शहरं
Join us  
Trending Stories
1
विंडिजची 'मसल पॉवर' संपली! रसेलची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून अचानक निवृत्ती, 'या' दिवशी शेवटची मॅच
2
व्वा रं पठ्ठ्या !! मगरीनं अचानक येऊन त्याचं डोकं जबड्यात धरलं, पण धाडसाने वाचवले स्वत:चे प्राण
3
विठुरायाच्या कृपेने अवचितराव पुन्हा स्वगृही! घर सोडून गेले अन् तब्बल २० वर्षांनी परतले मुळगावी...
4
पत्नीला पोटगी देण्यासाठी बेरोजगार बनला ‘चेनस्नॅचर’; नागपुरच्या पाच जबरी चोरीच्या गुन्ह्यांची उकल
5
धक्कादायक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात अंडरविअरच्या इलॅस्टिकने कैद्याने घेतली फाशी
6
२५ लाखांची टेस्ला ६० लाखांना घ्यावी लागतेय, जबाबदार कोण? आदित्य ठाकरेंचा सवाल; म्हणाले, "अडचणी आणल्या नसत्या तर..."
7
VIDEO: घाबरलेली अँकर Live शो सोडून पळाली... स्फोटांनी हादरलं सिरिया; हल्ल्याने उडाली दाणादाण
8
खापरी–गुमगावदरम्यान ऑटोमॅटिक ब्लॉक सिग्नलिंग सिस्टम; मध्य रेल्वेकडून तंत्रज्ञानाची कास
9
कौतुकास्पद! उद्योगांच्या मदतीने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शिकवणार कार्पोरेट प्रशासन
10
'महाराष्ट्र मेरीटाईम समिट २०२५' मुळे राज्याच्या सागरी क्षेत्राला बळकटी मिळेल- नितेश राणे
11
विशेष मुलांचे प्रश्न सोडवण्यासाठी शासन सहकार्य करणार; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची ग्वाही
12
"सोबतचे जड झाले असतील म्हणून..."; CM फडणवीसांनी दिलेल्या ऑफरवर ठाकरेंचे प्रत्युत्तर
13
₹96 च्या IPO वर गुंतवणूकदारांच्या उड्या, 142 पट सब्सक्राइब झाला; GMP ला 43 रुपयांचा फायदा!
14
भयानक!! इस्रायलचा सीरियाच्या संरक्षण मंत्रालयावर मोठा हल्ला; संपूर्ण इमारतीच्या चिंधड्या, पाहा VIDEO
15
₹ 350 वरून थेट ₹19 वर आला हा शेअर, आता लागतंय 10% चं अप्पर सर्किट; करतोय मालामाल
16
“CM फडणवीस रामासारखे चारित्र्यवान, कृष्णासारखे चतूर”; भाजपा आमदारांकडून कौतुकाचा वर्षाव
17
नीलम गोऱ्हेंचा आग्रह अन् ठाकरेंचा नकार; उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे एकाच फ्रेममध्ये, फक्त खुर्चीचे होतं अंतर
18
CM देवेंद्र फडणवीसांच्या ऑफरवर उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले...
19
“वयाच्या १० वर्षापासून RSSशी संबंध, मी पुन्हा येईन, पण कुठून येईन ते विचारू नका”: दानवे
20
Budget Cars: कुटुंबासाठी कमी बजेटमध्ये ७-सीटर कार शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन! 

अवकाळीचा सर्वाधिक फटका फलटणला

By admin | Updated: March 16, 2015 00:15 IST

शासकीय पंचनाम्यातून माहिती उघड : ८७८ शेतकऱ्यांचे झाले नुकसान

फलटण : जिल्ह्यात फेबु्रवारीच्या अखेरीस झालेल्या अवकाळी पाऊस, गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून सर्वाधिक फटका फलटण तालुक्याला बसला असल्याचे शासकीय पंचनाम्यातून स्पष्ट झाले आहे.  गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने एक हजार पस्तीस शेतकऱ्यांच्या १३३.८६ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये ५० टक्क््यांवर काढणीला आलेल्या गव्हाचे सर्वाधिक ७८.०६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यानंतर रब्बी ज्वारीचे ४६.६२ हेक्टर बाधित झाले आहे. हरभऱ्याचे २.९४, फळांचे ४.३९, द्राक्षाचे १.८५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. फलटण तालुक्यात सर्वाधिक ८७८ शेतकऱ्यांचे १११.२० हेक्टर क्षेत्र, तर कऱ्हाड तालुक्यातील १५७ शेतकऱ्यांचे २२.६६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. सातारा, कोरेगाव, खटाव, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावळी, खंडाळा, माण तालुक्यांतही अवकाळीमुळे मोठे नुकसान झाले आहे. परंतु या परिसरातील नुकसानीची टक्केवारी ५० टक्क्यांच्या आत असल्याने या शेतकऱ्यांना मदतीवाचून वंचित राहावे लागणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.  यापूर्वीच्या शासनाच्या काळात कर्जमाफीमध्ये सरसकट शेतकरी पात्र ठरले होते. परंतु यंदा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार की नाही, याची सांशकता आहे. १२०० शेतकऱ्यांची नावे सावकारांच्या कर्जमाफीसाठी कळविण्यात आली होती. असे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिलेल्या अहवालामध्ये नमुद आहे.  सातारा जिल्ह्यातील अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देण्याचा विचार शासनस्तरावर सुरू आहे. शेतकऱ्यांना शासनाने कर्जमाफीचा दिलास दिल्यास शेतकरी वर्ग या धक्क्यातून सावरून आणखी झेप घेईल. फलटण तालुक्यामध्ये रब्बी पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शासनाने केवळ घोषणा करून शेतकऱ्यांच्या तोडांला पाने पुसू नयेत, अशी शेतकऱ्यांची म्हणणे आहे. (वार्ताहर)वशीलेबाजीमुळे मदतीपासून वंचित..!सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पिकांचे नुकसान होत आहे. हाता तोंडाला आलेली पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत नाहीशी होत असल्यामुळे शेतकरीवर्ग आणखीनच हतबल होत आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळते. परंतु ज्या शेतकऱ्यांचे ५० टक्के क्षेत्राचे नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांनाच मिळते. या पेक्षा कमी नुकसान असणाऱ्या शेतकऱ्यांना काहीच मिळत नाही. त्यामुळे शासनाच्या मदतीपासून हजारो शेतकरी वंचित राहतात. काहीवेळेला पंचनाम्यामध्ये वशीलेबाजी सुरू असते. आपल्या जवळच्या शेतकऱ्याचे किंवा नातलगाचे नाव यादीमध्ये घालतल्याची यापुर्वी अनेक किस्से घडले आहेत.