शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसे युती, संजय राऊतांना मानाचे स्थान, पण बाळा नांदगावकर कुठेच दिसेना; गेले कुठे?
2
"आमचं हिंदुत्व अस्सल, फक्त मतांसाठी भगवी शाल घालणारे आम्ही नाहीत"; मुख्यमंत्र्यांचे राज ठाकरेंना सडेतोड उत्तर
3
Eknath Shinde: आपली पोरं सांभाळू शकत नाहीत, मुंबई काय सांभाळणार? एकनाथ शिंदेंची ठाकरे बंधूंवर टीका
4
"पराभव समोर दिसताच भाजप पैसा आणि जातीचे राजकारण सुरू करते" आदित्य ठाकरेंची बोचरी टीका!
5
विराट सेंच्युरी! किंग कोहलीनं मोडला मास्टर ब्लास्टर सचिनचा रेकॉर्ड; वेगाने गाठला १६००० धावांचा पल्ला
6
नितेश राणे, प्रवीण दरेकर आणि प्रसाद लाड यांना कोर्टाचा दणका, बजावलं अजामिनपात्र वॉरंट
7
जपानमध्ये शंभरी पार करणार्‍यांची संख्या लक्षावधी, महिलांचे प्रमाण अधिक; दीर्घायुष्याचे गुपित काय?
8
युतीची घोषणा मात्र जागांचा सस्पेन्स; उद्धवसेना-मनसेत जागावाटपावर 'असा' ठरलाय फॉर्म्युला?
9
सोनं थांबेना, चांदी आवरेना! सोन्याच्या दरात ७०% तर चांदीत १५० टक्क्यांची वाढ; पाहा कुठे पोहोचतील किमती?
10
राष्ट्रवादीचे नेते राहुल कलाटे भाजपमध्ये;पक्षातील कार्यकर्त्यांचा विरोध डावलून दिला प्रवेश
11
'या' वाक्यापासून आम्ही एकत्र येण्याची सुरुवात झाली; राज ठाकरेंनी सांगितली 'मनोमिलना'ची कथा
12
Christmas Sale 2025: स्मार्टफोन, कपडे आणि घरगुती उपकरणांवर सवलतींचा पाऊस; वर्षाच्या शेवटी कुठे आहेत बंपर ऑफर्स
13
युती होताच दाखवलं शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतरच पहिलं भाषण; भाजपनं राज ठाकरेंना डिवचलं
14
रोहितच्या शतकानं मन भरलं नाही! चाहत्याची थेट मुंबईचा कर्णधार शार्दुल ठाकूरला विनंती! आम्हाला...
15
नोकरी गेली तरी भीती नाही, तुमच्या कर्जाचा हप्ता आता विमा कंपनी भरेल; नक्की काय आहे प्रकरण?
16
उल्हासनगरात उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; कल्याण जिल्हाप्रमुख धनंजय बोडारे यांचा भाजपात प्रवेश
17
"आमचा हिंदुत्ववाद केवळ पूजापद्धतीवर आधारित नाही तर..."; CM फडणवीसांनी ठाकरे बंधूंना सुनावलं
18
मेष वार्षिक राशिभविष्य २०२६: 'आत्मिक शांती' आणि प्रगतीचे वर्ष; आव्हाने पेलून गाठता येणार यशाचे शिखर!
19
प्राजक्ताच्या स्वप्नातील राजकुमार आहे तरी कसा? लग्नासाठी तिची एकच अट; सिंगल राहण्यामागचं खरं कारण समोर
20
जालना महापालिकेत भाजपानं युती न केल्यास सर्व पर्याय खुले; शिंदेसेनेचे आमदार खोतकरांचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

