शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
2
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?
3
“संविधान बदलून मनुस्मृती लादण्याचा RSS-भाजपाचा अजेंडा आजही कायम”: हर्षवर्धन सपकाळ
4
मराठीच्या मुद्द्यावरून ठाकरे बंधू एकत्र, काँग्रेसकडून पहिली प्रतिक्रिया समोर; भूमिका काय?
5
“मराठी भाषा नाही, यांच्या खुर्च्या धोक्यात”; ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदाभाऊ खोत यांची टीका
6
ऑपरेशन सिंदूरमध्ये नौदल उतरले असते तर हाहाकार उडाला असता; समुद्रात काय चाललेले... जाणून घ्याल तर...
7
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
8
यावर्षी 3500 कोट्यधीश भारत सोडणार, 'या' देशांमध्ये स्थायिक होणार; कारण काय..?
9
VIDEO: 'तो' संडासात बसूनच हायकोर्टाच्या सुनावणीत सहभागी झाला; गुजरातमधील विचित्र प्रकार, व्हिडीओ व्हायरल
10
"चल पळून जाऊन लग्न करूया..." संजनानं शेअर केली लग्नाआधीची ती गोष्ट; बुमराहचा चेहराच पडला (VIDEO)
11
अमेरिकेचा डबल गेम! आधी इराणवर हल्ला, निर्बंध लादले; आता करणार ३० बिलियन डॉलर्सची मदत
12
जामीन मिळाल्यानंतरही तरुंगातच राहिला आरोपी; आता सरकार देणार 'इतकी' नुकसान भरपाई!
13
ठाकरे बंधूंसोबत मराठी भाषिकांच्या मोर्चात शरद पवारांची राष्ट्रवादीही सहभागी होणार
14
पाकिस्तानने अखेर लायकी दाखवली; भारतीय सीमेजवळ पुन्हा उभारतोय दहशतवादी छावण्या
15
३४५ राजकीय पक्षांवर टांगती तलवार, निवडणूक आयोग नोंदणी रद्द करणार; वाचा सविस्तर
16
समुद्री महामार्गावर भीषण अपघात! मर्सिडीजने तीनवेळी पलटी मारली; नाशिकच्या उद्योजगाचा मृत्यू
17
शनिवारी विनायक चतुर्थी: गणपती बाप्पा अन् शनिचे ‘हे’ उपाय कराच; अखंड शुभाशिर्वाद मिळवा
18
Vinayak Chaturthi 2025: शनिवारी आषाढी विनायक चतुर्थी: ‘असे’ करा व्रत; पूजनात ‘या’ गोष्टी विसरू नका, कृपा-लाभ होईल!
19
६ ग्रहांचे जुलैमध्ये गोचर, २ अशुभ योग कायम: ९ राशींना अच्छे दिन, नोकरीत पदोन्नती; लाभाचा काळ!
20
T20I Powerplay New Rule : आता असा ठरवण्यात येणार 'पॉवर प्ले'चा खेळ! जाणून घ्या नवा नियम

केरळीयनांची खरेदीखते तपासा

By admin | Updated: August 24, 2015 23:21 IST

दत्ताराम गावकर : जनहित याचिका दाखल करण्याचा इशारा

कसई दोडामार्ग : दोडामार्ग तालुक्यात केरळीयन लोकांनी बेकायदेशीर वनक्षेत्रात वास्तव्य वाढवले आहे. अनेकांनी हजारो हेक्टर क्षेत्रात जंगलतोड करून बोगस खरेदीखते, शेतकरी दाखले व महसूल अधिकारी यांच्या संगनमताने केलेली आहेत, असा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्यावतीने सोमवारी दोडामार्ग तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी निवेदनाद्वारे या संपूर्ण व्यवहारांची गोपनीय चौकशी करावी व दोषींवर तत्काळ कारवाई करावी. अन्यथा संपूर्ण शासन प्रणाली विरोधात न्यायालयात जनहीत याचिका दाखल करण्याचा इशारा मनसेचे उपजिल्हाध्यक्ष दत्ताराम गावकर यांच्यासह मनसेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी दिला. यावेळी मनसेचे उपजिल्हाध्यक्ष श्रेया देसाई, महिला तालुकाध्यक्षा छाया परब, असंख्य मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. जिल्हा उपाध्यक्ष दत्ताराम गावकर यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. राष्ट्रोळी मंदिर ते तहसीलदार कार्यालय असे पायी चालत अनेक घोेषणा देत दोडामार्ग बाजारपेठेतून हा मोर्चा तहसीलदार कार्यालयावर काढला. यावेळी पोलीस निरीक्षक जे. बी. सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निवेदनातून तालुक्यातील के रळीयन परप्रांतीयांकडून मोठ्या प्रमाणात जमिनी खरेदी केलेल्या आहेत. या जमिनी शेतकऱ्यांबरोबर शासनाच्या जमिनीवरही या लोकांनी अतिक्रमण केले आहे. या केरळीयन लोकांकडून तालुक्यात मारामारी, खून आदी प्रकरणे होत असल्याने तालुक्याची बदनामी होत आहे. यावर पोलिसांनी आळा घालावा, या मागणीबरोबर वाढीव घरपट्टी, बोगस ओळखपत्रे, रेशनकार्ड, बेकायदेशीर फार्म हाऊस, रबर बोर्डाकडून फसवणूक करून केरळीयन लोकांनी कोट्यवधीची माया गोळा केली आहे. अवैध गौण खनिज सुरू आहे. अवैध धंदे सुरू आहेत, कृषी खात्याकडून शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाईचा निधी उपलब्ध असूनही वाटप केले नाही, वाढीव घरपट्टी रद्द करावी, तालुक्यात केलेले सर्व रस्त्यांचे काम हे निकृष्ट दर्जाचे आहे, केर भेकुर्ली पंतप्रधान ग्रामसडक योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला या सर्व मागण्यांची चौकशी करून दोषींवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे केली. तहसीलदार उपस्थित नसल्याने यावेळी उपस्थित असलेले नायब तहसीलदार पी. जी. केरकर यांनी हे निवेदन स्वीकारले. हे निवेदन आपण वरिष्ठांकडे पाठवू, असे आश्वासन केरकर यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांना दिले. तालुक्यातील विविध प्रश्नांंसंदर्भात मनसेच्या दृष्टीने मोर्चा काढला. यावेळी तालुकाध्यक्ष शशिकांत आईर हे न आल्याने त्यांच्या अनुपस्थितीबाबत यावेळी दबक्या आवाजात उलटसुलट चर्चा कार्यकर्त्यात सुरू होती.