शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
3
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
4
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
5
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
6
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
7
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
8
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
9
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
10
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
11
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
12
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
13
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
14
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
15
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
16
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
17
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
18
“कुणीही एकत्र येऊ शकते, पण मराठी माणूस हा पूर्णपणे भाजपाच्या पाठीशी उभा आहे”; कुणाचा दावा?
19
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
20
घसरत्या रुपयाला सावरण्यासाठी आरबीआयची धडपड; बाजारात विकले तब्बल....अब्ज डॉलर
Daily Top 2Weekly Top 5

वनौषधी निवडुंग होतेय गावातून दुर्मीळ

By admin | Updated: July 19, 2015 23:37 IST

वाळवंटी प्रदेशातील मुख्य वनस्पती म्हणून निवडुंगाची ओळख आहे.

बाळकृष्ण सातार्डेकर-रेडी -ग्रामीण भागामध्ये शेती बागायतीच्या कुंपणासाठी वापरला जाणारा आणि विविध आजारांवर उपयोगी असा लोकप्रिय बहुगुणी निवडुंग दुर्मीळ होत आहे. शेतीच्या रक्षणाबरोबरच वनौषधी म्हणून उपयुक्त असणाऱ्या निवडुंगाचे कृषी विभागाने जतन करून त्याची लागवड करण्याबाबत जागृती करण्याची गरज आहे.वाळवंटी प्रदेशातील मुख्य वनस्पती म्हणून निवडुंगाची ओळख आहे. जाड मांसल खोड त्यावर सर्वत्र काटे, विरळ पाने आणि आकर्षक फुले अशी वैशिष्ट्ये असलेले निवडुंग कोकण पट्टीतही चांगल्या प्रकारे वाढते. दलदलीची जागा सोडून शेत, माळरान, कडेकपारी जंगलातील खडकाळ जमीन अशा सर्वच ठिकाणी निवडुंगाची वाढ होते.आयुर्वेदात याचा मोठा वापर होतो. मनुष्याला शौचास साफ न होणे, खोकला, डांग्या खोकला, कावीळ, यकृताचा आजार, हृदयरोग अशा विविध रोगांवर निवडुंग या वनस्पतीच्या खोडावरची साल, डिंक व चिकापासून बनविलेलेले औषध जालीम उपायकारक आहे. हे औषध सेवन केल्यास रूग्ण तत्काळ बरा होऊ शकतो, तसेच निवडुंग हे उत्तम आयुर्वेदिक औषध म्हणूनही आजही ग्रामीण भागात विशेष परिचित आहे.आयुर्वेदात निवडुंगाला फार महत्त्व देण्यात आले आहे. पूर्वीच्या काळी ग्रामीण भागातील वैद्य विविध औषधात निवडुंगाचा वापर करत होते. परंतु बदलत्या काळानुसार याचा वापर होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. निवडुंगाच्या झाडावरील काट्यामुळे फार पूर्वीपासून या वनस्पतीचा वापर शेती बागायती आणि काही ठिकाणी घरांच्याही कुंपणाकरीता केला जातो. गावातील पडीक जमिनीतही टिकाव धरण्याच्या वैशिष्ट्यांमुळे निवडुंगाच्या कुंपणाची वर्षानुवर्षे देखभाल करावी लागत नाही. याशिवाय काटे आणि चिकट कडवट डिंक यामुळे प्राण्यांकडून याचे नुकसान होत नाही. तसेच भटके प्राणीसुद्धा निवडुंग असणाऱ्या कुंपणाच्या परिसरात फिरकत नाहीत. त्यामुळे शेतकरीवर्ग निवडुंगाला शेतीचा रक्षणकर्ता म्हणतो.बदलत्या काळानुसार गावागावांमध्ये दगड, चिरे आदी साहित्याचा कुंपणासाठी वापर होऊ लागल्याने पारंपरिक निवडुंग या वनस्पतीचे कुंपण विरळ झाले आहे. परंतु अशा प्रकारचीच कुंपणे सुरक्षित व अल्प दरात निर्माण होणारी असल्याचे जाणकारांचे मत असल्याचे अनेकांनी व्यक्त केले आहे. पूर्वी खेड्यापाड्यातील वैद्य निवडुंगाचा मोठा वापर करत होते. आताही काही आयुर्वेदिक औषधांसह विविध औषधांसाठी याचा वापर होतो. पण आपल्याला याची अजूनही जाणीव नसल्याने याचे उत्पादन मंदावले आहे. याबाबत शेतकरी, बागायतदारांमध्ये जाणीवजागृती केली, तर नक्कीच याचे उत्पन्न वाढण्याबरोबरच शेतकऱ्यांनाही शेती उत्पादनाला पर्याय निर्माण होऊन शेतकरी नफ्यात येऊ शकतो. - बागायतदार प्रसाद रेडेकर