शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
3
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
4
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
5
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
6
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
7
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
8
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
9
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
10
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
11
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
12
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
13
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
14
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  
15
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश
16
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
17
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
18
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
19
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
20
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!

काँग्रेसकडून शेतकऱ्यांची फसवणूक

By admin | Updated: June 28, 2014 00:18 IST

विनायक राऊत यांची टीका : चिपी विमानतळ प्रकल्पग्रस्तांना मार्गदर्शन

कुडाळ : चिपी विमानतळाच्या नावाखाली येथील शेतकऱ्यांची काँग्र्रेस सरकार आणि त्यांच्या लोकप्रतिनिधींनी फसवणूक केली आहे. यापुढे येथील प्रकल्पग्रस्तांची फसवणूक करणाऱ्या या दलालांची आता गय केली जाणार नाही. प्रकल्पग्रस्तांच्या विनाकारण घेतलेल्या जमिनी त्यांना परत करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांंबरोबर लढा देणार आहे, असे आश्वासन खासदार विनायक राऊत यांनी चिपी विमानतळ प्रकल्पग्रस्तांना परूळे येथील बैठकीदरम्यान दिले. चिपी विमानतळाच्या प्रकल्पग्रस्तांनी आपले प्रश्न मांडण्यासाठी परूळे येथील श्री देव येसू आका मंदिरात खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी जिल्हाप्रमुख वैभव नाईक, कुडाळ तालुका संपर्कप्रमुख सुरेश पाटील, वेंगुर्ले तालुका संपर्कप्रमुख शैलेश परब उपस्थित होते. प्रकल्पग्रस्तांच्या भूमी बचाव कृती समितीच्यावतीने अध्यक्ष चंद्रवर्धन आळवे व वासुदेव माधव यांनी खासदार राऊत यांच्याकडे विविध मागण्यांचे निवेदन दिले.शासनाने आतापर्यंत येथील शेतकऱ्यांची फसवणूक करून विमानतळासाठी आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात कवडीमोल किमतीने भूसंपादन केले. सुरुंग स्फोटांमुळे आमच्या घरांना भेगा पडल्या आहेत. याबाबत माहिती देऊनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आमच्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. या सर्व समस्यांचा विचार करून न्याय द्यावा, अशी मागणी या निवेदनात केली आहे. सरपंच महेश सामंत यांनी येथील प्रकल्प जनतेला विश्वासात घेऊन व्हावेत, अशी मागणी केली. तर सचिन देसाई यांनी काँग्रेस सरकार आणि लोकप्रतिनिधींनी आमच्याकडे लक्षच दिले नाही, असे सांगितले.यावेळी खासदार राऊत यांनी, येथील प्रकल्पग्रस्तांना न्याय देणार, विनाकारण संपादित केलेली जमीन परत करण्यासाठी प्रयत्न करणार, प्रकल्पग्रस्तांना विमानतळ प्रकल्पांतर्गत नोकरीत सामावून घेण्यासाठी प्रयत्न करणार, सुधारीत भूमी निकषाप्रमाणे पैसे देण्यास भाग पाडू, आयआरबीकडून काम काढून घेऊन एमआयडीसीकडे सोपविणार, रस्त्यांचे पुनर्रीक्षण करून योग्य रस्त्यांसाठी प्रयत्न करणार, प्रकल्पग्रस्तांना सर्व सोयीसुविधा मिळण्यासाठी प्रयत्न करणार व यासंदर्भात लवकरच प्रकल्पग्रस्त आणि संंबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेणार असल्याचे आश्वासन दिले. राऊतांनी बैलगाडीतूनच फिरावे, या पालकमंत्री नारायण राणे यांच्या वक्तव्याची आठवण करून देताना राऊत म्हणाले, आम्ही सर्वसामान्य माणसे बैलगाडीतूनच फिरणार. आम्हाला विमानाची अपेक्षानाही. (प्रतिनिधी)