शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
2
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हमाले उमर अब्दुल्ला?
3
ED: बेटिंग ॲप प्रकरणी युवराज सिंग, रॉबिन उथप्पा यांची मालमत्ता जप्त; ईडीची मोठी कारवाई
4
“सत्य लपून राहत नाही, आता दुसरा मंत्रीही राजीनामा देणार”; उद्धव ठाकरेंचा रोख कुणाकडे?
5
'सेबीची कारवाई म्हणजे आर्थिक मृत्यूदंड' अवधूत साठेंच्या वकिलांचा 'सॅट'मध्ये युक्तिवाद; काय दिला निर्णय?
6
Anurag Dwivedi : २०० रुपयांपासून सुरुवात, आता कोट्यवधींची कमाई; ९ वर्षांत युट्यूबर अनुराग द्विवेदी कसा बनला धनकुबेर?
7
IND vs SL, U19 Asia Cup Semi Final 1 : वनडेत टी-२० ट्विस्ट! श्रीलंकेनं टीम इंडियासमोर ठेवलं १३९ धावांच लक्ष्य
8
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
9
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
10
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
11
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
12
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
13
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
14
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
15
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
16
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
17
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
18
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
19
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
20
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
Daily Top 2Weekly Top 5

हवामानावर संशोधन काळाची गरज : नाईक

By admin | Updated: December 5, 2015 23:30 IST

विज्ञान परिषदेकडे अधिकाऱ्यांची पाठ

कुडाळ : भविष्यात जीवनात हवा आणि हवामानावर संशोधन करणे काळाची गरज आहे. गेल्या काही महिन्यात सिंधुदुर्गासह राज्यात पाऊस फारच कमी प्रमाणात झाला असून या परिस्थितीचा वैज्ञानिकदृष्ट्या अभ्यास होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन आमदार वैभव नाईक यांनी यांनी २३ व्या राज्यस्तरीय राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे उद्घाटन प्रसंगी केले. भारत सरकारच्यावतीने असलेल्या या राज्यस्तरीय विज्ञान परिषदेकडे प्रशासनाने व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पूर्णपणे पाठ फिरवली. यामुळे उपस्थितांमध्ये प्रशासनाच्या या भूमिकेमुळे नाराजी व्यक्त होत होती. नेरूरपार येथील वसुंधरा विज्ञान केंद्र येथे भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, नवी दिल्ली यांच्यातर्फे आयोजित केलेल्या २३ व्या राज्यस्तरीय राष्ट्रीय बाल विज्ञान परिषदेचे उद्घाटन सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती गुरुनाथ पेडणेकर यांच्या हस्ते पार पडले. यावेळी जिज्ञासा संस्थेचे अध्यक्ष सुरेंद्र्र दिगे, बी. बी. जाधव, मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष एम. जी. मातोंडकर, वसुंधरा संस्थेचे विश्वस्त अविनाश हावळ, वसुंधरा संस्थेचे अध्यक्ष प्रदीप बर्डे, वसुंधरा संस्थेचे समन्वयक के. एम. पटाडे, लुपिन फाउंडेशनचे नारायण परब, राजू शेट्ये, परशुराम परब व मान्यवर उपस्थित होते. उद्घाटनप्रसंगी केलेल्या प्रास्ताविकात पटाडे यांनी वसुंधराने विज्ञानाचा सुरु केलेल्या कार्याचा धावता आढावा सांगितला. वसुंधराने विज्ञान क्षेत्रात अनेक विद्यार्थी घडविले आहेत असेही ते म्हणाले. गेली चार वर्षे हे काम करण्यात येते. आजपर्यंत वसुंधरामधून वेद दळवी व मिहीर पाटील हे दोन विद्यार्थी राष्ट्रीय स्तरावर निवडले गेले होते, असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एस. व्ही. प्रभूखानोलकर यांनी केले. जिल्ह्याला पहिल्यांदाच ही परिषद घेण्याचा प्रथमच मान मिळाला असतानाही या राज्यस्तरीय परिषदेकडे आमदार वैभव नाईक, सभापती गुरुनाथ पेडणेकर या लोकप्रतिनिधींनी आवर्जून उपस्थिती लावली. मात्र, प्रशासनाचा एकही अधिकारी या ठिकाणी उपस्थित नव्हता. (प्रतिनिधी) ६६ प्रकल्प : ३0 जणांची निवड या परिषदेच्या निमित्ताने राज्यातील ३६ जिल्ह्यांमधील २१२ बालवैज्ञानिक ६६ प्रकल्पांसह येथे आले असून या ठिकाणी विज्ञानाबाबत विचारांची देवाणघेवाण या बालवैज्ञानिकांमध्ये होणार आहे. राज्यस्तरावरील या ६६ प्रकल्पांमधून राष्ट्रीय स्तरासाठी ३० प्रकल्पांची निवड होणार आहे असे दिघे म्हणाले.