शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

अवकाळीचा सर्वाधिक फटका फलटणला

By admin | Updated: March 16, 2015 00:15 IST

शासकीय पंचनाम्यातून माहिती उघड : ८७८ शेतकऱ्यांचे झाले नुकसान

फलटण : जिल्ह्यात फेबु्रवारीच्या अखेरीस झालेल्या अवकाळी पाऊस, गारपिटीने शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून सर्वाधिक फटका फलटण तालुक्याला बसला असल्याचे शासकीय पंचनाम्यातून स्पष्ट झाले आहे.  गेल्या महिन्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने एक हजार पस्तीस शेतकऱ्यांच्या १३३.८६ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. त्यामध्ये ५० टक्क््यांवर काढणीला आलेल्या गव्हाचे सर्वाधिक ७८.०६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. त्यानंतर रब्बी ज्वारीचे ४६.६२ हेक्टर बाधित झाले आहे. हरभऱ्याचे २.९४, फळांचे ४.३९, द्राक्षाचे १.८५ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. फलटण तालुक्यात सर्वाधिक ८७८ शेतकऱ्यांचे १११.२० हेक्टर क्षेत्र, तर कऱ्हाड तालुक्यातील १५७ शेतकऱ्यांचे २२.६६ हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. सातारा, कोरेगाव, खटाव, पाटण, वाई, महाबळेश्वर, जावळी, खंडाळा, माण तालुक्यांतही अवकाळीमुळे मोठे नुकसान झाले आहे. परंतु या परिसरातील नुकसानीची टक्केवारी ५० टक्क्यांच्या आत असल्याने या शेतकऱ्यांना मदतीवाचून वंचित राहावे लागणार की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.  यापूर्वीच्या शासनाच्या काळात कर्जमाफीमध्ये सरसकट शेतकरी पात्र ठरले होते. परंतु यंदा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार की नाही, याची सांशकता आहे. १२०० शेतकऱ्यांची नावे सावकारांच्या कर्जमाफीसाठी कळविण्यात आली होती. असे जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने दिलेल्या अहवालामध्ये नमुद आहे.  सातारा जिल्ह्यातील अनेक शेतकरी कर्जमाफीपासून वंचित राहिले आहेत. या शेतकऱ्यांनाही कर्जमाफी देण्याचा विचार शासनस्तरावर सुरू आहे. शेतकऱ्यांना शासनाने कर्जमाफीचा दिलास दिल्यास शेतकरी वर्ग या धक्क्यातून सावरून आणखी झेप घेईल. फलटण तालुक्यामध्ये रब्बी पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. शासनाने केवळ घोषणा करून शेतकऱ्यांच्या तोडांला पाने पुसू नयेत, अशी शेतकऱ्यांची म्हणणे आहे. (वार्ताहर)वशीलेबाजीमुळे मदतीपासून वंचित..!सातारा जिल्ह्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पिकांचे नुकसान होत आहे. हाता तोंडाला आलेली पिके शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत नाहीशी होत असल्यामुळे शेतकरीवर्ग आणखीनच हतबल होत आहे. शासनाकडून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळते. परंतु ज्या शेतकऱ्यांचे ५० टक्के क्षेत्राचे नुकसान झाले आहे. अशा शेतकऱ्यांनाच मिळते. या पेक्षा कमी नुकसान असणाऱ्या शेतकऱ्यांना काहीच मिळत नाही. त्यामुळे शासनाच्या मदतीपासून हजारो शेतकरी वंचित राहतात. काहीवेळेला पंचनाम्यामध्ये वशीलेबाजी सुरू असते. आपल्या जवळच्या शेतकऱ्याचे किंवा नातलगाचे नाव यादीमध्ये घालतल्याची यापुर्वी अनेक किस्से घडले आहेत.