शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढचे उपराष्ट्रपती कोण? मतदान संपले, थोड्याच वेळात मतमोजणी सुरु होणार
2
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
3
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
4
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
5
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
6
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
7
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
8
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
9
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
10
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या
11
Nepal Protest : नेपाळमधील आंदोलनाचा सीमेवर परिणाम, सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण; भारतीय पर्यटकांना रोखले
12
जीएसटीचा 'सुतक'काळ...! शोरुममध्ये कधी नव्हे तो शुकशुकाट...; लोक येतायत अन् विचारून जातायत...
13
दुचाकी दुर्लक्षितच राहिल्या...! जिव्हाळ्याची हिरो स्प्लेंडर ८ हजारांनी कमी होणार, एचएफ डीलक्स ६, एक्स्ट्रीम...
14
९२% नं आपटून १ रुपयांवर आला 'हा' शेअर; आता कंपनी देणार एकावर १० बोनस शेअर्स
15
महापौर ते थेट नेपाळ पंतप्रधानपदाच्या शर्यतीत समोर आलेले बालेन शाह यांची संपत्ती किती?
16
५० लाखांचे गृहकर्ज होईल व्याजमुक्त! फक्त ₹५,०५० ची गुंतवणूक वाचवेल लाखो रुपयांचे व्याज
17
दृष्टिहीन वडिलांसोबत भीक मागायची लेक; अभ्यासात हुशार, परिस्थितीवर मात करत बदललं नशीब
18
करिश्माच्या मुलांचा सावत्र आईवर फसवणुकीचा आरोप, संजय कपूरच्या ३०,००० कोटींच्या संपत्तीमध्ये मागितला वाटा
19
सामान्य चार्जिंग आणि वायरलेस चार्जिंगमध्ये काय फरक आहे? जाणून घ्या...
20
'ब्रिक्स देश अमेरिकेसाठी पिशाच्च; लवकरच युती तुटणार', पीटर नवारो यांनी पुन्हा गरळ ओकली

माणगाव परिसरातील २७ गावांचा आकारीपड प्रश्न निकाली

By admin | Updated: July 28, 2014 23:23 IST

बाळ सावंत : जमिनी ताब्यात देण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश, १४ आॅगस्ट रोजी होणार मेळावा

कुडाळ : स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत रेंगाळत असलेल्या माणगाव खोऱ्यातील २७ गावांमधील आकारीपडचा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने २१ सप्टेंबर १९८२ च्या आदेशानुसार निकाली काढला आहे. २८ फेब्रुवारी २०१५ पूर्वी या ठिकाणच्या वहिवाटदार शेतकऱ्यांना मालकी हक्काने जमिनी ताब्यात देण्यात याव्यात, असे आदेश मुुंबई उच्च न्यायायलाने जिल्हाधिकारी यांना दिल्याची माहिती याचिकाकर्ते बाळ सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. माणगाव खोऱ्यात सुमारे स्वातंत्र्यपूर्व काळापासून आकारीपड २७ गावात लावण्यात आले. त्यामुळे या खोऱ्यातील अनेकांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागले. येथील जमिनी वाहिवाटदारांच्या ताब्यात याव्यात, यासाठी मुंबई उच्च न्यायालयात तेथील बाळा सावंत, मुकुंद सरनोबत, प्रमोद शेडगे, पुष्पसेन सावंत, नागेश आईर यांनी याचिका सादर केली . या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने सुनावणी दिली असून, या संदर्भातील माहिती देण्यासाठी याचिकाकर्ते बाळ सावंत यांनी कुडाळ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी पुष्पसेन सावंत, मुकुंद सरनोबत, प्रमोद शेट्ये हे याचिकाकर्ते, तर डॉ. शरद पाटील, बाळू धुरी, राजू राऊळ, प्रकाश सरनोबत, सुभाष तुळसुलकर, वामन गोडे, भाई सावंत, मँगेल डिसोजा, मारियन डिसिल्वा व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते. माणगाव खोऱ्यात दोन गावांमधील त्या जमिनींचा आकारीपड रद्द करून मूळ वहिवाटदारांच्या नावे करून द्याव्यात, याकरिता दिवंगत माजी आमदार सी. स. सावंत, श्रीधर तावडे, दादा झेंडे, पु. ल. करंदीकर, तुकाराम चव्हाण, (पान ९ वर)'आकारीपड' म्हणजे नेमके काय ?१९२० च्या दरम्यान माणगाव खोऱ्यात आलेल्या मलेरिया व प्लेगच्या साथीने घरातील माणसे मृत्यूमुखी पडली. संस्थानाधिपतींनी केलेली उपाययोजना कमी पडू लागल्या. लोक जीव वाचविण्यासाठी गाव सोडून जाऊ लागले. यामुळे महसूल व कला संस्थानाला कारभार हाकणे जिकिरीचे झाले. संस्थानाधिपतींनी ब्रिटिशांची मदत घेऊन १९३५ च्या दरम्यान मेलेरिया व प्लेगच्या साथीवर नियंत्रण मिळविले, परंतु जे वाचले होते, ते शेतीपासून वंचित झाले. त्यामुळे संस्थानाची थकबाकी वाढली. त्यामुळे संस्थानाने थकलेल्या जमिनी संस्थानच्या नावे केल्या.