शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

महिला लोकशाही दिनाची ‘ऐशी की तैशी’

By admin | Updated: October 26, 2014 23:26 IST

भगिनींनी फिरविली पाठ : वर्षभरात केवळ नऊ तक्रारी

सातारा : महिला लोकशाही दिनाकडे महिलांनीच पाठ फिरविली आहे. राज्यभरातील महिला सघटनांनी आग्रह केल्यानंतर शासनाने महिला लोकशाही दिन सुरू केला. मात्र, सातारा जिल्ह्यातील तक्रारी लक्षात घेता वर्षभरात केवळ नऊच तक्रारी दाखल झाल्या असल्याची माहिती पुढे आली आहे. परिणामी महिला लोकशाही दिनाबाबत महिलांमध्ये जागरुकता करण्यात प्रशासन कमी पडल्याचे चित्र आहे. महिलांना त्यांच्या वैयक्तिक व हक्कांसंदर्भातील तक्रारी मांडण्यासाठी त्यांना सभामंचक मिळाल्यानंतरही त्या मागे का पडत आहेत, यावर जिल्हा प्रशासनाने आत्मचिंतन करण्याची गरज असल्याची प्रतिक्रिया आता उमटत आहे.विविध सामाजिक सेवाभावी संस्था तसेच राज्यभरातील महिला संघटनांनी स्वतंत्र महिला दिनाची मागणी केल्यांनतर शासनाने जून २०१३ पासून महिलांसाठी स्वतंत्र लोकशाही दिन सुरू केला. महिलांच्या तक्रारी राहू नयेत, त्यांना योग्य न्याय मिळावा, समस्याग्रस्त महिलांना त्यांचे प्रश्न मांडता यावेत, या पाठीमागचा प्रमुख उद्देश होता. शासनानेही लोकशाही दिनाच्या माध्यमातून महिलांसाठी स्वतंत्र सभामंचक उपस्थित करून दिल्यामुळे महिलांना न्याय मिळेल, अशी अपेक्षा होती. याच्या अंमलबजावणीची जबाबदारी महिला व बालकल्याण विभागाकडे सोपविली. त्यानुसार प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी महिला लोकशाही दिन होऊ लागला.वर्षभरात दहा महिला लोकशाही दिन झाले. त्यातून केवळ नऊ महिलांनी तक्रार अर्ज केले आहेत. महिलांना स्वतंत्रपणे आपल्या समस्या मांडता याव्यात, या उद्देशाने सुरू केलेल्या लोकशाही दिनाकडेच महिलांनी पाठ फिरविल्यामुळे प्रशासनही विचारात पडले आहे. मुळात महिलांसाठी स्वतंत्र लोकशाही दिन घेऊनही त्यामध्ये सहभागी होऊन आपल्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यास महिला पुढे येत नसल्याचे चित्र आहे. एरव्ही लोकशाही दिनास कधी-कधी अधिकारी फिरकत नसतात, ही बाब खरी असली तरी महिला लोकशाही दिनास सहभागी महिलाच येत नसल्याचे चित्र आहे. यासंदर्भात शासन महिला लोकशाही दिनाबाबत जागृती करण्यास कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. ग्रामीण भागापर्यंत या कार्यक्रमाची कल्पनाच पोहोचलेली नाही. प्रभावी जागृतीचा अभाव हे एकमेव कारण महिला लोकशाही दिन अयशस्वी होण्यामागचे आहे. किमान या वर्षभरात तरी याबाबत जागृती करण्यास जिल्हा प्रशासनाने प्रयत्न करण्याची मागणी पुढे आली आहे. (प्रतिनिधी)आचारसंहितेचा फटकामहिलांना या लोकशाही दिनात सहभागी व्हायचे असेल तर आपली लिखित तक्रार दोन प्रतीत महिला लोकशाही दिनापूर्वी किमान पंधरा दिवस आधी जिल्हास्तरावर महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे दाखल करावी लागणार आहे. त्याचबरोब प्रत्यक्ष लोकशाही दिनादिवशी मूळ अर्ज व कागदपत्रांसह उपस्थित राहणे आवश्यक आहे. दरम्यानच्या काळात लोकसभा निवडणूक, ग्रामपंचायत निवडणूक आणि पुणे विभागीय पदवीधर तसेच शिक्षक मतदारसंघ निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने काही महिने लोकशाही दिन झालाच नाही. यानंतर विधानसभा निवडणूका आल्या त्या कालावधीत तर लोकशाही दिन झालाच नाही.