शहरं
Join us  
Trending Stories
1
राड्याच्या काही क्षण अगोदर काय घडले? पडळकर यांच्याशी चर्चा सुरू असतानाच बाचाबाची नंतर...
2
आव्हाड-पडळकर राडा रात्रभर चालला! नितीन देशमुखला पोलिसांनी पकडले, आव्हाड रात्रभर पोलीस स्टेशन बाहेर...
3
आजचे राशीभविष्य, १८ जुलै २०२५: 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार लय भारी!
4
मंत्रालय, ठाणे अन् नाशिक बनले ‘हनी ट्रॅप’चे केंद्र; पटोलेंनी विधानसभेत पेनड्राइव्ह दाखविला
5
संपादकीय: धन-धान्य कृषी योजना योजना चांगली; पण...
6
पडळकर-आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये लाॅबीमध्ये तुंबळ हाणामारी, ‘म’-‘भ’च्या भाषेत शिवीगाळ
7
फडणवीस-उद्धव ठाकरे यांच्यात २० मिनिटे ‘वन टू वन’; आदल्या दिवशी ऑफर, दुसऱ्या दिवशी संवाद
8
महाराष्ट्रात सिनेमांचे तिकिट २०० रुपये कधी? कर्नाटकाने केली... अव्वाच्या सव्वा तिकिटांच्या दरांनी प्रेक्षक हैराण...
9
...तर पेट्रोल अन् डिझेल होणार स्वस्त; कच्च्या तेलाची किंमत ६५ डॉलर प्रतिबॅरलवर राहिली तर...
10
...हा तर १९ जणांच्या खुनाचा प्रकार : सुप्रीम कोर्ट; पीएम जनआरोग्य योजनेत गरज नसताना अँजिओप्लास्टी 
11
न्या. वर्मा यांच्यावरील महाभियोग प्रस्ताव लोकसभेत की राज्यसभेत? सरकार ठरवणार
12
धनंजय मुंडेंच्या बंगल्यातून फोन आल्यानेच तपास थांबला? महादेव मुंडे खून प्रकरण; ज्ञानेश्वरी मुंडेंचा आरोप
13
सरकार कुणाचे आणायचे हे आता तरुण पोरं ठरवणार, मतदानाचे वय सोळा वर्षे; ब्रिटन सरकारचा निर्णय
14
पत्नीकडे फोन, बँक खात्याचे पासवर्ड मागणे हा घरगुती हिंसाचार, छत्तीसगड उच्च न्यायालय
15
व्यवस्थापन कोट्यातील जागांसाठी विद्यार्थ्यांची लूट; विद्यापीठाने देखरेख समिती नेमावी : युवा सेना
16
व्हिजन डाॅक्युमेंटसाठीचा मसुदा इंग्रजीत! शिक्षणतज्ज्ञांमध्ये आश्चर्य; इंग्रजीला देण्यात आलेल्या प्राधान्याबद्दल आता टीका
17
नवी मुंबई महापालिका राज्यात पहिली; मीरा-भाईंदर देशातले ‘सर्वांत स्वच्छ शहर’
18
हनी-मनिट्रॅप : मंत्री, अधिकारी अस्वस्थ ! ‘आपले नाव त्यात नाही ना?’ अशी धास्ती...
19
अस्वस्थ जगाच्या जखमा कोण बांधू शकेल? - भारत!
20
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   