...इथे बदलताहेत होलिकोत्सवाचे रंग

By admin | Updated: March 4, 2015 23:45 IST

उत्सवाला आजपासून प्रारंभ : जिल्ह्यात १११६ ठिकाणी होणार साजरा

मिलिंद पारकर - कणकवली - वाईट गोष्टींना जाळून चांगल्या गोष्टींच्या उदात्तीकरणासाठी सुरू झालेला होलिकोत्सव सिंधुदुर्गात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाही त्याला अपवाद नाही. पण यावेळच्या होलिकोत्सवाचे रंग बदलताना आढळत आहेत. सिंधुदुर्गात एकूण ६२२ खासगी तर ४९४ सार्वजनिक अशा १११६ ठिकाणी होलिकोत्सव साजरा होतो.होळीचे पारंपरिक स्वरूप कायम असले तरी होळी साजरी करण्याबाबत विविध मतप्रवाह निर्माण होत आहेत. सिंधुदुर्गात मानपानावरून होणाऱ्या वादातून काही गावांतील होळी उत्सवाच्या आनंदावर विरजण पडते आहे. मात्र ज्येष्ठांच्या पुढाकाराने या होळीचेही रंग बदलत आहेत. होळीसोबत जोडलेल्या रंगपंचमीचेही स्वरूप बदलते आहे. पारंपरिक होलिकोत्सव सिंधुदुर्गातील गावागावात साजरा होतो. गावागावात होळीचा मांड असतो. या मांडावर होळीच्या आदल्या दिवशी उंच झाड तोडून आणून उभे केले जाते. रोज रात्री मांडावर सोंगे आणली जातात. उत्सव साधारणत: पाच दिवस, काही ठिकाणी तो गुढीपाडव्यापर्यंत चालतो. रोंबटातून नाचा, मानकरी व धरकरी होळीची गाणी म्हणत मिरवणुकीने फिरतात आणि रात्री बोंब मारली जाते. कवळकाठी तोडून होळी पेटवत त्याभोवती वाद्ये वाजवत गाणी गातात. होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदन किंवा धुळवड साजरी होते. भरभरून देणाऱ्या निसर्गास वंदन करण्याचा प्रयत्न होतो. गावहोळीकडे रोंबाट मारले जाते. तसेच घरोघरी जाणाऱ्या रोंबटात नाचाच्या हातात तळी असते. ओवाळणी केल्यानंतर घरातून बिदागी मिळते. होळीच्या दिवसांत घरोघर सोंगे घेऊन जातात. यामध्ये ‘नाचे’ असतात. त्याचवेळी शबय मागितली जाते. होळीच्या दिवसांत मागितल्या जाणाऱ्या शबयचा मान ठेवून ऐपतीप्रमाणे बिदागी दिली जाते. होळी सणाच्या माध्यमातून लोकांच्या मानसिकतेचा पूर्ण विचार करण्यात आला आहे. माणसाच्या भावनांचा निचरा करण्याची सोय होळी सणाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या सणाच्या माध्यमातून वर्षभर बंधनात असलेला सज्जन माणूस थोडा मोकळा होतो. पूर्वी होळी सणात शिवराळपणा खूप होता. आता शहरीकरणाने हा भाग घटला आहे. घरोघरी सोंगे घेऊन जाण्यासही नव्या पिढीच्या मुलांना कमीपणा वाटू लागला आहे. - प्रा. जी. ए. बुवादिन विशेष---सिंधुदुर्गातील होळी परंपरेत ‘बोंब मारणे’, ‘रोंबाट’, ‘धुळवड’, ‘शबय’, ‘शिमग्यातील सोंगे’ हे भाग येतात. होळीच्या दिवशी घरोघरी पुरणपोळी केली जाते.होळीच्या दुसऱ्या दिवसापासून जिल्ह्यात रंगपंचमी साजरी होते. पारंपरिक होळी साजरी करण्याबरोबरच यामध्ये अनेक गैरप्रकारांचा शिरकाव झाल्याने हिंदू जनजागृती समितीसारख्या संघटनेने आदर्श होळी साजरी करण्याचा उपक्रम सुरू केला. होळी सणात होणारे गैरप्रकार टाळून सण साजरा केला जावा, असा समितीचा उद्देश आहे. गेली पंधरा वर्षे आदर्श होळीचा उपक्रम सुरू असून वेंगुर्ले, शिरोडा-केरवाडा, कुडाळ आणि कणकवली येथे समितीतर्फे आदर्श होळी साजरी केली जाते. शेणाच्या गोवऱ्या, तूप टाकून होळी पेटवली जाते. पुरोहितांकडून या होळीची विधीवत पूजा केली जाते. तसेच यावेळी होळीनिमित्त जबरदस्तीने वर्गणी गोळा करणे, रंग टाकण्याची भीती घालून वाहनधारकांकडून पैसे गोळा करणे, रासायनिक रंग न वापरता नैसर्गिक रंगांचा वापर करणे आदींबाबत प्रबोधन केले जाते. होळी साजरा करण्यामागील अध्यात्मिक महत्त्व विषद केले जाते. या उपक्रमाला दिवसेंदिवस समाजातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.