शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

पर्ससीन बंदी; २५ कोटींचा फटका

By admin | Updated: March 2, 2016 23:59 IST

रत्नागिरी जिल्हा : कर्जबाजारी मच्छीमारांवर आत्महत्येची वेळ

रहिम दलाल-- रत्नागिरी -जिल्ह्यातील पर्ससीन नेट मासेमारी बंद झाल्याने या पंधरवड्यामध्ये सुमारे २५ कोटी रुपयांचा फटका मच्छीमारांसह त्यावर अवलंबून असणाऱ्या अन्य व्यावसायिकांनाही बसला आहे. त्यामुळे आधीच कर्जबाजारी असलेल्या मच्छीमारांवर शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्येची वेळ येणार आहे. आज पर्ससीन नेटने मासेमारी बंद झाल्याने जिल्ह्यातील महत्वाच्या अशा मिरकरवाडा, साखरीनाटे, जयगड, हर्णै बंदरांमधील आर्थिक उलाढालीवर याचा परिणाम झाला आहे. सप्टेंबर ते डिसेंबर या कालावधीतच पर्ससीन नेटने मासेमारी करण्याची अधिसूचना मुख्यमंत्र्यांनी काढल्याने मच्छीमारांची आर्थिक कोंडी झाली आहे. मासेमारी व्यवसायावर टेम्पो, ट्रक, मासे विक्रेत्या महिला, मासे कापणाऱ्या महिला, बर्फ कारखाने, कामगार यांची कमाईही मच्छीमारांप्रमाणे बंद झाल्याने त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. मिरकरवाडा जेटीवर मासे कापणारी महिला रोजचे कमीत कमी २०० ते ३०० रुपये कमवून त्यावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवते. गेले दहा दिवस पर्ससीन नेट मासेमारी बंद असल्याने त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच मासेमारी बंदरांवर हमालीचे काम करणाऱ्या कामगारांचेही काम बंद झाल्याने त्यांच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे. टेम्पो, ट्रक चालक-मालक यांना माशांची ने-आण करण्याच्या वाहतुकीचे काम मिळत होते. मात्र, बंद मासेमारीमुळे हे वाहतुकीचे कामही ठप्प झाले आहे. अशीच स्थिती राहिली तर शेकडो लोकांनी टेम्पो, ट्रक या वाहनांवर घेतलेल्या कर्जाचे हप्ते कसे फेडणार, तसेच त्यांचे कुटुंबियांवरही यामुळे उपासमारीची वेळ येणार आहे. बर्फ कारखान्यांचीही धडधड सध्या बंद आहे. कारण मासेच नसल्याने बर्फाची उचल होत नाही, त्यामुळे कारखाने बंद अवस्थेत आहेत. पर्ससीन नेट नौकामालकांनी लाखो रुपयांचे कर्ज बँका तसेच पतसंस्थांकडून घेतली आहेत. तसेच खलाशांनाही ९ महिन्यांच्या करारावर ठेवण्यात आले आहे. मुख्यमंत्र्यांनी अचानक अधिसूचना काढून ही मासेमारी बंद करण्याचे आदेश दिल्याने हा संपूर्ण व्यवसायच अडचणीत आला आहे. खलाशांना देण्यात येणारे आठवड्याचे पैसे तसेच खलाशांचे महिन्याचे वेतन, त्यांच्या जेवणाचा खर्च तसेच बँकांचे हप्ते कसे भरणार, त्याचबरोबर व्यापाऱ्यांकडून घेतलेल्या पैशांची परतफेड कशी करणार, अशा अडचणीत नौका मालक सापडले आहेत. त्यामुळे पुढील काही महिने मासेमारी बंद राहिल्यास मच्छीमारांवर कर्जबाजारी होऊन शेतकऱ्यांप्रमाणे आत्महत्या करण्याची वेळ येणार आहे. त्यामुळे सुमारे २५ कोटी रुपयांचा फटका जिल्ह्यातील पर्ससीन नेट मच्छीमारांसह इतर व्यावसायिकांना बसला आहे. जिल्ह्याची आर्थिक नाडी असलेला मासेमारी व्यवसाय ठप्प झाल्याने पर्ससीन नेटसह इतर व्यावसायिकांना त्याचा फटका बसला आहे.आधीच मच्छिमारांना अनेक संकटांना तोंड द्यावे लागत आहे. त्यातच पर्ससीन मच्छिमारीवर बंदी आल्याने आता या नव्या संकटाला कसे सामोरे जायचे? असा प्रश्न मच्छिमारांना पडला आहे. याविरोधात हे मच्छिमार आंदोलनाच्या पावित्र्यात आहे.व्यवसाय उध्वस्त : उपासमारीची वेळ येणारपर्ससीन नेट मासेमारी व्यवसाय हा जिल्ह्याची आर्थिक नाडी आहे. या व्यवसायावर मच्छीमार कुटुंबे अवलंबून आहेत. तसेच टेम्पो चालकांपासून ते मच्छी विक्रेत्या, मासे कापणाऱ्या महिलांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह यावर अवलंबून आहे. या व्यवसायावर शासनाने अचानकपणे डिसेंबरनंतर बंदी घातल्याने हा व्यवसायच उध्वस्त होणार आहे. त्यासाठी पर्ससीन नेटवरील बंदी शासनाने उठवावी. अन्यथा या व्यावसायिकांवर शेतकऱ्यांप्रमाणे उपासमारीची वेळ येणार आहे. त्यासाठी शासनाने या सर्व बाबींचा विचार करुन मच्छीमारांना न्याय द्यावा.- नूरमहंमद सुवर्णदुर्गकर, मच्छीमार नेते, राजिवडा-रत्नागिरी.तोडगा काढापर्ससीन नेटधारक जगला पाहिजे. यासाठी शासनाने काहीतरी तोडगा काढावा आणि या मच्छीमारांनाही रोजीरोटीचे साधन मिळेल, अशी भूमिका घ्यावी, अशी मागणी या मच्छीमारांनी केली आहे.