शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

वनौषधी निवडुंग होतेय गावातून दुर्मीळ

By admin | Updated: July 19, 2015 23:37 IST

वाळवंटी प्रदेशातील मुख्य वनस्पती म्हणून निवडुंगाची ओळख आहे.

बाळकृष्ण सातार्डेकर-रेडी -ग्रामीण भागामध्ये शेती बागायतीच्या कुंपणासाठी वापरला जाणारा आणि विविध आजारांवर उपयोगी असा लोकप्रिय बहुगुणी निवडुंग दुर्मीळ होत आहे. शेतीच्या रक्षणाबरोबरच वनौषधी म्हणून उपयुक्त असणाऱ्या निवडुंगाचे कृषी विभागाने जतन करून त्याची लागवड करण्याबाबत जागृती करण्याची गरज आहे.वाळवंटी प्रदेशातील मुख्य वनस्पती म्हणून निवडुंगाची ओळख आहे. जाड मांसल खोड त्यावर सर्वत्र काटे, विरळ पाने आणि आकर्षक फुले अशी वैशिष्ट्ये असलेले निवडुंग कोकण पट्टीतही चांगल्या प्रकारे वाढते. दलदलीची जागा सोडून शेत, माळरान, कडेकपारी जंगलातील खडकाळ जमीन अशा सर्वच ठिकाणी निवडुंगाची वाढ होते.आयुर्वेदात याचा मोठा वापर होतो. मनुष्याला शौचास साफ न होणे, खोकला, डांग्या खोकला, कावीळ, यकृताचा आजार, हृदयरोग अशा विविध रोगांवर निवडुंग या वनस्पतीच्या खोडावरची साल, डिंक व चिकापासून बनविलेलेले औषध जालीम उपायकारक आहे. हे औषध सेवन केल्यास रूग्ण तत्काळ बरा होऊ शकतो, तसेच निवडुंग हे उत्तम आयुर्वेदिक औषध म्हणूनही आजही ग्रामीण भागात विशेष परिचित आहे.आयुर्वेदात निवडुंगाला फार महत्त्व देण्यात आले आहे. पूर्वीच्या काळी ग्रामीण भागातील वैद्य विविध औषधात निवडुंगाचा वापर करत होते. परंतु बदलत्या काळानुसार याचा वापर होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. निवडुंगाच्या झाडावरील काट्यामुळे फार पूर्वीपासून या वनस्पतीचा वापर शेती बागायती आणि काही ठिकाणी घरांच्याही कुंपणाकरीता केला जातो. गावातील पडीक जमिनीतही टिकाव धरण्याच्या वैशिष्ट्यांमुळे निवडुंगाच्या कुंपणाची वर्षानुवर्षे देखभाल करावी लागत नाही. याशिवाय काटे आणि चिकट कडवट डिंक यामुळे प्राण्यांकडून याचे नुकसान होत नाही. तसेच भटके प्राणीसुद्धा निवडुंग असणाऱ्या कुंपणाच्या परिसरात फिरकत नाहीत. त्यामुळे शेतकरीवर्ग निवडुंगाला शेतीचा रक्षणकर्ता म्हणतो.बदलत्या काळानुसार गावागावांमध्ये दगड, चिरे आदी साहित्याचा कुंपणासाठी वापर होऊ लागल्याने पारंपरिक निवडुंग या वनस्पतीचे कुंपण विरळ झाले आहे. परंतु अशा प्रकारचीच कुंपणे सुरक्षित व अल्प दरात निर्माण होणारी असल्याचे जाणकारांचे मत असल्याचे अनेकांनी व्यक्त केले आहे. पूर्वी खेड्यापाड्यातील वैद्य निवडुंगाचा मोठा वापर करत होते. आताही काही आयुर्वेदिक औषधांसह विविध औषधांसाठी याचा वापर होतो. पण आपल्याला याची अजूनही जाणीव नसल्याने याचे उत्पादन मंदावले आहे. याबाबत शेतकरी, बागायतदारांमध्ये जाणीवजागृती केली, तर नक्कीच याचे उत्पन्न वाढण्याबरोबरच शेतकऱ्यांनाही शेती उत्पादनाला पर्याय निर्माण होऊन शेतकरी नफ्यात येऊ शकतो. - बागायतदार प्रसाद रेडेकर