शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
2
"हृदयात काबा आणि डोळ्यांत मदिना..."; कोण आहेत सभांमध्ये गाणे गाणाऱ्या TMC खासदार सायनी घोष?
3
IPLमध्ये भाऊबंदकी, पांड्या बंधूंमध्ये बेबनाव? MI Vs RCB लढतीत दिसलं असं दृश्य, चाहत्यांना धक्का
4
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
5
फक्त ७ वर्ष...! चीन आणि अमेरिकेलाही मागे टाकणार भारताची ऑटो इंडस्ट्री, नितीन गडकरींनी सांगितला 'मास्टर प्लॅन'
6
Latest Marathi News LIVE: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
7
Swapna Shastra: सावधान! स्वप्नात 'या' गोष्टी दिसणे म्हणजे संकटाची चाहूल? वाईट प्रभाव रोखण्यासाठी करा 'हे' प्रभावी उपाय!
8
Middle East War: खर्ग बेट, बंदर अब्बासवर अमेरिकेचा डोळा; इराणची कोंडी करण्यासाठी ट्रम्प यांचा मास्टरप्लॅन
9
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
10
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
11
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
12
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
13
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
14
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
15
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
16
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
17
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
18
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
19
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
20
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी जिल्ह्यातील दुग्ध व्यवसाय मरणासन्न अवस्थेत

By admin | Updated: July 28, 2014 23:17 IST

१६५ दुग्ध संस्था बंद

रहिम दलाल- रत्नागिरी    ,, दुग्ध व्यवसायाशी निगडीत जिल्ह्यातील २२३ दुग्ध संस्थांपैकी केवळ ५८ संस्था आजघडीला सुरु असून, तब्बल १६५ दुग्ध संस्था बंद आहेत़ शासनाकडून दुग्ध व्यवसाय वाढीसाठी आवश्यक तेवढे प्रयत्न न झाल्याने जिल्ह्याचा एकूणच दुग्ध व्यवसाय मरणावस्थेत आहे़ मात्र, आता हा व्यवसाय उर्जितावस्थेत आणण्यासाठी जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून धडपड सुरु आहे.गेल्या कित्येक वर्षांपासून जिल्हा पशु विकासापासून दूर ठेवण्यात आला आहे़ पशु विकासासाठी अनेक योजना आहेत़ मात्र, त्या कागदावरच राहिल्याने त्याचा जिल्ह्याच्या पशुधन विकासासाठी काहीही फायदा झालेला नाही़ग्रामीण भागात जिल्हा परिषदेचे ७३ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत़ त्यामध्ये श्रेणी - १ चे पशुवैद्यकीय दवाखाने २०, श्रेणी - २ चे पशुवैद्यकीय दवाखाने ५१ आणि लांजा व खेड या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एक फिरता पशुवैद्यकीय दवाखाना आहे़ राज्य शासनाचे चिपळूण येथे एक जिल्हा पशु सर्व चिकित्सालय, ४ तालुका लघु पशु सर्व चिकित्सालय आणि राज्य शासनाची श्रेणी - २ चे ७५ पशुवैद्यकीय दवाखाने आहेत़ दापोली, खेड, संगमेश्वर आणि रत्नागिरी या तालुक्यांमध्ये तालुका लघु पशु सर्व चिकित्सालये आहेत़जिल्हा परिषदेच्या १० पशुवैद्यकीय दवाखान्यांना स्वत:च्या मालकीच्या इमारती नसून, भाड्याच्या तसेच ग्रामपंचायतीच्या इमारतींमध्ये आहेत़ मात्र, वाटद - खंडाळा ग्रामपंचायतीने नुकतीची पशुवैद्यकीय दवाखान्यासाठी जागा दिल्याने एका इमारतीचा प्रश्न सुटला आहे़ जिल्ह्यात १९ पशुवैद्यकीय दवाखान्यांच्या इमारती नादुरुस्त होत्या़ त्यातील ९ इमारती दुरुस्त करण्यात आल्या आहेत़ १२ दवाखान्यांच्या इमारतींचा प्रस्ताव दुरुस्तीसाठी शासनाकडे पाठविण्यात आला आहे़ ७५ पशुवैद्यकीय दवाखान्यांपैकी केवळ ४६ दवाखान्यांना इमारती आहेत़ २९ दवाखाने भाड्याच्या जागेत आहेत़जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून पशु विकासाचे प्रयत्न करण्यात येत आहेत़ पशुधन विकासासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत़ मात्र, त्यासाठी मागील काही वर्षामध्ये आवश्यक तेवढे प्रयत्न झालेले दिसत नाहीत़ सध्या जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कामधेनू दत्तक योजना राबविण्यात येत आहे़ त्यासाठी ७० गावांची निवड करण्यात आली आहे़ या गावांमध्ये दुग्ध व्यवसाय वाढीसाठी जनजागृती ते विकासाच्या दृष्टीने काम केले जात आहे़ आज जिल्ह्यातील पशु विकासाचा विचार केल्यास त्यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होणे आवश्यक होते़ मात्र, तसे न होता शासकीय दूध डेअरी बंद करुन शेजारच्या जिल्ह्यातील दुग्ध व्यवसाय कसा मोठा होईल, याकडेच शासनाने लक्ष दिले. दुग्ध व्यवसायासाठी निगडीत जिल्ह्यात २२३ दुग्ध संस्थांपैकी केवळ ५८ संस्था सुरु आहेत, तर १६५ दुग्ध संस्था गेल्या कित्येक वर्षांपासून बंद आहेत. जिल्ह्यासाठी २ लाख लीटर्स दुधाची आवश्यकता आहे़ आजघडीला जिल्ह्यात केवळ ४० हजार लीटर्स दूध तयार होते़ मात्र, शासनाकडून केवळ २० हजार लीटर्स दूध गोळा करण्यात येत असल्याची नोंद झाली आहे़ जिल्हा परिषद पशुसंवर्धन विभागाकडून जिल्ह्यात ३२५० दुधाळ जनावरांचे कृत्रिम रेतन करण्यात आले आहे. त्याचबरोबर वर्षभरात जिल्ह्यात १२०० वासरे वाढली आहेत. जिल्ह्याचा दुग्ध व्यवसाय मरणावस्थेत असला तरी पशुसंवर्धन विभागाकडून हा व्यवसाय वाढीसाठी धडपड सुरु आहे.जिल्ह्याचा दुग्ध व्यवसाय वाढीसाठी जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजेश मुकादम यांनी शासनाच्या दुध डेअरी डेव्हलपमेंट विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली होती. त्यामध्ये जिल्ह्यात दूध डेअरी वाढ, दुग्ध सहकारी संस्थांना संजीवनी देऊन जिल्ह्याचा दुग्ध विकास कसा साधता येईल, यावर उपाययोजना करण्याबाबत चर्चा करण्यात आली होती.