शहरं
Join us  
Trending Stories
1
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
2
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
3
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
4
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
5
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
6
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
7
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
8
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
9
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
10
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
11
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
12
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
13
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
14
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
15
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
16
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
17
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
18
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
19
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 
20
अनैतिक संबंधांसाठी पत्नीनं सोडली मर्यादा, केला गंभीर गुन्हा, तिला कठोर शिक्षा द्या म्हणत पती झाला भावूक 

सामंत-मानेंमधील राजकीय ‘रडीचा डाव’

By admin | Updated: July 29, 2014 22:59 IST

ना घर का ना घाट का : पक्षकार्यकर्ते बनलेत सारीपाटावरील प्यादी

प्रकाश वराडकर - रत्नागिरीएकाने विकास निधी देण्यास हात पुढे करायचा व दुसऱ्याने निधी न स्वीकारता हात मागे घ्यायचे, असा ‘रडीचा डाव’ सध्या रत्नागिरी शहरात सुरू आहे. राष्ट्रवादीचे पालकमंत्री उदय सामंत व भाजपाचे माजी आमदार बाळ माने यांच्यातील या शीतयुध्दात त्यांचे पक्षकार्यकर्ते जणू राजकीय सारीपाटावरील प्यादी बनली आहेत. या राजकीय वादात रत्नागिरीच्या विकासाची दैना झाली असून, रत्नागिरीकरांची स्थिती ‘ना घर का, ना घाट का’ अशी झाली आहे. गेल्या दीड वर्षांपासून रत्नागिरी शहर विकासाबाबत ही विचित्र स्थिती आहे. सरकारच्या योजनांमधून रत्नागिरी शहरासाठी येत असलेल्या निधीला या ना त्या कारणाने पालिकेतील महायुतीचे पदाधिकारी पालकमंत्र्यांना ‘श्रेय’ नको म्हणून त्यात कोलदांडा घालत असल्याचे चित्र शहरवासीयांच्या मनात निर्माण झाले आहे. हे चित्र बदलायचे असेल तर महायुतीला आपल्या धोरणात बदल करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. गेल्या दोन दशकांपासून रत्नागिरी जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात आहे. त्याला कारणही तसेच आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषद, बहुतांश पंचायत समित्या, ग्रामपंचायतींवरही शिवसेनेचेच वर्चस्व आहे. मात्र, या स्थितीतही राष्ट्रवादी कॉँग्रेसची गेल्या दशकातील या जिल्ह्यातील घोडदौड वाखाणण्याजोगी आहे. जिल्ह्यात या क्षणालाही शिवसेनेला राष्ट्रवादी कॉँगे्रस हाच मोठा स्पर्धक आहे. त्यामुळे या दोन्ही पक्षांत राजकीय वैर निर्माण झाले आहे. रत्नागिरीत तर भाजपनेते बाळ माने व पालकमंत्री उदय सामंत यांच्यात मोठे राजकीय वैर आहे. हे दोन्ही नेते एका व्यासपीठावर आले तरी त्यांच्यातील हे राजकीय वैर लपून राहात नाही, अशी स्थिती आहे. रत्नागिरी पालिकेत महायुतीची सत्ता आल्यानंतर सर्वप्रथम सेनेचे मिलिंद कीर नगराध्यक्ष झाले. त्यांनी रस्ते डांबरीकरणातील अनियमितता दाखवत दोन ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले. त्यात आर. डी. सामंत कन्स्ट्रक्शनचा समावेश प्रामुख्याने होता. शहरातील रस्ते डांबरीकरणाची कामे याच कंपनीमार्फत आजवर होत आली. मात्र, या कंपनीला काळ्या यादीत टाकून महायुतीच्या सत्ताधाऱ्यांनी थेट पालकमंत्री उदय सामंत यांच्याच विरोधात रणशिंग फुंकले. त्याचे पडसाद उमटलेच. आर. डी. सामंत कन्स्ट्रक्शन कंपनीनेही या २१ कोटींच्या निविदा प्रक्रियेला न्यायालयात स्थगिती घेतली. त्यानंतर चर्चेच्या फेऱ्यांद्वारे सामंत कन्स्ट्रक्शनचे नाव काळ्या यादीतून वगळण्यात आले. तरीही वाद पूर्णपणे मिटलेला नाही. या दोघांच्या भांडणात रत्नागिरीचा विकास मात्र रखडला. गेल्या वर्षभरात अधून-मधून या वादाची झलक रत्नागिरीकरांना पाहायला मिळाली. या वादात रत्नागिरीतील रस्त्यांची कामे रखडली. शहराचा विस्तार होत असताना अनेक विकासकामांना खीळ बसली. विकासाच्या स्तरावर रत्नागिरी शहराचे पर्यायाने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. राजकारण हे केवळ निवडणुकीपुरतेच असायला हवे, हे सुजाण नागरिकांनाही कळते. मात्र, या राजकारणात विकासाची कोंडी झाली तर त्याचा जाब निवडणुकीत संबंधितांना द्यावा लागणार हे नक्की आहे. येत्या आॅक्टोबर - नोव्हेंबर महिन्यात राज्य विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे या वादाला पुन्हा ‘गडद रंग’ देण्याचे काम दोन्हीकडून सुरू झाले आहे. पालकमंत्री उदय सामंत यावेळी रत्नागिरी मतदारसंघातून तिसऱ्यांदा निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे रत्नागिरी शहरासह या विधानसभा मतदारसंघातील विकासकामांना निधी मंजूर करून घेणे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सामंत यांच्यासाठी महत्त्वाचे आहे. अर्थातच रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाला सामंत यांच्या रुपाने तब्बल ५३ वर्षांनी राज्यमंत्रिपद मिळाले आहे. परंतु सामंत हे स्वायत्त संस्था असलेल्या पालिकेला डावलून विकासकामांचा निधी खर्च करू पाहत असल्याचा सत्ताधाऱ्यांचा दावा आहे.राजकारणापलिकडची भूमिका घेत दोन्ही पक्षांनी विकासावर लक्ष केंद्रित केले, तर रखडलेली कामे मार्गस्थ होतील. त्यासाठी सामंत व माने यांनी विकासाचा विचार करून एक-एक पाऊल मागे घेणे, हाच उपाय आहे. -निवडणूक हेच वादाचे कारण...अनेक विकासकामांसाठी निधीची घोषणा पालकमंत्री सामंत करतात. त्यावेळी निधी पालिकेच्या बॅँक खात्यात आलाच नाही, येईल तेव्हा पाहू, असे सत्ताधाऱ्यांचे ठरलेले उत्तर असते. राष्ट्रवादीचे व भाजपा कार्यकर्ते यांच्यात वरवर दिसणारी ही लढाई खरेतर पालकमंत्री उदय सामंत व भाजपाचे येत्या विधानसभा निवडणुकीतील उमेदवार बाळ माने यांच्यातील आहे. रत्नागिरीत विकासकामे केली तर निवडणुकीसाठी ती आपल्या पथ्यावर पडतील, या उद्देशाने पालकमंत्री विकासकामांचा रेटा निर्माण करीत आहेत आणि विकासकामे झाली तर निवडणुकीत भाजपाला निवडणूक मुद्दे उरणार नाहीत, अशी भीती भाजपाला वाटत असल्यानेच या दोघांमधील राजकारणाचा रडीचा डाव सुरू असल्याचे रत्नागिरीकरच आता खुलेआम बोलत आहेत.