल्याने जमिनीची सुपिकता टिकून उत्पादन क्षमता वाढते. पिकांना आवश्यक असलेल्या अन्न द्रव्यांचा समतोलपणा टिकून रहाण्यास मदत होते. यासाठी महाराष्ट्र शासनाने मृद् आरोग्य पत्रिका अभियान राबविण्याचे ठरविले आहे. त्यानुसार माती परीक्षण झाल्यानंतर शेतकऱ्यांना मृद् आरोग्य कार्ड देण्यात येणार आहेत.जिल्ह्यातील १५२५ गावातील शेतकऱ्यांच्या मातीची तपासणी केली जाणार आहे. १० हेक्टरला एक गट नमुन्याप्रमाणे ४० हजार नमुन्यांची तपासणी तीन वर्षात पूर्ण केली जाणार आहे. वर्षाला ५०० गावांचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. शासकीय प्रयोगशाळेत ७ हजार ६०० नमुन्यांची तपासणी केली जाणार आहे तर उर्वरित नमुने खासगी प्रयोगशाळेत तपासले जाणार आहेत. दापोली, अर्बन बँक, सायन्स कॉलेज, दापोली, डीबीजे महाविद्यालय, चिपळूण, कृ षी विज्ञान केंद्र देवधे, अ‍ॅग्रीकल्चर कॉलेज मांडकी, खरवते दहिवली कृषी महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत तपासण्या केल्या जाणार आहेत.शासनाकडून मृद् आरोग्य तपासणी विनामूल्य करण्यात येणार असून २०१५ ते २०१८ पर्यंत तपासणी पूर्ण करण्याचे उद्दीष्ट आहे. तपासणी पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याला स्वतंत्र तपासणी कार्ड वितरण केले जाणार आहे.जमिनीतील उपलब्ध घटकांचे प्रमाण तसेच दोष, जमिनीच्या प्रतीनुसार पिकांची निवड व नियोजन, जमिन सुधारण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना, खतांची संतुलीत मात्रा, संतुलीत खताचा पुरवठा झाल्याने उत्पादन क्षमता टिकून रहाते. या बाबींची पुर्तता माती परीक्षणामुळे होत असल्याने शेतकरी परीक्षण अहवाल प्रयोगशाळेतून स्वतंत्ररित्या मिळविण्याचा प्रयत्न आजपर्यंत करीत होते. परंतु आता हे परीक्षण शासनाकडून विनामुल्य होणार असल्याने शेतकरी वर्गाला आपल्या जमिनीची पोत, सुपिकता, उत्पादनक्षमता कळून येण्यास मदत होणार आहे.जिल्ह्याचे मुख्य पिक भात असून ७० हजार १९३ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात येते. दरवर्षी जिल्ह्यात सुमारे १ लाख ९६ हजार ५४०.४ मेट्रिक टन भाताचे उत्पादन होते़ नागली पिक दुय्यम पिक घेतले जाते. नागलीची लागवड १५ हजार १०० हेक्टर क्षेत्रावर करण्यात येते. इतर तृणधान्य १८३० हेक्टर, उडीद १८८ हेक्टर, तूर २८० हेक्टर, कडधान्यांमध्ये मूग १४ हेक्टर, भुईमूग ९ हेक्टर, तीळ ४१ हेक्टर, कारळा ६२८ हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्यात येते. कोकणच्या अर्थव्यवस्थेत आंबा पिकाचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. रत्नागिरी जिल्ह्यात एकूण ६५ हजार १०९ हेक्टर क्षेत्रावर आंबा पिकाची लागवड करण्यात आली आहे. पैकी ५८ हजार ८३७ हेक्टर क्षेत्र उत्पादनक्षम विद्यापिठाने दिलेल्या सल्यानुसार दहा वर्षाचे आंब्याच्या झाड लावलेल्या मातीमध्ये १३८० ग्रॅम नत्र, ४८० ग्रॅम स्पुरद, ११६० ग्रॅम पालाशचे प्रमाण असणे आवश्यक आहे. तर भात लावलेल्या मातीमध्ये १०० किलो नत्र, ५० किलो स्पुरत, ५० किलो पालाश असणे आवश्यक आहे.उपयुक्त अभियानमातीतील घटकांचे प्रमाण कमी आढळल्यास त्याप्रमाणे खताचे डोस वाढविण्याचा सल्ला देण्यात येत असल्याने जमिनीची उत्पादकता वाढविणे, किंवा पोत सुधारण्यासाठी अभियान उपयुक्त ठरणार आहे.1अभियानातंर्गत जमिनीच्या सर्वसाधारण तपासणीमध्ये सामु, क्षारता, सेंद्रीय कर्ब, स्फुरद, पालाश तपासणी केली जाणार आहे.2सामु, क्षारता, सेंद्रीय कर्ब, स्फुरद, पालाश, सोडीयम, कॅल्शियम, मेग्नेशिअम, मुक्त चुना, जलधारणा, माती घनता, पोत तपासली जाणार आहे. 3सूक्ष्म मुलद्रव्ये मृद नमुन्यांतर्गत मातीमधील तांबे, जस्त, लोह, मंगल याचीही स्वतंत्रपणे तपासणी केली जाणार आहे.