शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

फायद्यातील प्रकल्प वाचविण्यासाठी विभाजन?

By admin | Updated: September 18, 2016 00:03 IST

रत्नागिरी गॅस आणि ऊर्जा प्रकल्प : गॅस टर्मिनल फायद्यात, वीज निर्मिती तोट्यात

गुहागर : वीज निर्मिती प्रकल्पाच्या तोट्यामुळे एलएनजी प्रकल्पातून होणारा फायदा कमी होत असल्यानेच रत्नागिरी गॅस प्रकल्पाच्या दोन कंपन्या करण्यात आल्याची माहिती पुढे येत आहे. तोट्यात असलेला वीज निर्मिती प्रकल्प येत्या काही काळातच बंद करण्यासाठीच वीज निर्मिती आणि गॅस टर्मिनल, अशा दोन कंपन्या करण्यात आल्याची शंकाही व्यक्त केली जात आहे.महाराष्ट्रावरील भारनियमनाचे संकट दूर करण्यासाठी गाळात गेलेला दाभोळ वीज प्रकल्प आॅक्टोबर २००५ मध्ये ‘रत्नागिरी गॅस अँड विद्युत प्रकल्प’ असे नाव देऊन सुरू करण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. एनटीपीसी, गेल, तत्कालीन वीज मंडळ व काही राष्ट्रीयीकृत बँकांना एकत्रित घेऊन हा प्रकल्प कार्यान्वित केला. या वीज प्रकल्पाची २१०० मेगावॅट इतकी वीज निर्मितीची क्षमता आहे. काही वर्षांनी सरासरी एक हजार मेगावॅट वीज निर्मिती सुरू झाली. मात्र, गॅसचे दर वाढविल्यानंतर गॅसपुरवठा थांबला. तेथून या प्रकल्पाला पुन्हा ग्रहण लागले. वर्षभर काही फरकाने वीज निर्मिती सुरू राहिली. पण, गॅसची उपलब्धताच होत नसल्याने वीज निर्मिती बंद ठेवण्याची वेळ आली.नव्याने आलेल्या सरकारने या प्रकल्पात लक्ष घालत रेल्वेसाठी ५०० मगोवॅट वीज निर्मितीचा करार करून दिल्याने गेले काही महिने या प्रकल्पाला दिलासा मिळाला आहे. प्रकल्पाच्या सद्य:स्थितीचा विचार करता वीज निर्मिती केंद्राचे भवितव्य आजही अंधारात आहे. रेल्वेकडून मार्च २०१७ पर्यंत वीज घेतली जाणार आहे. त्यापुढील काळात या प्रकल्पातील महागडी वीज कोण घेणार? हा प्रश्न पुन्हा उभा राहणार आहे. याउलट एलएनजी प्रकल्प फायद्यामध्ये आहे. गॅसची मागणी वाढली असल्यामुळे हा प्रकल्प पुढे आणखी काही वर्षे सुरूच राहील. मात्र, या प्रकल्पातून मिळणारा फायदा रत्नागिरी गॅस प्रकल्पात खर्च होत आहे. हे दोन्ही विभाग वेगवेगळे काम करीत असले तरी प्रशासन मात्र एकच आहे. वीज निर्मितीला मागणी नसल्यास भविष्यात हा प्रकल्प वेळ आली, तर त्याच्यासोबत फायद्यात असलेला एलएनजी प्रकल्पही बंद पडेल. तो जर वेगळा कार्यरत राहिला तर भविष्यातही तो सुरू राहील. त्यामुळेच या दोन स्वतंत्र कंपन्या करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दिली.(प्रतिनिधी)दोन प्रकल्पांमुळे क्षमता वाढेल...सद्य:स्थितीत एलएनजी प्रकल्पासाठी १५ हून अधिक लिक्विड गॅसची जहाजे परेदशातून येत आहेत. आगामी काळात जेटीजवळ प्रस्तावित ब्रेक वॉटरचे काम सुरू होणार असल्याने पावसाळ्यातील उच्च भरती काळातही जहाजे येथे दाखल होतील आणि या प्रकल्पाची क्षमता वाढेल. एलएनजी प्रकल्पामध्ये येणाऱ्या लिक्विड गॅसवर आवश्यक प्रक्रिया करून वीज निर्मितीसाठी उपयुक्त, असा गॅस बनविला जातो. या गॅसला मोठी मागणी आहे. एका प्रकल्पाचा फटका दुसऱ्याला बसू नये, यासाठी हे दोन विभाग करण्यात आले आहेत.