शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

हिपॅटायटिस रोखण्यासाठी सुसंवादाची आवश्यकता

By admin | Updated: August 1, 2014 23:17 IST

प्रसाद साळगावकर : शिरोडा येथील चर्चासत्रात मार्गदर्शन

शिरोडा : सर्व प्रकारच्या हिपॅटायटिसचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावीपणे माहिती व शिक्षण तसेच सुसंवादाची गरज आहे. हिपॅटायटिसबद्दल शास्त्रीय माहिती जाणून घेऊन राहणीमानात सकारात्मक बदल करुन वेळेवर निदान झाल्यास योग्य काळजी घेतल्यास प्रत्येक रुग्णाला बचाव करणे शक्य आहे, असे प्रतिपादन शिरोडा येथील डॉ. प्रसाद साळगावकर यांनी केले.जागतिक हिपॅटायटीस विरोधी दिनाचे औचित्य साधून गणेश क्लिनिक शिरोडा यांच्यावतीने आयोजित केलेल्या हिपॅटायटिस धोका ओळखा, या मार्गदर्शनपर चर्चासत्रात डॉ. साळगावकर बोलत होते. डॉ. साळगावकर पुढे म्हणाले, संसर्गजन्य रोगांपैकी एचआयव्ही, टीबी, मलेरिया या रोगांची ज्याप्रमाणे जगजागृती झाली आहे. त्याच धर्तीवर जगातील आठव्या क्रमांकाचा आजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिपॅटायटिसबद्दल अद्यापही हवी त्या प्रमाणात जनजागृती झालेली नाही. पावसाळ्यात काविळीचे प्रमाण वाढते. अस्वच्छता, पाण्याचे कृत्रिम साठे, दूषित अन्नपदार्थ, उघड्यावरील व कच्चे अन्न यांचे सेवन, मद्यपान आदी कारणांमुळे काविळीची लागण होते. काविळीचा हा विषाणू आतड्यातील पेशींमध्ये प्राथमिक वाढ करतो. व त्यानंतर रक्ताव्दारे तो विषाणू यकृतातील पेशींवर हल्ला करुन यकृत दूषित करतो. हिपॅटायटिसचे सहा विषाणू असतात. मात्र, प्रत्येकवेळी सगळ्याच प्रकारच्या काविळीची प्राथमिक लक्षणे दिसून येत नाहीत. या आजारावरील प्रभावी लस बाजारात उपलब्ध असून त्याच्या सहाय्याने हा रोग आटोक्यात आणता येतो, असेही साळगावकर यांनी सांगितले. सध्या पावसात हिपॅटायटिसचे अनेक रुग्ण आढळतात. त्यांच्यावर गावठी उपचार न करता वेळीच डॉक्टरांशी सल्लामसलत केली गेल्यास काविळ आटोक्यात येऊ शकते. त्यामुळे वेळीच वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन साळगावकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)