शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
3
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
4
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
5
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
6
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
7
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
8
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
9
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
10
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
11
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
12
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
13
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
14
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
15
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
16
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
17
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
18
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
19
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
20
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी

खेडमध्ये मनसे विरूध्द शिवसेना अशीच लढत

By admin | Updated: November 10, 2016 23:58 IST

राजकीय भवितव्य अवलंबून : योगेश कदमांची चाल निर्णायक ठरणार?

श्रीकांत चाळके -- खेड खेड नगर परिषद नगराध्यक्षपदाच्या थेट निवडणुकीमध्ये उमेदवारांची भ्रमंती सुरू असली तरीही नगरसेवकपदाच्या उमेदवारांनी याच नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांबरोबरच आपलाही प्रचार सुरू केला आहे. या निवडणुकीत शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँगे्रस, भाजप, काँग्रेस अशी पंचरगी लढत दिसून येत असली मुख्य लढत शिवसेना आणि मनसे यांच्यामध्येच होईल, असे सध्याचे चित्र आहे. खेडमधील शिवसेनेचे अस्तित्व पाहता शिवसेनेची लढत राष्ट्रवादीशी नसून ती मनसेशी आहे. त्यामुळे कदम विरूध्द कदम असा हा सामना नसून शिवसेना विरूध्द मनसे असाच आहे. एकूणच या लढतीदरम्यान योगेश कदम यांची व्यूहरचना निर्णायक ठरणार का, याकडे लक्ष आहे.खेड नगर परिषदेत रामदास कदम यांच्या नेतृत्त्वाखाली सलग १५ वर्षे सेनेचे वर्चस्व होते. तत्कालीन जिल्हाप्रमुख किशोर कानडे यांनी याकामी विशेष मेहनत घेतली. गेल्या १० वर्षांत शिवसेनेला निसटता पराभव पत्करावा लागला. सत्ता इतर पक्षांची असली तरीही शिवसेनेच्या नगरसेवकांनी आपला दबदबा कायम ठेवला आहे. रामदास कदम खेडमध्ये नसतानाही खेडचे नागेश तोडकरी, बिपीन पाटणे, अरविंद तोडकरी, अरविंद चिखले आणि संजय मोदी यांच्यासारखे दिग्गज पदाधिकारी निवडणुकीची रणनीती आखत आहेत. आताच्या निवडणुकीत स्वत: रामदास कदम खेडमध्ये नसले तरीही त्यांच्या सूचनेनुसार शिवसेनेची खेडमधील ही मंडळी निवडणुकीचे काम सांभाळत आहेत. त्यांना युवा सेनेचे राज्य कार्यकारिणी सदस्य योगेश कदम यांची साथ मिळत आहे. राजकारण आणि निवडणुकीतील अनुभव कमी असला तरी योगेश कदम यांच्याकडे खेड नगर परिषदेच्या निवडणुकीची सारी सुत्र सोपवण्यात आली आहेत. योगेश कदमांनी आतापर्यंत खेड शहरातील विकास आणि निवडणूक पध्दतीबाबत माहिती घेतली. निवडणुकीत युवा सेनेची मोठी फळी उतरली आहे. शिवसेनेची यापूर्वीची धोरणे आणि आता राबवायची धोरणे, याबाबत दररोज आढावा घेऊन त्यानुसार रणनीती आखली जात आहे. शहरातील सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन ते काम करीत आहेत. परिस्थितीनुसार प्रचाराची पध्दत आणि दिशा बदलली जात आहे.संजय कदम आमदार झाल्यापासून त्यांनी शहर विकासासाठी काही केले नसल्याचे सांगण्यात येत असले तरी मनसेचे वैभव खेडेकर यांना हाताशी धरून त्यांनी नवी खेळी खेळली आहे. आपल्या कामाने त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांनाही भुरळ घातली आहे. सामाजिक, सांस्कृतिक कार्यासह त्यांनी मनसेच्या माध्यमातून अनेक लोकाभिमुख कार्य केले आहे. नगरपरिषदेच्या माध्यमातून त्यांनी अखेरच्या वर्षामध्ये केलेली विकासकामे नागरिकांच्या लक्षात आहेत. मात्र, सत्ता असताना काही प्रश्न आजही अधांतरी आहेत. नागरिकांच्या गरजेचे मूलभूत प्रश्न आजही सुटलेले नाहीत. मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राची दुरवस्था, कचरा डेपो, सांडपाण्याची व्यवस्था आणि बंदिस्त गटारे योजना याबरोबरच अनधिकृत बांधकामे या समस्या आजही प्रलंबित आहेत. शहरवासीयांच्या विविध समस्या आणि प्रश्न आजही महत्त्वाचे आहेत. मात्र, अशा प्रश्नाकडे सत्ताधाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याची चर्चा आहे. मात्र, या तुलनेत राष्ट्रवादीचे शहर विकासासाठी योगदान ते कसले? असा प्रतिप्रश्न नागरिक करीत आहेत. आमदार संजय कदमांनी राष्ट्रवादी काँग्रेसला निवडणुकीत मनसेच्या साथीने उतरवण्याचा प्रयत्न केला आहे. खेडमध्ये मनसेची ताकद चांगली असल्याने नगर परिषदेत शिरकाव करण्यासाठी राष्ट्रवादीची ही खेळी आहे. मात्र, त्याला किती यश मिळेल, हे निकालानंतरच कळणार आहे. राष्ट्रवादीला फारसे यश मिळणार नसल्याचे सांगितले जात असले तरी संजय कदम कोणता चमत्कार करतात, याकडेही लक्ष लागून राहिले आहे. या स्थितीत मनसेने राष्ट्रवादी काँग्रेसशी शहर विकास आघाडीच्या माध्यमातून युती करण्याचा घेतलेला निर्णय खेडमधील नागरिकांच्या आणि मतदारांच्या कितपत पचनी पडेल, हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.