शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
4
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
5
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
6
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
7
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
8
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
9
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
10
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
11
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
12
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
13
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
14
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
15
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
16
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
17
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
18
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
19
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
20
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?

महिला लोकशाही दिनाची ‘ऐशी की तैशी’

By admin | Updated: October 26, 2014 23:26 IST

भगिनींनी फिरविली पाठ : वर्षभरात केवळ नऊ तक्रारी

सातारा : महिला लोकशाही दिनाकडे महिलांनीच पाठ फिरविली आहे. राज्यभरातील महिला सघटनांनी आग्रह केल्यानंतर शासनाने महिला लोकशाही दिन सुरू केला. मात्र, सातारा जिल्ह्यातील तक्रारी लक्षात घेता वर्षभरात केवळ नऊच तक्रारी दाखल झाल्या असल्याची माहिती पुढे आली आहे. परिणामी महिला लोकशाही दिनाबाबत महिलांमध्ये जागरुकता करण्यात प्रशासन कमी पडल्याचे चित्र आहे. महिलांना त्यांच्या वैयक्तिक व हक्कांसंदर्भातील तक्रारी मांडण्यासाठी त्यांना सभामंचक मिळाल्यानंतरही त्या मागे का पडत आहेत, यावर जिल्हा प्रशासनाने आत्मचिंतन करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया आता उमटत आहे.विविध सामाजिक सेवाभावी संस्था तसेच राज्यभरातील महिला संघटनांनी स्वतंत्र महिला दिनाची मागणी केल्यांनतर शासनाने जून २०१३ पासून महिलांसाठी स्वतंत्र लोकशाही दिन सुरू केला. महिलांच्या तक्रारी राहू नयेत, त्यांना योग्य न्याय मिळावा, समस्याग्रस्त महिलांना त्यांचे प्रश्न मांडता यावेत, या पाठीमागचा प्रमुख उद्देश होता. शासनानेही लोकशाही दिनाच्या माध्यमातून महिलांसाठी स्वतंत्र सभामंचक उपस्थित करून दिल्यामुळे महिलांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. याच्या अंमलबजावणीची जबाबदारी महिला व बालकल्याण विभागाकडे सोपविली. त्यानुसार प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी महिला लोकशाही दिन होऊ लागला.वर्षभरात दहा महिला लोकशाही दिन झाले. त्यातून केवळ नऊ महिलांनी तक्रार अर्ज केले आहेत. महिलांना स्वतंत्रपणे आपल्या समस्या मांडता याव्यात, या उद्देशाने सुरू केलेल्या लोकशाही दिनाकडेच महिलांनी पाठ फिरविल्यामुळे प्रशासनही विचारात पडले आहे. मुळात महिलांसाठी स्वतंत्र लोकशाही दिन घेऊनही त्यामध्ये सहभागी होऊन आपल्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यास महिला पुढे येत नसल्याचे चित्र आहे. एरव्ही लोकशाही दिनास कधी-कधी अधिकारी फिरकत नसतात, ही बाब खरी असली तरी महिला लोकशाही दिनास सहभागी महिलाच येत नसल्याचे चित्र आहे. यासंदर्भात शासन महिला लोकशाही दिनाबाबत जागृती करण्यास कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागापर्यंत या कार्यक्रमाची कल्पनाच पोहोचलेली नाही. प्रभावी जागृतीचा अभाव हे एकमेव कारण महिला लोकशाही दिन अयशस्वी होण्यामागचे आहे. किमान या वर्षभरात तरी याबाबत जागृती करण्यास जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करण्याची मागणी पुढे आली आहे. (प्रतिनिधी)आचारसंहितेचा फटकामहिलांना या लोकशाही दिनात सहभागी व्हायचे असेल तर आपली लिखित तक्रार दोन प्रतीत महिला लोकशाही दिनापूर्वी किमान पंधरा दिवस आधी जिल्हास्तरावर महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावी लागणार आहे. त्याचबरोब प्रत्यक्ष लोकशाही दिनादिवशी मूळ अर्ज व कागदपत्रांसह उपस्थित राहणे आवश्यक आहे. दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणूक, ग्रामपंचायत निवडणूक आणि पुणे विभागीय पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने काही महिने लोकशाही दिन झालाच नाही. यानंतर विधानसभा निवडणूका आल्या त्या कालावधीत तर लोकशाही दिन झालाच नाही.