शहरं
Join us  
Trending Stories
1
HSC Exam Result 2025 : कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
2
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
3
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
4
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
5
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
6
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
7
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
8
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
9
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
10
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
11
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
12
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
13
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
14
Mumbai Fire: मुंबईत कपड्याच्या शोरुममध्ये अग्नितांडव! पाच मजली इमारतीत अडकलेले लहान मुलांसह १९ लोक
15
पाकिस्तान सुधारत नाही! सलग ११ व्या दिवशी युद्धबंदीचे उल्लंघन; भारतीय सैनिकांनी धडा शिकवला
16
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी
17
Pahalgam Attack Update: जम्मू काश्मिरातील तुरुंगावर दहशतवादी हल्ल्याचा अलर्ट, दहशतवादी आणि ओजीडब्ल्यू आहेत बंद
18
Video: चिनी फॅक्टरीत रोबोट अचानक झाला हिंसक; कर्मचाऱ्यांवर केला जीवघेणा हल्ला, मग...
19
FD द्वारे रक्कम होऊ शकते तिप्पट, अनेकांना माहितही नाही; ₹५ लाख जमा करा, ₹१५ लाखांपेक्षा जास्त मिळतील
20
मिचमिच डोळे, रडारचे कान...! एमजी अ‍ॅस्टरमधून पुण्यात आणि गावखेड्यात भटकंती, कशी वाटली एसयुव्ही...

...इथे बदलताहेत होलिकोत्सवाचे रंग

By admin | Updated: March 4, 2015 23:45 IST

उत्सवाला आजपासून प्रारंभ : जिल्ह्यात १११६ ठिकाणी होणार साजरा

मिलिंद पारकर - कणकवली - वाईट गोष्टींना जाळून चांगल्या गोष्टींच्या उदात्तीकरणासाठी सुरू झालेला होलिकोत्सव सिंधुदुर्गात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. यंदाही त्याला अपवाद नाही. पण यावेळच्या होलिकोत्सवाचे रंग बदलताना आढळत आहेत. सिंधुदुर्गात एकूण ६२२ खासगी तर ४९४ सार्वजनिक अशा १११६ ठिकाणी होलिकोत्सव साजरा होतो.होळीचे पारंपरिक स्वरूप कायम असले तरी होळी साजरी करण्याबाबत विविध मतप्रवाह निर्माण होत आहेत. सिंधुदुर्गात मानपानावरून होणाऱ्या वादातून काही गावांतील होळी उत्सवाच्या आनंदावर विरजण पडते आहे. मात्र ज्येष्ठांच्या पुढाकाराने या होळीचेही रंग बदलत आहेत. होळीसोबत जोडलेल्या रंगपंचमीचेही स्वरूप बदलते आहे. पारंपरिक होलिकोत्सव सिंधुदुर्गातील गावागावात साजरा होतो. गावागावात होळीचा मांड असतो. या मांडावर होळीच्या आदल्या दिवशी उंच झाड तोडून आणून उभे केले जाते. रोज रात्री मांडावर सोंगे आणली जातात. उत्सव साधारणत: पाच दिवस, काही ठिकाणी तो गुढीपाडव्यापर्यंत चालतो. रोंबटातून नाचा, मानकरी व धरकरी होळीची गाणी म्हणत मिरवणुकीने फिरतात आणि रात्री बोंब मारली जाते. कवळकाठी तोडून होळी पेटवत त्याभोवती वाद्ये वाजवत गाणी गातात. होळीच्या दुसऱ्या दिवशी धूलिवंदन किंवा धुळवड साजरी होते. भरभरून देणाऱ्या निसर्गास वंदन करण्याचा प्रयत्न होतो. गावहोळीकडे रोंबाट मारले जाते. तसेच घरोघरी जाणाऱ्या रोंबटात नाचाच्या हातात तळी असते. ओवाळणी केल्यानंतर घरातून बिदागी मिळते. होळीच्या दिवसांत घरोघर सोंगे घेऊन जातात. यामध्ये ‘नाचे’ असतात. त्याचवेळी शबय मागितली जाते. होळीच्या दिवसांत मागितल्या जाणाऱ्या शबयचा मान ठेवून ऐपतीप्रमाणे बिदागी दिली जाते. होळी सणाच्या माध्यमातून लोकांच्या मानसिकतेचा पूर्ण विचार करण्यात आला आहे. माणसाच्या भावनांचा निचरा करण्याची सोय होळी सणाच्या माध्यमातून करण्यात आली आहे. या सणाच्या माध्यमातून वर्षभर बंधनात असलेला सज्जन माणूस थोडा मोकळा होतो. पूर्वी होळी सणात शिवराळपणा खूप होता. आता शहरीकरणाने हा भाग घटला आहे. घरोघरी सोंगे घेऊन जाण्यासही नव्या पिढीच्या मुलांना कमीपणा वाटू लागला आहे. - प्रा. जी. ए. बुवादिन विशेष---सिंधुदुर्गातील होळी परंपरेत ‘बोंब मारणे’, ‘रोंबाट’, ‘धुळवड’, ‘शबय’, ‘शिमग्यातील सोंगे’ हे भाग येतात. होळीच्या दिवशी घरोघरी पुरणपोळी केली जाते.होळीच्या दुसऱ्या दिवसापासून जिल्ह्यात रंगपंचमी साजरी होते. पारंपरिक होळी साजरी करण्याबरोबरच यामध्ये अनेक गैरप्रकारांचा शिरकाव झाल्याने हिंदू जनजागृती समितीसारख्या संघटनेने आदर्श होळी साजरी करण्याचा उपक्रम सुरू केला. होळी सणात होणारे गैरप्रकार टाळून सण साजरा केला जावा, असा समितीचा उद्देश आहे. गेली पंधरा वर्षे आदर्श होळीचा उपक्रम सुरू असून वेंगुर्ले, शिरोडा-केरवाडा, कुडाळ आणि कणकवली येथे समितीतर्फे आदर्श होळी साजरी केली जाते. शेणाच्या गोवऱ्या, तूप टाकून होळी पेटवली जाते. पुरोहितांकडून या होळीची विधीवत पूजा केली जाते. तसेच यावेळी होळीनिमित्त जबरदस्तीने वर्गणी गोळा करणे, रंग टाकण्याची भीती घालून वाहनधारकांकडून पैसे गोळा करणे, रासायनिक रंग न वापरता नैसर्गिक रंगांचा वापर करणे आदींबाबत प्रबोधन केले जाते. होळी साजरा करण्यामागील अध्यात्मिक महत्त्व विषद केले जाते. या उपक्रमाला दिवसेंदिवस समाजातून चांगला प्रतिसाद मिळत आहे.