शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
विजय शाह यांना कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवले; काँग्रेस नेत्यांची निदर्शने; नेमप्लेटवर शाई फेकली
3
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
4
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
5
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
6
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
7
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
8
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
9
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
10
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
11
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
12
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
13
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
14
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी
15
भारताच्या हल्ल्यात पाकिस्तानी एअरबेस उद्ध्वस्त; लढाऊ विमाने जळून राख, सॅटेलाईट फोटो पाहा
16
भारतीय वंशाच्या अनिता आनंद कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; ट्रुडोंनी बिघडविलेले संबंध सुधारण्याची अपेक्षा
17
PPF बनवेल कोट्यधीश, कमाल आहे १५+५+५ ची जादू; बनेल १ कोटींचा बॅलन्स, पण कसा?
18
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
19
S-400: सिलिगुडी कॉरिडॉरला 'सुदर्शन चक्र' चे संरक्षण असणार; कोणत्याही धोक्याला तोंड देण्यासाठी सैन्य सज्ज
20
पाकविरोधात केंद्र सरकारच्या कारवाईवर जनता खुश आहे की नाही?; ऑपरेशन सिंदूरनंतर समोर आला सर्व्हे

माणगाव परिसरातील २७ गावांचा आकारीपड प्रश्न निकाली

By admin | Updated: July 28, 2014 23:23 IST

बाळ सावंत : जमिनी ताब्यात देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश, १४ आॅगस्ट रोजी होणार मेळावा

कुडाळ : स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत रेंगाळत असलेल्या माणगाव खोऱ्यातील २७ गावांमधील आकारीपडचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने २१ सप्टेंबर १९८२ च्या आदेशानुसार निकाली काढला आहे. २८ फेब्रुवारी २०१५ पूर्वी या ठिकाणच्या वहिवाटदार शेतकऱ्यांना मालकी हक्काने जमिनी ताब्यात देण्यात याव्यात, असे आदेश मुुंबई उच्च न्यायायलाने जिल्हाधिकारी यांना दिल्याची माहिती याचिकाकर्ते बाळ सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. माणगाव खोऱ्यात सुमारे स्वातंत्र्यपूर्व काळापासून आकारीपड २७ गावात लावण्यात आले. त्यामुळे या खोऱ्यातील अनेकांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले. येथील जमिनी वाहिवाटदारांच्या ताब्यात याव्यात, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात तेथील बाळा सावंत, मुकुंद सरनोबत, प्रमोद शेडगे, पुष्पसेन सावंत, नागेश आईर यांनी याचिका सादर केली . या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी दिली असून, या संदर्भातील माहिती देण्यासाठी याचिकाकर्ते बाळ सावंत यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी पुष्पसेन सावंत, मुकुंद सरनोबत, प्रमोद शेट्ये हे याचिकाकर्ते, तर डॉ. शरद पाटील, बाळू धुरी, राजू राऊळ, प्रकाश सरनोबत, सुभाष तुळसुलकर, वामन गोडे, भाई सावंत, मँगेल डिसोजा, मारियन डिसिल्वा व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. माणगाव खोऱ्यात दोन गावांमधील त्या जमिनींचा आकारीपड रद्द करून मूळ वहिवाटदारांच्या नावे करून द्याव्यात, याकरिता दिवंगत माजी आमदार सी. स. सावंत, श्रीधर तावडे, दादा झेंडे, पु. ल. करंदीकर, तुकाराम चव्हाण, (पान ९ वर)'आकारीपड' म्हणजे नेमके काय ?१९२० च्या दरम्यान माणगाव खोऱ्यात आलेल्या मलेरिया व प्लेगच्या साथीने घरातील माणसे मृत्यूमुखी पडली. संस्थानाधिपतींनी केलेली उपाययोजना कमी पडू लागल्या. लोक जीव वाचविण्यासाठी गाव सोडून जाऊ लागले. यामुळे महसूल व कला संस्थानाला कारभार हाकणे जिकिरीचे झाले. संस्थानाधिपतींनी ब्रिटिशांची मदत घेऊन १९३५ च्या दरम्यान मेलेरिया व प्लेगच्या साथीवर नियंत्रण मिळविले, परंतु जे वाचले होते, ते शेतीपासून वंचित झाले. त्यामुळे संस्थानाची थकबाकी वाढली. त्यामुळे संस्थानाने थकलेल्या जमिनी संस्थानच्या नावे केल्या.