शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवावर आलं ते पायावर निभावलं, इराणच्या राष्ट्रपतीना मारण्यासाठी आलं इस्राइलचं विमान, ६ क्षेपणास्त्रेही डागली, पण...  
2
वो बुलाती है मगर...! स्पा सेंटरच्या तरुणींनी इशारे करताच हा गेला..., स्वत:चा पाय मोडून आला
3
विरारमधील मराठी द्वेष्ट्या रिक्षाचालकाला शिवसेना कार्यकर्त्यांनी चांगलेच चोपले
4
बिहार हादरले! भाजप नेत्याची गोळ्या घालून हत्या! दोन तरुणांनी झाडल्या चार गोळ्या
5
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
6
तामिळनाडूमध्ये डिझेलने भरलेल्या मालगाडीला भीषण आग; संपूर्ण परिसरात आगीच्या ज्वाळा अन् धुराचे लोट
7
'ही' कंपनी प्रत्येक शेअरवर देणार २५०% लाभांश, आतापर्यंत ११००% परतावा; तुमच्या घरातही असेल यांचे टूल्स
8
Samsung S24 Ultra: कवडीच्या भावात मिळतोय सॅमसंग एस २४ अल्ट्रा; खरेदीवर थेट ६० हजारांचं डिस्काउंट!
9
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी! या दिवशी पीएम किसानचा २० वा हप्ता जमा होणार
10
तुमच्या PF खात्यात व्याजाचे पैसे आले का? फक्त एका मिनिटात 'या' सोप्या पद्धतीने शिल्लक तपासा!
11
फक्त दहावी शिकलीये तेजस्विनी पंडित, म्हणाली- "कॉलेजची फी भरायला वडिलांकडे पैसे नव्हते..."
12
वर्षा उसगावकरांसोबत डान्स करणार नाही, असं त्या 'महा'नटाने सांगितलं..; महेश टिळेकर यांचा मोठा खुलासा
13
Beed Video: 'डोक्यात मार... पायावर मार... मार... मार'; उपसरपंचाला काठ्या, दगडाने मारहाण, बीड पुन्हा हादरले
14
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
15
दक्षिण भारत प्रसिद्ध खलनायकाला मुकला; कोटा श्रीनिवास राव यांचे ८३ व्या वर्षी निधन
16
सोनं-शेअर्स विसरा! चांदीने दिला सर्वाधिक परतावा, किंमत १.११ लाख रुपयांवर, अजून किती वाढणार?
17
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
18
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
19
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
20
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...

हिपॅटायटिस रोखण्यासाठी सुसंवादाची आवश्यकता

By admin | Updated: August 1, 2014 23:17 IST

प्रसाद साळगावकर : शिरोडा येथील चर्चासत्रात मार्गदर्शन

शिरोडा : सर्व प्रकारच्या हिपॅटायटिसचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभावीपणे माहिती व शिक्षण तसेच सुसंवादाची गरज आहे. हिपॅटायटिसबद्दल शास्त्रीय माहिती जाणून घेऊन राहणीमानात सकारात्मक बदल करुन वेळेवर निदान झाल्यास योग्य काळजी घेतल्यास प्रत्येक रुग्णाला बचाव करणे शक्य आहे, असे प्रतिपादन शिरोडा येथील डॉ. प्रसाद साळगावकर यांनी केले.जागतिक हिपॅटायटीस विरोधी दिनाचे औचित्य साधून गणेश क्लिनिक शिरोडा यांच्यावतीने आयोजित केलेल्या हिपॅटायटिस धोका ओळखा, या मार्गदर्शनपर चर्चासत्रात डॉ. साळगावकर बोलत होते. डॉ. साळगावकर पुढे म्हणाले, संसर्गजन्य रोगांपैकी एचआयव्ही, टीबी, मलेरिया या रोगांची ज्याप्रमाणे जगजागृती झाली आहे. त्याच धर्तीवर जगातील आठव्या क्रमांकाचा आजार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हिपॅटायटिसबद्दल अद्यापही हवी त्या प्रमाणात जनजागृती झालेली नाही. पावसाळ्यात काविळीचे प्रमाण वाढते. अस्वच्छता, पाण्याचे कृत्रिम साठे, दूषित अन्नपदार्थ, उघड्यावरील व कच्चे अन्न यांचे सेवन, मद्यपान आदी कारणांमुळे काविळीची लागण होते. काविळीचा हा विषाणू आतड्यातील पेशींमध्ये प्राथमिक वाढ करतो. व त्यानंतर रक्ताव्दारे तो विषाणू यकृतातील पेशींवर हल्ला करुन यकृत दूषित करतो. हिपॅटायटिसचे सहा विषाणू असतात. मात्र, प्रत्येकवेळी सगळ्याच प्रकारच्या काविळीची प्राथमिक लक्षणे दिसून येत नाहीत. या आजारावरील प्रभावी लस बाजारात उपलब्ध असून त्याच्या सहाय्याने हा रोग आटोक्यात आणता येतो, असेही साळगावकर यांनी सांगितले. सध्या पावसात हिपॅटायटिसचे अनेक रुग्ण आढळतात. त्यांच्यावर गावठी उपचार न करता वेळीच डॉक्टरांशी सल्लामसलत केली गेल्यास काविळ आटोक्यात येऊ शकते. त्यामुळे वेळीच वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधण्याचे आवाहन साळगावकर यांनी केले आहे. (प्रतिनिधी)