शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
4
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
5
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
6
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
7
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
8
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
9
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
10
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
11
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
12
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
13
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
14
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
15
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
16
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
17
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
18
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
19
Shirdi Sai Baba Donation : आता सोन्याच्या खिडकीतून घेता येणार साईबाबांचे दर्शन, भक्ताचे लाखोंचे दान; सर्वांना मिळेल लाभ
20
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यातील दुग्ध व्यवसाय मरणासन्न अवस्थेत

By admin | Updated: July 28, 2014 23:17 IST

१६५ दुग्ध संस्था बंद

रहिम दलाल- रत्नागिरी    ,, दुग्ध व्यवसायाशी निगडीत जिल्ह्यातील २२३ दुग्ध संस्थांपैकी केवळ ५८ संस्था आजघडीला सुरु असून, तब्बल १६५ दुग्ध संस्था बंद आहेत़ शासनाकडून दुग्ध व्यवसाय वाढीसाठी आवश्यक तेवढे प्रयत्न न झाल्याने जिल्ह्याचा एकूणच दुग्ध व्यवसाय मरणावस्थेत आहे़ मात्र, आता हा व्यवसाय उर्जितावस्थेत आणण्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून धडपड सुरु आहे.गेल्या कित्येक वर्षांपासून जिल्हा पशु विकासापासून दूर ठेवण्यात आला आहे़ पशु विकासासाठी अनेक योजना आहेत़ मात्र, त्या कागदावरच राहिल्याने त्याचा जिल्ह्याच्या पशुधन विकासासाठी काहीही फायदा झालेला नाही़ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचे ७३ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत़ त्यामध्ये श्रेणी - १ चे पशुवैद्यकीय दवाखाने २०, श्रेणी - २ चे पशुवैद्यकीय दवाखाने ५१ आणि लांजा व खेड या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक फिरता पशुवैद्यकीय दवाखाना आहे़ राज्य शासनाचे चिपळूण येथे एक जिल्हा पशु सर्व चिकित्सालय, ४ तालुका लघु पशु सर्व चिकित्सालय आणि राज्य शासनाची श्रेणी - २ चे ७५ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत़ दापोली, खेड, संगमेश्वर आणि रत्नागिरी या तालुक्यांमध्ये तालुका लघु पशु सर्व चिकित्सालये आहेत़जिल्हा परिषदेच्या १० पशुवैद्यकीय दवाखान्यांना स्वत:च्या मालकीच्या इमारती नसून, भाड्याच्या तसेच ग्रामपंचायतीच्या इमारतींमध्ये आहेत़ मात्र, वाटद - खंडाळा ग्रामपंचायतीने नुकतीची पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी जागा दिल्याने एका इमारतीचा प्रश्न सुटला आहे़ जिल्ह्यात १९ पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या इमारती नादुरुस्त होत्या़ त्यातील ९ इमारती दुरुस्त करण्यात आल्या आहेत़ १२ दवाखान्यांच्या इमारतींचा प्रस्ताव दुरुस्तीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे़ ७५ पशुवैद्यकीय दवाखान्यांपैकी केवळ ४६ दवाखान्यांना इमारती आहेत़ २९ दवाखाने भाड्याच्या जागेत आहेत़जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून पशु विकासाचे प्रयत्न करण्यात येत आहेत़ पशुधन विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत़ मात्र, त्यासाठी मागील काही वर्षामध्ये आवश्यक तेवढे प्रयत्न झालेले दिसत नाहीत़ सध्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कामधेनू दत्तक योजना राबविण्यात येत आहे़ त्यासाठी ७० गावांची निवड करण्यात आली आहे़ या गावांमध्ये दुग्ध व्यवसाय वाढीसाठी जनजागृती ते विकासाच्या दृष्टीने काम केले जात आहे़ आज जिल्ह्यातील पशु विकासाचा विचार केल्यास त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणे आवश्यक होते़ मात्र, तसे न होता शासकीय दूध डेअरी बंद करुन शेजारच्या जिल्ह्यातील दुग्ध व्यवसाय कसा मोठा होईल, याकडेच शासनाने लक्ष दिले. दुग्ध व्यवसायासाठी निगडीत जिल्ह्यात २२३ दुग्ध संस्थांपैकी केवळ ५८ संस्था सुरु आहेत, तर १६५ दुग्ध संस्था गेल्या कित्येक वर्षांपासून बंद आहेत. जिल्ह्यासाठी २ लाख लीटर्स दुधाची आवश्यकता आहे़ आजघडीला जिल्ह्यात केवळ ४० हजार लीटर्स दूध तयार होते़ मात्र, शासनाकडून केवळ २० हजार लीटर्स दूध गोळा करण्यात येत असल्याची नोंद झाली आहे़ जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून जिल्ह्यात ३२५० दुधाळ जनावरांचे कृत्रिम रेतन करण्यात आले आहे. त्याचबरोबर वर्षभरात जिल्ह्यात १२०० वासरे वाढली आहेत. जिल्ह्याचा दुग्ध व्यवसाय मरणावस्थेत असला तरी पशुसंवर्धन विभागाकडून हा व्यवसाय वाढीसाठी धडपड सुरु आहे.जिल्ह्याचा दुग्ध व्यवसाय वाढीसाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश मुकादम यांनी शासनाच्या दुध डेअरी डेव्हलपमेंट विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. त्यामध्ये जिल्ह्यात दूध डेअरी वाढ, दुग्ध सहकारी संस्थांना संजीवनी देऊन जिल्ह्याचा दुग्ध विकास कसा साधता येईल, यावर उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली होती.