शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग बाकीच्या मराठ्यांचं काय? त्यांचा विचार कोण करणार?", विनोद पाटलांनी दाखवले आकडे
2
"राजवटींचा काळ संपला; तुम्ही भारत, चीनसोबत असं बोलू शकत नाही"; पुतीन यांनी ट्रम्प यांना सुनावलं
3
"...यापुढे दक्षिण मुंबईत आंदोलनावर निर्बंध आणावेत"; शिंदेसेनेच्या खासदाराचं CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
4
Shikhar Dhawan Summoned By ED : शिखर धवन ईडीच्या रडारवर; Betting App प्रकरणात होणार कसून चौकशी
5
'बेकायदेशीरपणे झाडे तोडल्यामुळे आपत्ती आली', पूर आणि भूस्खलनावर सर्वोच्च न्यायालयाची कडक टिप्पणी
6
४२ दिवसांत तब्बल १२ वेळा मुलीला चावला साप; पण नेमकं कारण तरी काय? डॉक्टर म्हणाले...
7
Palmistry: नशिबात राजयोग आहे की नाही, हे तळहाताच्या 'या' चिन्हावरुन ओळखू शकता!
8
राहुल गांधी यांच्या हायड्रोजन बॉम्बमध्ये नेमकं आहे काय? तो फुटणार कुठे, समोर येतेय अशी माहिती  
9
GST Rate Change: Activa, स्प्लेंडर, पल्सर.., GST बदलल्यानं कोणती बाईक-स्कुटी होणार स्वस्त, कोणती महागणार? जाणून घ्या
10
काँग्रेसने सर्वात आधी GST सुधारणांची मागणी केली; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
11
रात्रभर अभ्यास केला, सकाळी मृतावस्थेत आढळला; IIT च्या विद्यार्थ्याचा परिक्षेच्या आदल्या दिवशी मृत्यू
12
GST मधील कपातीमुळे शैक्षणिक फीसुद्धा कमी होणार?; शालेय साहित्य स्वस्त दरात मिळणार
13
'WhatsApp' वर मोठा धोका! केंद्र सरकारने दिला इशारा, अपडेट करण्याचा दिला सल्ला
14
GST Rate Cut: कार आणि बाईक झाल्या स्वस्त; पण Anand Mahindra यांनी केली आणखी एक मागणी...
15
मृत्यू पंचक २०२५: अनंत चतुर्दशी, चंद्रग्रहणात अशुभाची छाया; चुकूनही ‘ही’ कामे करू नका!
16
Anant Chaturdashi 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी अनंत चतुर्दशीपासून २१ दिवस म्हणा 'हे' पॉवरफुल स्तोत्र!
17
Duleep Trophy 2025 Semi Final : यशस्वीचा अयशस्वी डाव; ऋतुराजच्या भात्यातून दिलासा देणारी 'फिफ्टी'
18
Video: पैज लागली, 500 रुपयांसाठी तरुणाची यमुनेच्या पुरात उडी; नंतर बघा काय घडलं?
19
मराठवाड्यातील ८५५० पैकी १५१६ गावांतच सापडल्या ‘कुणबी’च्या नोंदी
20
Pitru Paksha 2025: यंदा पितृपक्षाची सुरुवात आणि शेवट ग्रहणाने; श्राद्धविधिवर होणार परिणाम?

साहीलला जेरबंद करुनच मकेश्वर यांनी पिच्छा सोडला...!

By admin | Updated: July 29, 2015 21:58 IST

आपल्या नेटवर्कच्या बळावर जेलमधून पळालेल्या ३ नामचीन गुंडांना जेरबंद करून त्यांनी हॅटट्रिक साधली आहे.

