शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange: '...तोपर्यंत मुंबई सोडणार नाही', नोटीसनंतर मनोज जरांगेंचा मुख्यमंत्री फडणवीसांना इशारा
2
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: बस… आता थांबा, नामुष्की टाळायची असेल तर आंदोलन संपवा, सरकारला सहकार्य करा; जरांगेंना कुणाचा सल्ला?
3
औषधांवर २०० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्लॅन; भारतावर किती होणार परिणाम?
4
सोन्याने गाठली विक्रमी पातळी! तुमच्या शहरात एक तोळ्याचा आजचा भाव काय? अचानक का आली तेजी?
5
तुळजाभवानीच्या पुजारी मंडळावरून पेटला वाद, आजी-माजी पदाधिकारी आमने-सामने
6
आंदोलनात बेकायदेशीर कृत्ये, लवकरात लवकर मैदान रिकामं करा; मनोज जरांगेंना पाठवलेल्या पोलिसांच्या नोटीसमध्ये काय?
7
UAE चा कॅप्टन Muhammad Waseem नं साधला मोठा डाव! हिटमॅन रोहित शर्माचा वर्ल्ड रेकॉर्ड मोडला
8
भारत-रशिया मैत्री पाहून अमेरिका भडकली, ट्रम्प यांचे सल्लागार संतापले; म्हणाले, 'आमच्यासोबत...!'
9
"ती काम करत नाही, पण मी...", मृणालने अनुष्कावर साधला निशाणा? सलमानचा 'सुलतान' नाकारल्याचा दावा
10
Parivartani Ekadashi 2025: ज्यांना आयुष्यात परिवर्तन घडवायचे आहे, त्यांनी 'असे' करा एकादशी व्रत!
11
अनंत चतुर्दशी २०२५: गणेशोत्सवाची सांगता; पाहा, मान्यता, २०२६ मध्ये कधी येणार गणपती बाप्पा?
12
Mitchell Starc T20I Retirement : आगामी टी-२० वर्ल्ड कप आधी स्टार गोलंदाजाने घेतला निवृत्तीचा निर्णय; जाणून घ्या त्यामागचं कारण
13
४ राजयोगात परिवर्तिनी एकादशी: ९ राशींचे कल्याण-भरभराट, सुबत्ता-शुभ-लाभ; धनलक्ष्मी प्रसन्न!
14
GST बैठकीच्या पार्श्वभूमीवर शेअर बाजारात तेजी; रिलायन्समध्ये सर्वाधिक वाढ तर 'हे' स्टॉक्स घसरले
15
अनवाणी चालत बाप्पाच्या दर्शनाला पोहोचला सलमान खान, पळत पळतच कारजवळ आला अन्...
16
Punjab Flood: अर्धा पंजाब पाण्यात! १३०० गावांना पुराचा वेढा, हजारो लोक बेघर; २९ जणांचा मृत्यू
17
Parivartani Ekadashi 2025: परिवर्तनी एकादशी; चातुर्मासाचा मध्यंतर, यादिवशी श्रीहरी श्रीविष्णूंची बदलतात कूस!
18
Maharashtra Rain: राज्यात पाऊस पुन्हा धुमाकूळ घालणार, आठ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
19
गणेशोत्सव साजरा करत नाही आलिया? ट्रोल झाल्यानंतर दिलं सडेतोड उत्तर; फोटो शेअर करत म्हणाली...
20
'ही' आंतरराष्ट्रीय बँक भारतातून गाशा गुंडाळण्याच्या तयारीत? ग्राहकांच्या पैशांचं काय होणार?

अवकाळीचा सर्वाधिक फटका फलटणला

By admin | Updated: March 16, 2015 00:15 IST

शासकीय पंचनाम्यातून माहिती उघड : ८७८ शेतकऱ्यांचे झाले नुकसान

फलटण : जिल्ह्यात फेबु्रवारीच्या अखेरीस झालेल्या अवकाळी पाऊस, गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून सर्वाधिक फटका फलटण तालुक्याला बसला असल्याचे शासकीय पंचनाम्यातून स्पष्ट झाले आहे.  गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने एक हजार पस्तीस शेतकऱ्यांच्या १३३.८६ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये ५० टक्क््यांवर काढणीला आलेल्या गव्हाचे सर्वाधिक ७८.०६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यानंतर रब्बी ज्वारीचे ४६.६२ हेक्टर बाधित झाले आहे. हरभऱ्याचे २.९४, फळांचे ४.३९, द्राक्षाचे १.८५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. फलटण तालुक्यात सर्वाधिक ८७८ शेतकऱ्यांचे १११.२० हेक्टर क्षेत्र, तर कऱ्हाड तालुक्यातील १५७ शेतकऱ्यांचे २२.६६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. सातारा, कोरेगाव, खटाव, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावळी, खंडाळा, माण तालुक्यांतही अवकाळीमुळे मोठे नुकसान झाले आहे. परंतु या परिसरातील नुकसानीची टक्केवारी ५० टक्क्यांच्या आत असल्याने या शेतकऱ्यांना मदतीवाचून वंचित राहावे लागणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.  यापूर्वीच्या शासनाच्या काळात कर्जमाफीमध्ये सरसकट शेतकरी पात्र ठरले होते. परंतु यंदा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार की नाही, याची सांशकता आहे. १२०० शेतकऱ्यांची नावे सावकारांच्या कर्जमाफीसाठी कळविण्यात आली होती. असे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिलेल्या अहवालामध्ये नमुद आहे.  सातारा जिल्ह्यातील अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देण्याचा विचार शासनस्तरावर सुरू आहे. शेतकऱ्यांना शासनाने कर्जमाफीचा दिलास दिल्यास शेतकरी वर्ग या धक्क्यातून सावरून आणखी झेप घेईल. फलटण तालुक्यामध्ये रब्बी पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शासनाने केवळ घोषणा करून शेतकऱ्यांच्या तोडांला पाने पुसू नयेत, अशी शेतकऱ्यांची म्हणणे आहे. (वार्ताहर)वशीलेबाजीमुळे मदतीपासून वंचित..!सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पिकांचे नुकसान होत आहे. हाता तोंडाला आलेली पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत नाहीशी होत असल्यामुळे शेतकरीवर्ग आणखीनच हतबल होत आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळते. परंतु ज्या शेतकऱ्यांचे ५० टक्के क्षेत्राचे नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांनाच मिळते. या पेक्षा कमी नुकसान असणाऱ्या शेतकऱ्यांना काहीच मिळत नाही. त्यामुळे शासनाच्या मदतीपासून हजारो शेतकरी वंचित राहतात. काहीवेळेला पंचनाम्यामध्ये वशीलेबाजी सुरू असते. आपल्या जवळच्या शेतकऱ्याचे किंवा नातलगाचे नाव यादीमध्ये घालतल्याची यापुर्वी अनेक किस्से घडले आहेत.