शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

केरळीयनांची खरेदीखते तपासा

By admin | Updated: August 24, 2015 23:21 IST

दत्ताराम गावकर : जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा

कसई दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात केरळीयन लोकांनी बेकायदेशीर वनक्षेत्रात वास्तव्य वाढवले आहे. अनेकांनी हजारो हेक्टर क्षेत्रात जंगलतोड करून बोगस खरेदीखते, शेतकरी दाखले व महसूल अधिकारी यांच्या संगनमताने केलेली आहेत, असा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सोमवारी दोडामार्ग तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी निवेदनाद्वारे या संपूर्ण व्यवहारांची गोपनीय चौकशी करावी व दोषींवर तत्काळ कारवाई करावी. अन्यथा संपूर्ण शासन प्रणाली विरोधात न्यायालयात जनहीत याचिका दाखल करण्याचा इशारा मनसेचे उपजिल्हाध्यक्ष दत्ताराम गावकर यांच्यासह मनसेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष श्रेया देसाई, महिला तालुकाध्यक्षा छाया परब, असंख्य मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा उपाध्यक्ष दत्ताराम गावकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रोळी मंदिर ते तहसीलदार कार्यालय असे पायी चालत अनेक घोेषणा देत दोडामार्ग बाजारपेठेतून हा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर काढला. यावेळी पोलीस निरीक्षक जे. बी. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निवेदनातून तालुक्यातील के रळीयन परप्रांतीयांकडून मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केलेल्या आहेत. या जमिनी शेतकऱ्यांबरोबर शासनाच्या जमिनीवरही या लोकांनी अतिक्रमण केले आहे. या केरळीयन लोकांकडून तालुक्यात मारामारी, खून आदी प्रकरणे होत असल्याने तालुक्याची बदनामी होत आहे. यावर पोलिसांनी आळा घालावा, या मागणीबरोबर वाढीव घरपट्टी, बोगस ओळखपत्रे, रेशनकार्ड, बेकायदेशीर फार्म हाऊस, रबर बोर्डाकडून फसवणूक करून केरळीयन लोकांनी कोट्यवधीची माया गोळा केली आहे. अवैध गौण खनिज सुरू आहे. अवैध धंदे सुरू आहेत, कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाईचा निधी उपलब्ध असूनही वाटप केले नाही, वाढीव घरपट्टी रद्द करावी, तालुक्यात केलेले सर्व रस्त्यांचे काम हे निकृष्ट दर्जाचे आहे, केर भेकुर्ली पंतप्रधान ग्रामसडक योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला या सर्व मागण्यांची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली. तहसीलदार उपस्थित नसल्याने यावेळी उपस्थित असलेले नायब तहसीलदार पी. जी. केरकर यांनी हे निवेदन स्वीकारले. हे निवेदन आपण वरिष्ठांकडे पाठवू, असे आश्वासन केरकर यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले. तालुक्यातील विविध प्रश्नांंसंदर्भात मनसेच्या दृष्टीने मोर्चा काढला. यावेळी तालुकाध्यक्ष शशिकांत आईर हे न आल्याने त्यांच्या अनुपस्थितीबाबत यावेळी दबक्या आवाजात उलटसुलट चर्चा कार्यकर्त्यात सुरू होती.