सुभाष कदम -चिपळूण -गुन्हेगार कितीही सराईत असला किंवा नामचीन असला तरी त्याला पकडण्याचा विडा उचलणाऱ्या अधिकाऱ्यांची इच्छाशक्ती किती तीव्र आहे, त्यावर त्या अधिकाऱ्याचे यश अवलंबून असते. जिल्हा पोलीस दलात चिपळूणचे पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झालेल्या प्रमोद मकेश्वर यांच्याबाबतीतही तसेच घडले. आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर व आपल्या नेटवर्कच्या बळावर जेलमधून पळालेल्या ३ नामचीन गुंडांना जेरबंद करून त्यांनी हॅटट्रिक साधली आहे.पोलीस दलाबाबत अनेक शंका कुशंका घेतल्या जातात. अनेकवेळा पोलिसांवर संशय व्यक्त केला जातो. पोलीस लाचखाऊ असतात, असा शब्द परवलीचा बनला आहे. त्यामुळे समाजातील पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे. चिपळुणातील काही पोलीस साहील कालसेकरला मदत करतात, असा आरोपही होत आहे. त्यामुळे पोलिसांची डोकेदुखी ठरलेल्या कालसेकरला अटक करणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. साहीलने पोलीस कॉन्स्टेबल उदय वाजे यांच्यावर हल्ला केला होता. यावेळी जमावाने त्याला बेदम मारले होते. त्यामुळे त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात ठेवले असतानाच पोलिसांची नजर चुकवून १५ जुलै रोजी सकाळी ७ वाजता त्याने पलायन केले होते. पोलीस त्याच्या मागावर होते. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी याप्रकरणी साहीलला त्वरित जेरबंद करण्याचे आदेश दिले होते. पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांना साहीलच्या सवयी व साहीलबाबत अधिक माहिती असल्याने त्यांच्यावर जास्त विश्वास टाकून या मोहिमेचे सूत्र जिल्हा पोलीस अधीक्षक शिंदे यांनी पोलीस निरीक्षक मकेश्वर यांच्याकडे सोपवली होती. मकेश्वर यांनी सापळा रचला होता. सुरुवातीला दोन दिवस अंदाज आला नाही. परंतु, नंतर तो मुंबईत गेला आणि चक्रे वेगाने फिरली. मकेश्वर व त्यांचे सहकारी स्वत: मुंबईत गेले. तेथे त्यांनी ४ टॅक्सी बुक केल्या होत्या. स्वत: मकेश्वर मुंडन करुन मिशी काढून वेश बदलून मिशनवर जाणार होते. तोच साहील मुंबईतून देवरुख येथे आला. साहील वापरत असलेल्या सीमची माहिती पोलिसांना मिळाली. तो सातत्याने सीम बदलत होता. त्याचा मागोवा पोलीस घेत होते. स्वत:ला हुशार समजणाऱ्या साहीलवर पोलिसांची करडी नजर होती. परंतु, तो रेंजमध्ये येत नव्हता. साहीलने या काळात पैशासाठी अनेकांना फोन केले. ते सर्व कॉल ट्रेस करण्यात आले. अखेर देवरुख येथील एका व्यक्तीशी साहीलने संपर्क साधला. याची माहिती पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी संबंधित व्यक्तीला गाठले. साहील पुन्हा पैसे नेण्यासाठी त्या व्यक्तीकडे येणार होता. पोलिसांनी त्या व्यक्तीला विश्वासात घेऊन साहीलसाठी सापळा रचला होता. या सापळ्यात साहील अलगद सापडला. मकेश्वर यांनी अत्यंत हुशारीने साहीलला जेरबंद केले. साहीलच्या हाती पैसे मिळाले असते किंवा दोन दिवस उशीर झाला असता तर तो अजमेरला पळाला असता. तेथे तो फुकट जगला असता आणि आमचा ताप अधिक वाढला असता. मग त्याला शोधणे कठीण होते, असे पोलीस निरीक्षक मेकश्वर यांनी सांगितले. जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी केलेले मार्गदर्शन व नागरिकांनी केलेले सर्वतोपरी सहकार्य यामुळे हे शक्य झाल्याचे मकेश्वर यांनी सांगितले. यांच्या विश्वासामुळेच आपण हे आव्हान लिलया पेलल,े असेही मकेश्वर म्हणाले. घरफोडी प्रकरणातील किरण मोरे, बलात्कारप्रकरणी रितेश कदम व आता विविध गुन्ह्यातील साहील कालसेकर हे तिन्ही आरोपी पळून गेले होते. पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनी हे तिन्ही आरोपी पकडण्यात यश मिळविले. त्यामुळे त्यांनी अनोखी हॅटट्रिक नोंदवली आहे. या कामगिरीबद्दल मकेश्वर यांचे अभिनंदन होत आहे.बुधवारचा योगायोग... साहील कालसेकर बुधवारी जिल्हा रुग्णालयातून पळाला आणि पोलिसांनी त्याला बुधवारीच पकडले. पोलीस दलाची या प्रकरणामुळे प्रतिमा मलिन झाली होती. चार कर्मचारी निलंबित होते. आता साहील पकडला गेल्याने पोलीस दलाचे मनोधैर्य उंचावले आहे.