शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

आठजणांच्या ‘नेत्रां’जनाने सोळाजणांनी जग ‘पाहिले’

By admin | Updated: June 10, 2015 00:29 IST

::दृष्टिदान दिन विशेष

शोभना कांबळे ल्ल रत्नागिरीरक्तदानाइतकेच नेत्रदान महत्त्वाचे आहे. मरणोत्तर नेत्रदानाने एका व्यक्तिचे भविष्य प्रकाशमय होण्यास मदत होते, त्यामुळे दृष्टिदानासारखे दुसरे कुठले पुण्यमय कार्य नाही, हे आता समाजाला हळूहळू समजू लागल्याने जिल्ह्यात मरणोत्तर नेत्रदान करणाऱ्यांच्या संख्येत वाढ होऊ लागली आहे. गतवर्षी २००पेक्षा अधिक व्यक्तिंनी नेत्रदानाचे अर्ज भरले असून, ८ जणांच्या नेत्रदानाने सोळा अंधांच्या नेत्रज्योती प्रज्वलित करून त्यांचे आयुष्य प्रकाशमय केले आहे.नेत्रदानाबाबत समाजात अनेक गैरसमज आहेत. त्यातील एक म्हणजे मृत्यूनंतर आपण किंवा आपला नातेवाईक विद्रुप दिसेल, ही वाटणारी सर्वांत मोठी भीती. यामुळे नेत्रदानासाठी स्वेच्छेने येणाऱ्यांची संख्या अगदीच अल्प होती. मात्र, आता आरोग्य विभागाकडून होत असलेल्या जागृतीमुळे आपले मरणोत्तर नेत्रदान एक किंवा दोन व्यक्तिंना दृष्टी देऊ शकते, याचे महत्व समाजाला कळू लागले आहे. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत २००पेक्षा अधिक दात्यांनी स्वेच्छेने मरणोत्तर नेत्रदानाची तयारी दर्शविली आहे. गत वर्षात आठ व्यक्तींनी नेत्रदान केले आहे.रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अजूनही नेत्रपेढीची सुविधा नाही. त्यामुळे मृत्यू झाल्यानंतर सहा तासांच्या आत नेत्रचिकित्सा अधिकाऱ्यांना त्या व्यक्तिची नेत्रबुबूळ काढावी लागतात. त्यातील पेशी जिवंत ठेवण्यासाठी त्यावर पूर्ण प्रक्रिया करून अत्याधुनिक अशा नेत्रपेढीत ठेवावी लागतात. ही सुविधा कोल्हापूर येथे असल्याने नेत्रबुबूळ काढल्यानंतर ते लगेच नेत्रपेढीकडे पाठवले जातात. तिथे ७२ तासांच्या आत ती दुसऱ्या व्यक्तिंसाठी वापरावी लागतात. जिल्ह्यात नेत्रचिकित्सा अधिकारी १८ आहेत. त्यापैकी जिल्हा रूग्णालयात प्रशिक्षीत नेत्रचिकित्सा अधिकारी एकच असून, एकाला प्रशिक्षणासाठी पाठविण्यात आले आहे. इतरांनाही टप्प्याटप्प्याने प्रशिक्षणासाठी पाठविण्यात येणार आहे. नेत्रदान करावयाचे असेल तर जिल्हा शासकीय रूग्णालयात अर्ज भरता येतोच. ग्रामीण रूग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे याठिकाणीही नेत्रदानाचे अर्ज भरता येतात.1नेत्रदानाबाबत प्रबोधन होण्यासाठी त्यांचे समुपदेशन होणे महत्त्वाचे आहे. मात्र, जिल्हा रूग्णालयाच्या नेत्र विभागात सध्या समुपदेशक नसल्याने प्रबोधन करण्यात अडचणी येत आहेत. 2नेत्रदानाबाबत नेत्रदात्याने कुटुंबियांना माहिती देणे गरजेचे आहे. मृत्यूनंतर सहा तासांच्या आता नेत्रबुबूळ काढली गेली तरच त्यांचा उपयोग दुसऱ्या व्यक्तिसाठी होऊ शकतो. हे लक्षात घेऊन कुटुंबियांनीही त्याच्या मृत्यूनंतर त्या व्यक्त[च्या इच्छेचा आदर करीत त्वरित जिल्हा रूग्णालय वा नजीकच्या आरोग्य केंद्राला कल्पना दिल्यास त्याचे नेत्रदान फलद्रूप होऊ शकेल. 3ज्यांना स्वेच्छेने मरणोत्तर नेत्रदान करायचे असेल, त्यांनी जिल्हा शासकीय रूग्णालयाच्या नेत्रविभागाकडे संपर्क करावा किंवा आपल्या भागातील ग्रामीण रूग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे येथे संपर्क करावा, असे आवाहन जिल्हा रूग्णालयाच्या नेत्र विभागातर्फे करण्यात आले आहे. समाजात अंधत्व वा इतर कारणांनी दृष्टीहीन झालेल्यांना अशा नेत्रदात्यांची गरज असते. नेत्रदानाबाबत समाजात गैरसमज असल्याने भीतीही आहे. ती दूर करण्यासाठी सामाजिक संस्था, व्यक्ती यांनी समाजात प्रबोधनात योगदान दिल्यास नेत्रदात्यांचे प्रमाण नक्कीच वाढेल आणि अशा अनेक दृष्टीहीनांचे भविष्य उजळेल. त्यामुळे नेत्रदानासाठी इच्छाशक्ती निर्माण होणे गरजेचे आहे.डॉ. सोनाली पाथरे, जिल्हा नेत्रशल्य चिकित्सक, जिल्हा शासकीय रूग्णालय