शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

हजारो बाधित रूग्णांना जीवदान

By admin | Updated: July 25, 2014 22:54 IST

सर्प-विंचू दंश : दिलासादायक उपचारांमुळे दगावणाऱ्यांच्या संख्येत घट

प्रकाश वराडकर - रत्नागिरी , जिल्ह्यात गेल्या काही वर्षांत विषारी सापांचा दंश व विंचूदंशाच्या रुग्णसंख्येत सातत्याने वाढ झाली आहे. गेल्या सव्वा चार वर्षांच्या काळात जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झालेल्या सर्पदंशाच्या १३ जणांना, तर विंचूदंश झालेल्या ३ रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत. जिल्हा रुग्णालयातील सुत्रांनी ही माहिती दिली. मात्र, सर्प व विंचूदंश झालेल्या रूग्णांना उशिराने दाखल केलेल्या अनेक रुग्णांचे प्राण अथक प्रयत्नांनंतरही जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी वाचवले आहेत. जिल्ह्याच्या विविध भागात सध्या लावणीसह शेतीची कामे सुरू आहेत. याच काळात सर्प व विंचूदंशाचे प्रमाण अधिक आहे. अनेकदा विंचूदंश वा सरपटणाऱ्या प्राण्यांचा दंश झाल्याचे लक्षातही येत नाही. मात्र, त्यानंतर त्याचे दुष्परिणाम जाणवू लागतात. विंचूदंशानंतर रक्तदाब कमी जास्त होणे, नाडीचे ठोके कमी जास्त होणे, हृदयाचे ठोके वाढणे, कमी होणे असा त्रास सुरू होतो. त्यामुळे असा त्रास सुरू होताच तातडीने विष उतरविण्यासाठी रुग्णाला दवाखान्यात दाखल करणे आवश्यक असते. अनेकदा उशीर झाल्याने रुग्णांच्या शरीरात विष भिनते. त्यामुळे विष उतरवण्यासाठी अधिक प्रमाणात इंजेक्शन्स द्यावी लागतात.विंचूदंशाचे प्रमाणही जिल्ह्यात अधिक आहे. खेड, दापोली विभागातील गडद काळ्या रंगाचे विंचू अतिविषारी (टॉक्सिक) असतात. गेल्या सव्वा चार वर्षांच्या काळात जिल्हा रुग्णालयात दाखल झालेल्या विंचूदंशाच्या रुग्णांपैकी ३ रुग्णांचा मृत्यू झाला.मात्र, यातील तीनही बळी हे २०१०-११ व २०११-१२ या दोन वर्षांतील आहेत. गेल्या सव्वा दोन वर्षांच्या काळात विंचूदंशाचे रुग्ण वाढले असले तरी योग्य व वेळीच उपचारामुळे हजारो लोकांचे जीव वाचले आहेत.जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात २०१३-१४ यावर्षी विंचूदंशाचे ३४०५ रुग्ण, तर सर्पदंशाचे १२१३ रुग्ण दाखल झाले होते. जिल्ह्यातील प्रत्येक आरोग्य केंद्रात सर्पदंशावरील अ‍ॅन्टी स्नेक व्हॅक्सीन १५, तर अ‍ॅन्टी स्कोर्पियन व्हॅक्सीन ५ या प्रमाणात ठेवण्यात आली आहेत. जिल्हा रुग्णालयात या औषधांचा साठा अधिक आहे. ज्या रुग्णालयांना वा प्राथमिक आरोग्य केंद्राना या औषधांची अतिरिक्त गरज भासली तर तत्काळ उपलब्ध करून दिली जात असल्याची माहिती जिल्हा परिषद आरोग्य विभागाने दिली. सनसर्पदंश रुग्णदगावलेले२०१०-११५५०३२०११-१२५३४४२०१२-१३३९६३२०१३-१४५०३२२०१४-१५१२६१(एप्रिल ते जून)एकूण२१०९१३इंगळी अधिक विषारी...जिल्ह्यात चिपळूण, खेडमध्ये अतिविषारी इंगळी (विंचू) चे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे त्या भागातील इंगळीदंशाच्या रुग्णांना विषबाधा अधिक होण्याचे प्रमाण पाहता व्हॅक्सीनचे डोस अधिक द्यावे लागतात. कोब्रा जातीचे नाग, धामण, घोणस, मण्यार, फुरसे यांसारखे विषारी साप जिल्ह्यात आढळून येतात. विंचू व सर्पदंश झाल्यानंतर उशिराने रुग्ण उपचारास आला तर काही वेळा त्याला ३० ते ३५ इंजेक्शन्सही द्यावी लागतात. दोन वर्षांपूर्वी डेरवण रुग्णालयात एका रुग्णाला ३५ व्हॅक्सीन्सचा डोस द्यावा लागला होता, अशी माहिती आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. वर्षसर्पदंश/मृत्यूविंचूदंश/मृत्यू २०१०-११५५०/३२६९/१२०११-१२५३४/४१५७/२२०१२-१३३९६/३१६८/०२०१३-१४५०३/२३०९/०२०१४-१५ १२६/११०८/०(एप्रिल ते जून)एकूण