शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

बुरूड व्यवसायाला उतरती कळा

By admin | Updated: November 28, 2014 23:55 IST

प्रयत्न हवेत : शासनाचा यासाठीचा पुढाकार अत्यंत गरजेचा

श्रीकांत चाळके - खेड -औद्योगिकीकरण व आधुनिक युगामध्ये भारतीय संस्कृतीमधील १२ बलुतेदारांपैकी बुरूड व्यवसायाला विविध कारणांने आता उतरती कळा लागली आहे. पोट भरण्यासाठी या समाजावर आता लाकडाची मोळी विकण्याची वेळ आली असून, अत्याधुनिक तंत्रज्ञानांनी तयार करण्यात येत असलेल्या अवजांरामुळे हा उद्योग अडचणीत आला आहे़ याकरिता शासनाने पुढाकार घेऊनच या व्यवसायाच्या तेजीसाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे़ शेती लागवडीखालील क्षेत्र दिवसेंदिवस कमी होत असल्याने शेतकरी ही संकल्पना केवळ कागदोपत्रीच राहणार की काय असा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहे़ भात धान्य साठविण्यासाठी लागणारी टोपली, सुपं, चाळणी, वेतापासून बनविण्यात येणा-या वस्तु शेतकरी मोठ्या प्रमाणात वापरतात़ या सर्व वस्तूु बांबूच्या सहाय्याने तयार करण्यात येत असल्याने बांबुच्या वाढलेल्या दराचा परिणाम या वस्तुंच्या दरावर होत आहे़ बांबूच्या या वस्तूंच्या दरात सध्या प्लॅस्टीकच्या वस्तु किंमतीत स्वस्त असल्याने या व्यवसायावर अनिष्ट परीणाम झाला आहे़ विशेष म्हणजे प्लास्टीकच्या वस्तू वापरणे सोयीचे आणि कमी खर्चाचे असल्याने त्यांना बाजारात मागणी आहे. याउलट बांबुंचे वाढते दर आणि अव्वाच्यासव्वा मजुरीचे दर यामुळे हा व्यवसायच धोक्यात आला आहे. शेती पिकवणा-या शेतक-यांची संख्या कमी झाल्याने वेतांच्या वस्तूची मागणी घटली़ तर दुसरीकडे प्लास्टीकचे आक्रमण झाल्याने या वस्तू इतिहास जमा होऊ लागल्या आहेत.बांबू व वेताची किंमती वाढल्या़ वस्तुंच्या किमतीपेक्षा जास्त मेहनत पडत असल्याने सध्या भूक भागविणे कठिण झाले असल्याने बुरूड व्यवसाय धोक्यात आला आहे. काहींनी आपला पारंपारिक व्यवसायही बंद केला आहे़ त्यामुळें उपासमारीची वेळ आली आहे़ मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवावे लागत आहे़ तर काहींनी वडीलोपार्जित धंदा म्हणून सुरू ठेवला आहे़ अशातच बांबुंची कमतरता आणि चढत्या किमती या साऱ्या भोवऱ्यात बुरूड व्यवसाय लोप पावला आहे़ याकडे शासनाने लक्ष द्यावे, अशी अपेक्षा बुरूड समाजाची आहे़ या समाजाला न्याय मिळाल्यास या व्यवसायाला उर्जितावस्था प्राप्त होईल़खादी ग्राम उद्योगाने या व्यवसायाला संरक्षण देणे आवश्यक आहे़ खादीच्या अनेक योजना या व्यवसायाला पूरक आहेत़ विशेष सवलतीही दिल्या जात आहेत. मात्र घेतलेल्या कर्जाचा विनियोग केला जात नसल्याची ओरड आहे़ खादी ग्रामोद्योगकडून कर्ज घेताना अनेकांना मध्यस्थांची मदत घ्यावी लागत आहे. अज्ञानामुळे हे अनेकवेळा घडते़ त्याकरिता त्यांना मध्यस्थांना काही पैसे किंवा टक्केवारीही मोजावी लागल्याचे अनेकांचे म्हणणे आहे. त्यामुळे कर्जाची परतफेड करताना या व्यावसायिकांना अडचणी येतात. या व्यवसायाला उत्तेजन देण्यासाठी राज्य सरकारने ठोस कृती केल्यास थेट या व्यावसायिकालाच कमी दराने कर्जपुरवठा होऊ शकेल आणि यातूनच या आधुनिक तंत्रज्ञानाने तयार करण्यात येत असलेल्या वस्तुंच्या बाजारपेठेत बुरूड व्यवसाय टिकून राहू शकेल.पाठपुरावा करण्यासाठी वाली नाही..भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असलेल्या बारा बलुतेदारांपैकी बुरूड समाज आज संक्रमण अवस्थतेतून जात आहे. या समाजातील तरूणांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. शासनाने पुढाकार घेऊन या व्यवसायाला आता उर्जितावस्था येणे आवश्यक आहे. याचा पाठपुरावा कोण करणार असा प्रश्न विचारला जात आहे.पाठपुरावा करण्यासाठी वाली नाही..भारतीय संस्कृतीत अनन्यसाधारण महत्व असलेल्या बारा बलुतेदारांपैकी बुरूड समाज आज संक्रमण अवस्थतेतून जात आहे. या समाजातील तरूणांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. शासनाने पुढाकार घेऊन या व्यवसायाला आता उर्जितावस्था येणे आवश्यक आहे. याचा पाठपुरावा कोण करणार असा प्रश्न विचारला जात आहे.