शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतीच्या समस्यांना मोबाईलवर उत्तर

By admin | Updated: July 18, 2015 00:14 IST

जिल्हा परिषद : ‘व्हीडीओ कॉन्फरन्स’ने मार्गदर्शन

रहिम दलाल -रत्नागिरी  डायल आऊट कॉन्फरन्सच्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या सहाय्याने रिलायन्स फाऊंडेशन जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यांना मार्गदर्शन करणार आहे. त्यासाठी घरी बसून त्याचा लाभ मोबाईलच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी घेण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील मच्छीमार आणि गरोदर महिलांना त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याबाबतचे मार्गदर्शन आदी कामे जिल्ह्यात रिलायन्स फाऊंडेशनने सुरु केली आहेत. आता त्याची आणखी एक जोड शेतकरी व पशुपालकांना दिली जात आहे. शेतकऱ्यांना अनेक समस्या जाणवत असतात. मात्र, त्या समस्या घरी बसूनच सोडण्याच्या दृष्टीने मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करुन कसा करता येईल, त्याकडे रिलायन्स फाऊंडेशनने लक्ष वेधले आहे. शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी रिलायन्स फाऊंडेशन जिल्हा परिषदेचे सहकार्य घेत आहे. रिलायन्स फाऊंडेशनने मत्स्य खात्याच्या सहाय्याने जिल्ह्यातील मच्छीमारांसाठी विविध योजनांची माहिती आणि त्यांना आधुनिक मासेमारीचे ज्ञान देण्यासाठी अनेक मार्गदर्शन शिबिरे घेतली. मच्छीमारांना ते समुद्रात जाण्यापूर्वी त्यांना वातावरणाची माहिती, धोक्याचा इशारा देण्याचे काम रिलायन्स फाऊंडेशने गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यात सुरु केले. त्यासाठी रिलायन्स फाऊंडेशने प्रत्येक नौका मालकाचा मोबाईल क्रमांक घेऊन वेळोवेळी एसएमएसच्या द्वारे मच्छीमारांना अ‍ॅलर्ट करण्याची भरीव कामगिरी केली. काहीही आर्थिक फायदा न घेता मच्छिमारांना मोफत सेवा देत असतानाच आता शेतकरी, पशु-पालक यांच्या समस्या जाणून त्यांना मार्गदर्शन करण्यास या फाऊंडेशनने जिल्ह्यात सुरुवात केली आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेचा आधार घेतला आहे. सुरुवातीला पहिल्या टप्प्यात जिल्ह्यातील २०० शेतकरी व पशुपालकांना त्यांच्या समस्या जाणून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याची सुरुवातही करण्यात आली आहे. रत्नागिरी तालुक्यातील २० पशुपालक व शेतकऱ्यांशी डायल आऊट कॉन्फरन्सच्या माध्यमातून एकाच वेळी थेट संपर्क साधून त्यांच्याशी वार्तालाप करण्यात आला. त्यासाठी जिल्हा परिषदेचे जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सुभाष अधिकारी यांनी मोबाईल कॉन्फरन्सच्या माध्यमातून पशुपालक व शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांना डॉ. म्हस्के यांनी मार्गदर्शन केले. शेतकरी व पशुपालकांसाठीचा पहिला प्रयोग यशस्वीही झाला.रिलायन्स फाऊंडेशनने सुरु केलेला उपक्रम शेतकरी, पशुपालक आणि मच्छीमार यांच्यासाठी फायद्याचा ठरणार आहे. त्यामुळे त्यांना घरी बसून समस्यांवर मार्गदर्शन मिळणार आहे. शेतकरी व पशुपालकांसाठी प्रत्येक आठवड्याला मार्गदर्शन करण्यात येणार आहे. - डॉ. सुभाष म्हस्के, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी.