शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

शत्रू नव्हे मित्रच! --नागपंचमी विशेष

By admin | Updated: July 31, 2014 23:22 IST

महाराष्ट्रात आढळणारे प्रमुख विषारी साप

कणकवली : आपल्याकडे दिसला साप की मार, असे प्रकार नेहमीच घडतात. प्रत्यक्षात साप धोकादायक आणि विषारी असले तरी त्यांच्यामुळे शेतातील उंदरांचा बंदोबस्त होऊन धान्याची नासाडी होण्यास प्रतिबंध होतो. त्यामुळे साप हा पर्यावरणाचा तोल सांभाळणारा प्राणी आहे, हे लक्षात येते; मात्र केवळ काही गैरसमजुतीतून हा सरपटणारा प्राणी संपविण्याचा सपाटा मानव जातीने लावला आहे. त्यामुळे दिवसेंदिवस सरपटणाऱ्या प्राण्यांची संख्याही कमी होत चालली आहे. आज (शुक्रवार) नागपंचमी... या उत्सवाच्या निमित्ताने सापांच्या संरक्षणासाठी आपण सर्वांनीच पुढाकार घेणे अत्यंत महत्त्वाचे बनले आहे. महाराष्ट्रात आढळणारे प्रमुख विषारी सापमण्यार इंग्रजी नाव : उङ्मेङ्मल्ल ्रल्ल्िरंल्ल ‘१ं्र३रंग : निळसर काळा, त्यावर पांढरे आडवे पट्टे. शेपटीकडून डोक्याकडे येतात.लांबी : सुमारे तीन ते साडेतीन फूट.भक्ष्य : या सापाचे मुख्य भक्ष्य साप आहे. त्याचबरोबर उंदिर, पालीदेखील आहे. आढळतात : पडक्या इमारतीत दगड, विटांचे ढीग, शेत, उंदरांची बिळे आदी ठिकाणी. प्रदेश : सगळीकडे.वैशिष्ट्ये : मण्यार हा नागापेक्षा चारपट विषारी; मात्र शांत स्वभावाचा आहे. शरीराच्या मध्यभागी षटकोनी खवल्याची रांग डोक्यापासून शेपटीपर्यंत आहे. गैरसमज : मण्यारची सावली पडल्यास शरीराला खाज सुटते. झोकापंचमीमहाराष्ट्र राज्याच्या एकूण ३,०७,७१३ चौ.कि. भागापैकी (भौगोलिक क्षेत्रफळापैकी) ६१,९३९ चौ.कि. भाग जंगलांनी व्यापला आहे. त्यात हजारो प्रकारच्या वनस्पती, ८५ प्रकारचे सस्तन प्राणी, ५०० पेक्षा अधिक प्रकारचे पक्षी व २७८ प्रकारचे साप आढळतात. अशी समृद्ध जैवविविधता महाराष्ट्रात आहे.या जैवविविधतेच्या संरक्षणासाठी राज्यात ४१ संरक्षित जंगले आहेत. ताडोबा, मेळघाट आणि पेंच हे ३ व्याघ्र प्रकल्प, ६ राष्ट्रीय उद्याने व ३५ अभयारण्य आहेत. अशा या महान देशात नागाला देवता मानून कृतज्ञतेच्या भावनेने पूजण्याचा दिवस म्हणजे नागपंचमी. (हळद व रक्तचंदनाने) नागाची प्रतिमा पाटीवर वा भिंतीवर काढून दूध व लाह्यांचा नैवेद्य दाखवून नागाची पूजा केली जाते, म्हणून या दिवसाला ‘नागपंचमी’ असे म्हणतात. या सणाला ग्रामीण भागात नागोबाची पूजा झाल्यावर मंदिराजवळच्या झाडाला झोके बांधून मनसोक्तपणे खेळले जातात. म्हणून या सणाला ‘झोकापंचमी’ असेही म्हणतात. बायका, झोके, फुगड्या, झिम्मा खेळून आनंद साजरा करतात. शास्त्रीयदृष्ट्या बघितलं तर खेळणे व वारुळापर्यंत जाणे ह्यातून शरीराला घडणारा व्यायाम हा महत्त्वाचा भाग आहे. कारण ग्रीष्म ऋतूत क्षीण झालेली शक्ती व भूक दोन्ही वाढवण्यासाठी शरीराला व्यायाम आवश्यक असतो. तो नागपूजनाच्या निमित्ताने या काळात घडून येतो. सिमेंट काँक्रीटच्या जंगलातून निघून खऱ्या खुऱ्या जंगलात जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालविण्याचा आनंद यानिमित्ताने मिळतो. श्रावण महिन्यात सणांची सुरुवात होते ती नागपंचमीने. श्रावण महिना म्हणजे सृष्टीचा बहरण्याचा काळ. हिरवा शालू पांघरूण नटलेली ही ‘वसुंधरा’ मनाला भुरळ घालते. या काळात निसर्गातील अनेक घटकांशी आपण जोडले जातो. मानव व निसर्ग यामधले सामोपचाराचे नाते जपण्याचा एक सुंदर प्रयत्न या कालावधीत होतो.‘मनुष्य ज्या गोष्टीला समजू शकला नाही, त्याला तो घाबरतो आणि ज्या गोष्टीला तो घाबरतो, त्या गोष्टीला तो नष्ट करू लागतो.’ मनुष्याच्या ह्याच वृत्तीचे साप हे बळी ठरले. कारण मनुष्य सापाविषयीचे गुढ, सत्यता व नम्रता कधीच समजू शकला नाही, म्हणूनच त्याची हत्या करत आला. वास्तविक, देव-देवतांच्या पूजनांसोबत वनस्पती पूजन व प्राणीपूजनसारख्या सणांना आपल्या संस्कृतीत महत्त्वाचे स्थान आहे. या सृष्टीची जैवविविधता जोपासण्याचं महान काम मानव संस्कृतीने केले असून, भारतीय संस्कृती ही जैवविविधतेच्याच भक्कम पायावरच आधारलेली आहे. आपल्या सण व उत्सवांद्वारे या विविधतेची ओळख होते. त्यामुळेच देव-देवतांत सापाला महत्त्वाचे स्थान प्रदान केले आहे.