शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

डिझेल कोेट्यासाठी आंदोलन

By admin | Updated: March 3, 2015 00:32 IST

सर्जेकोट संस्था : कृष्णनाथ तांडेल यांची पालकमंत्र्यांवर टीका

मालवण : नवीन व जुन्या यंत्रनौकांचा वाढीव डिझेल कोटा अद्याप मंजूर न झाल्याने श्री भद्रकाली देवी मत्स्य व्यवसाय सहकारी संस्था मर्यादित मिर्याबांदा, सर्जेकोट या संस्थेतर्फे येथील मत्स्य व्यवसाय कार्यालयासमोर सोमवारी प्रातिनिधीक धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी बोलताना मच्छिमार नेते कृष्णनाथ तांडेल यांनी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करताना सध्या मच्छिमार समाज विविध समस्यांनी ग्रासलेला असताना पालकमंत्र्यांचे मच्छिमारांकडे दुर्लक्ष होत असून मच्छिमारांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांना वेळ नाही अशी टीका केली.या धरणे आंदोलनात कृष्णनाथ तांडेल यांच्यासह संस्थेचे अध्यक्ष गोपीनाथ तांडेल, संचालक नागेश परब, शरद धुरी, सुहास आडकर, रामकृष्ण जोशी, महेश पराडकर, भगवान मुंबरकर, सुभाष लोणे, दिनानाथ धुरी, संतोष रेवंडकर, मुरारी सावंत, विष्णू जामसंडेकर, दीपेश मायबा, राजेश गोवेकर, देवेंद्र शेलटकर, श्रीकांत परब, रजनिकांत देऊलकर, शरद आचरेकर, प्रफुल्ल धुरी, गुरुनाथ खवणेकर, रोहिदास लोणे, ध्रुवबाळ फोंडबा, हेमंत मेतर, रामदास धुरी आदी मच्छिमार सहभागी झाले होते. यावेळी तांडेल म्हणाले, आज मच्छिमार अनेक समस्यांनी ग्रासल आहेत. डिझेल कोटा मंजूर न झाल्याने यांत्रिक नौकाधारक मच्छिमार अडचणीत आला आहे. जिल्ह्याच्या किनारपट्टीवर परप्रांतीय ट्रॉलर्स धुमाकूळ घालून मासळी चोरून नेत आहेत. मत्स्य विभागाची समुद्रात कोणतीही गस्त नसल्यानेच परप्रांतीय ट्रॉलर्सचे फावले आहे.तसेच मच्छिमारांचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे रखडलेले आहेत. समुद्राच्या उधाणामुळे मच्छिमारांच्या घरांना धोका निर्माण झाला असताना किनारपट्टीवर धूप प्रतिबंधक बंधारा कम रस्ता असा जोडप्रकल्प होणे गरजेचे असून मच्छिमार मागणी करीत असतानाही शासनाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. तसेच सीआरझेडपासून मच्छिमारांना सूट मिळावी, प्रत्येक मच्छिमारी सहकारी संस्थेने केलेली अंडरग्राऊंड डिझेल पंप देण्याची मागणी अशा विविध मागण्यांकडे सातत्याने दुर्लक्ष होत आहे. म्हणून आम्ही प्रातिनिधीक धरणे आंदोलन करीत आहोत असेही कृष्णनाथ तांडेल म्हणाले. (प्रतिनिधी)भाजपा-शिवसेना नेते गप्प का?बदलत्या हवामानामुळेही मासेमारीवर विपरीत परिणाम होत आहे. अशा अनेक समस्यांमध्ये मच्छिमार भरडला जात असताना जिल्ह्याचे पालकमंत्री असणाऱ्या दीपक केसरकर यांचे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे. माजी पालकमंत्री नारायण राणे यांनी मच्छिमार समाजाच्या उन्नतीसाठी विधानसभेत आवाज उठवून व पाठपुरावा करून अनेक समस्या सोडविल्या. सत्तेत नसताना मच्छिमारांच्या प्रश्नांवर पेटून उठणारे भाजपा-शिवसेनेचे नेते आता गप्प का? सध्याच्या पालकमंत्र्यांना मच्छिमारांच्या प्रश्नांना वाचा फोडून शासनाकडे पाठपुरावा करण्यासाठी वेळ नाही. तसेच मच्छिमार व्यवसायाकडे पालकमंत्र्यांचा उदासीन दृष्टीकोन असल्याचे दिसून येते असेही तांडेल म्हणाले.