कोंडुरे गावावर दु:खाचा डोंगर

By admin | Updated: June 2, 2016 00:38 IST

रवींद्र मुळीक यांचा अपघाती मृत्यू : अनेकांना आपत्तीतून काढले होते बाहेर

मळेवाड : आपत्ती व्यवस्थापनाचे धडे देणारे, तसेच आपत्तीतून बाहेर कसे पडावे याचा मार्ग दाखवणारे, सतत आपत्ती व्यवस्थापनचा पाठ शिकविणारे रवींद्र गुणाजी मुळीक यांचा खेड येथील अपघातात झालेला दुर्दैवी मृत्यू जिल्हावासियांना चटका लावून जाणारा ठरला आहे. अकस्मात येणाऱ्या आपत्तीतून सहीसलामत कसे बाहेर पडावे, आपल्याबरोबर इतरांचाही जीव कसा वाचवावा, हे शिकविणाऱ्याचा अपघातात दुर्दैवी अंत व्हावा, ही नियतीची कू्र र चेष्टाच असून त्याच्या मळेवाड-कोंडूरे गावी त्यांच्या अचानक जाण्याने दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अपघाताचे वृत्त समजताच मंगळवारपासून अनेकांनी त्यांच्या घरी धाव घेत कुटुंबियांचे सांत्वन केले. रवींद्र मुळीक हे मूळचे कोंडुरे-मळेवाड येथील. मात्र, सध्या ते कळंबोली, नवी मुंबई येथे राहत होते. त्यांनी अनेक ठिकाणी आपत्तीचा अभ्यास केल्यानंतर त्यांच्या स्वसंकल्पनेतून महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन शैक्षणिक प्रशिक्षण संस्था सिंधुदुर्गची स्थापना केली गेली. या संस्थेची प्रमुख जबाबदारी सांभाळून संपूर्ण महाराष्ट्र तसेच भारत आणि भारताच्या बाहेरही या संस्थेद्वारे त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाचे धडे दिले. आपल्या मूळ गाव कोंडुरे येथील तरूणांना प्रशिक्षित करून त्याद्वारे पंचक्रोशी, दशक्रोशीतील गावागावांमध्ये, शाळांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाची माहिती दिली. देशाबरोबरच परदेशात बांगलादेश श्रीलंका, नेपाळ आदी देशांमध्ये जाऊन त्यांनी आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यशाळा घेतल्या. तिथल्या लोकांना प्रशिक्षित केले. आणि आजही तेथील तरूण रवींद्र मुळीक यांचा आवर्जून उल्लेख करतात. जिल्ह्यात कोणतीही आपत्ती येऊ दे, त्याला कसे तोंड द्यायचे याचे प्रात्यक्षिकच मुळीक यांच्याकडून शिकावे. अनेकवेळा प्रत्यक्ष प्रसंग घडले की, पहिली धाव मुळीक यायची असायची. ते स्वत: येत असत आणि आपल्याबरोबर प्रशिक्षित युवक घेऊन येत होते. मागील आठ वर्षे या संस्थेचे काम जोमात चालले होते. अनेक तरूण यात सहभागी होत आहेत. विशेष करून, मुंबई-गोवा या राष्ट्रीय महामार्गावर अधिक अपघात होतात. याठिकाणी आपली जास्त गरज आहे, असे त्यांना वाटे. अखेर याच मार्गावर अपघातात त्यांचा दुर्दैवी अंत झाला. हे ऐकून अनेकांना धक्काच बसला .ज्याच्या साठी मुळीक सतत लढत होते. त्याच मार्गावर त्यांचा प्राण जाईल हे त्यांनाच काय, कोणालाही वाटले नव्हते. ते नेहमी मुंबई-गोवा असा प्रवास करीत. पण मंगळवार हा त्यांच्या आयुष्यातील एक अखेरचा दिवस घेऊन आल्यासारखेच त्यांना काळ घेऊन गेला, त्यामुळे मात्र, सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. (वार्ताहर) आपत्तीप्रसंगी धावून यायचे : पुतणीच्या विवाहासाठी येत होते सिंधुदुर्ग जिल्ह्यात आपत्ती व्यवस्थापनचे धडे पहिल्यांदा रवींद्र मुळीक यांनी दिले. त्यांची इको कारही नेहमी आपद्ग्रस्त व्यक्तींच्या मदतीसाठीच होती. त्यांच्या गाडीत नेहमी आपत्ती व्यवस्थापनाचे साहित्य असायचे. अनेक वेळा आंबोली येथे आपत्तीची घटना घडायची, त्यावेळी रवींद्र मुळीक यांची आठवण व्हायची आणि ते हजर व्हायचे. रवींद्र मुळीक हे आपल्या कुटुंबासमवेत मंगळवारी मळेवाड-कोंडुरा येथे येत होते. त्यांचा १ जूनला म्हणजे बुधवारी वाढदिवस, तर पुतणीचे दोन दिवसांनी लग्न होते. या आनंदात कुटुंब असतानाच घडलेल्या या प्रकाराने सर्वांच्या दु:खाचा बांधच फुटला असून, अनेकांना धक्का बसला आहे.