शहरं
Join us  
Trending Stories
1
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
2
Donald Trump Tariffs : 'जर ट्रम्प-पुतिन यांची चर्चा अयशस्वी झाली तर आम्ही भारतावर अधिक शुल्क लादू...', अमेरिकेची नवी धमकी
3
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
4
थरकाप उडवणारा व्हिडीओ! मृत्यूने घातली झडप, बापाने लेकीसमोर जागेवरच सोडला जीव; दिल्लीतील घटना
5
अर्जुन तेंडुलकसंदर्भात हवाई सुंदरीला झालेला गैरसमज! क्रिकेटच्या देवानं आधी गंमत केली; मग...
6
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
7
Viral: माकड दादाने घेतली ‘डॉगेश भाऊं’ची मुलाखत, धम्माल VIDEO पाहून तुम्हीही पोट धरून हसाल
8
एकत्र जीवन संपवूया असं सांगून अल्पवयीन प्रेयसीला विष पाजून मारले, मग झाला फरार
9
स्वातंत्र्य दिनाच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा आणि द्या देशभक्तीच्या शुभेच्छा!
10
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
11
₹७५ वरून ₹५०० च्या पार ट्रेड करतोय हा शेअर, अचानक गुंतवणुकदारांचं स्वारस्य वाढलं, तुमच्याकडे आहे का स्टॉक?
12
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
13
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
14
जगातील सगळ्यात लहान ५ मोबाइल फोन; अगदी माचिसच्या डबीतही लपवून ठेवू शकता!
15
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
16
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
17
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
18
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
19
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
20
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला

निसर्ग साक्षरता चळवळीची गरज

By admin | Updated: January 19, 2016 00:06 IST

राजेंद्रसिंह : रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीतर्फे जलचेतना मार्गदर्शन मेळाव्याचे आयोजन

रत्नागिरी : कोकणातील निसर्ग सुखी व समृध्द होण्यासाठी निसर्ग साक्षरतेची चळवळ उभी करण्याची नितांत आवश्यकता आहे. आजच्या युवापिढीने त्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन रॅमन मॅगासेसे व जलक्षेत्रातील नोबेल पुरस्कार विजेते जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांनी केले आहे.रत्नागिरी एज्युकेशन सोसायटी, कोकण भूमी प्रतिष्ठान, हिरवळ प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने गोगटे - जोगळेकर महाविद्यालयाच्या राधाबाई शेट्ये सभागृह येथे आयोजित जलचेतना मार्गदर्शन मेळाव्यात डॉ. राजेंद्रसिंह हे बोलत होते. यावेळी रत्नागिरी एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष अ‍ॅड. विलास पाटणे, कोकण भूमी प्रतिष्ठानचे प्रमुख कार्यवाह संजय यादवराव, हिरवळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष किशोर धारिया, स्वामी जयमृत्युंजय, जयपूर विद्यापीठाचे कुलगुरू ए. डी. सावंत, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर उपस्थित होते.२१ व्या शतकामध्ये जल, वायू परिवर्तन सुरू आहे. कोकण तर भारताचा स्वर्ग आहे. येथील लोक, सुंदर पर्वत, हिरवेगार जंगल, डोंगरावरील सुंदर घरे यामुळे कोकण हे नंदनवन आहे. ४ मीटर पाऊस याठिकाणी पडतो, तरीही पाण्याबाबत दुर्भिक्ष आढळते. गेल्या दोनशे वर्षाचा इतिहास पाहिला तर धरणीमातेच्या वरच्या भागाबाबत संशोधन झाले. मात्र, धरती हिरवीगार राहण्यासाठी कोणतीही उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे जर ठोस उपाययोजना झाली नाही तर या भविष्यात स्वर्गाचे नरकात रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही, असेही राजेंद्रसिंह यांनी सांगितले.नद्या गाळांनी भरल्या आहेत. शिवाय शहरातील मैला नदी, नाल्यांतून सोडण्यात आल्याने प्रदूषित झाल्या आहेत. विहिरींची पातळी खालावली आहे. राजस्थानमध्ये गेली ३१ वर्षे अव्याहतपणे काम केल्यामुळेच तेथे नद्या वाहू लागल्या आहेत, विहीरीतील पाण्याची पातळी वाढली आहे. भविष्यात याच प्रयत्नामुळे राजस्थानदेखील सह्याद्री बनेल, असेही डॉ. राजेंद्रसिंह यांनी सांगितले. त्यासाठी राजकीय नेते मडळींनीही सहकार्य केले पाहिजे, असे सांगितले.प्रास्ताविक प्राचार्य डॉ. किशोर सुखटणकर यांनी केले. कोकण भूमि प्रतिष्ठानचे प्रमुख कार्यवाह संजय यादवराव यांनी कोकणातील प्रत्येक महाविद्यालयाने एक नदी दत्तक घेतली पाहिजे, असे सांगितले. जलसाक्षरतेसाठी जनआंदोलनाची आवश्यकता असल्याचे किशोर धारिया यांनी सांगितले. सोसायटी कार्याध्यक्ष अ‍ॅड. विलास पाटणे यांनी १५० इंच पाऊस पडूनही कोकणात पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते, हे टाळण्यासाठी चळवळ उभारण्याची आवश्यकता स्पष्ट केली. प्रा. महेश नाईक यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)राजस्थानात ३१ वर्ष : महाविद्यालयाचे कौतुकराजस्थानमध्ये ३१ वर्षापासून अव्याहतपणे काम केल्यामुळेच आता त्याठिकाणी पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. नद्या खळखळून वाहू लागल्या आहेत, हिरवीगार शेती शिवारात डोलू लागली आहे. ढग बरसू लागले आहेत. मात्र, माझ्यासह हजारो मंडळींनी त्यासाठी भरपूर मेहनत घेतली आहे. स्लाईड शोद्वारे त्यांनी १५ वषापूर्वीचा राजस्थान व आजचा राजस्थान यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांशीही त्यांनी यावेळी संवाद साधला. महाविद्यालयाच्या गेले १६ वर्षे गोळप येथे सुरू असलेल्या कामाचेही त्यांनी कौतुक केले.जलचेतना मार्गदर्शनजयपूर विद्यापीठाचे कुलगुरू ए. डी. सावंत यांच्या ‘कोकणातील बेदखल कुळांचे प्रश्न’ विषयावरील पुस्तकाचे प्रकाशन या कार्यक्रमात करण्यात आले.