शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

भाऊबंदकीत बॅँकेचा ‘माण’करी कोण-कोण?

By admin | Updated: April 10, 2015 23:33 IST

राजकीय वातावरण तापले : आताही सदाशिवराव पोळांबरोबर जयकुमार गोरेंची होणार टक्कर...

नितीन काळेल - सातारा  -जिल्हा बँक निवडणुकीत राष्ट्रवादीच्या विरोधात पॅनेल उतरविण्याचा निर्णय आता घेतला असला तरी दोन महिन्यांपूर्वी माण तालुका मला सेफ आहे, आता खटावमधून जिल्हा बँक निवडणुकीत उतरणार, अशी गगनभेदी घोषणा करणारे आमदार जयकुमार गोरे यांनी तलवार न परजताच म्यानातच ठेवली आहे. मागील वेळेप्रमाणेच त्यांनी यंदाही माणमधून सोसायटी मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याविरोधात मागील उमेदवार व माजी आमदार सदाशिवराव पोळ हेच असणार आहेत. त्यामुळे यंदा तरी गोरेंना बँकेचे दार खुले होणार का, असा प्रश्न आहे.सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वीच माण तालुक्यातील इच्छुक खऱ्या अर्थाने कामाला लागले होते. यावर्षीच्या निवडणुकीचे वैशिष्ट म्हणजे माण तालुक्यात निवडणुकीअगोदर बरेच रामायण व महाभारत घडले. यामुळे अनेकांना रक्त सांडावे लागले तसेच जेलची हवाही खावी लागली आहे. त्यामुळे मागील जिल्हा बँक निवडणूक काळात माण तालुका गाजला तशीच यावेळीही परंपरा राखली गेली. गेल्यावर्षी माजी आमदार पोळ व जयकुमार गोरे यांच्यात संघर्ष झाला; पण या वेळचे निवडणुकीतील वातावरण हे सब कुछ दोघा भावांत होते. आमदार गोरे व पंचायत समिती सदस्य शेखर गोरे यांनीच विविध गावांच्या सोसायट्या ठरावात आपलेच घोडे पुढे आणले. किंगमेकर समजले जाणारे सदाशिवराव पोळ या ठरावाच्या निमित्ताने कुठेच पुढे आले नाहीत. शेखर गोरे आणि पोळ यांची युती समोर आली. सोसायटी मतदारसंघातून आमदार पोळ की शेखर गोरे उभे राहणार, याचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. पोळ यांनी अर्ज भरला आहे. शेखर गोरे यांनी इतर मागासवर्ग प्रवर्गातून अर्ज भरला आहे. त्यामुळे सोसायटी मतदारसंघातून पोळ हेच उमेदवार असणार आहेत. त्यांच्याविरोधात आमदार जयकुमार गोरे असणार आहेत. यावेळी निवडणुकीसाठी माण तालुक्यातील सोसायटी मतदारसंघातून आमदार गोरे, पोळ यांच्याबरोबरच मनोजकुमार पोळ, रामचंद्र माने, युवराज बनगर व संजय जगताप यांनी अर्ज दाखल केले आहेत. यामधील आमदार गोरे आणि सदाशिवराव पोळ या दोघांचाच अर्ज अंतिम असणार आहे. इतर सर्वजण अर्ज मागे घेणार हे निश्चित आहे. त्यामुळे लढत होणार आहे ती आमदार गोरे आणि पोळ यांच्यातच.बँकेची निवडणूक जाहीर होण्यापूर्वी आमदार गोरे यांनी माण तालुका मला सेफ आहे. खटावमधून निवडणूक लढणार, अशी घोषणा केली होती; पण त्या घोषणेला कुठे तरी सुरूंग लागला आहे. तलवार न उगारताच त्यांना ती म्यानातच ठेवावी लागली आहे. आताची निवडणूक मागीलप्रमाणेच सदाशिवराव पोळ व आमदार गोरे यांच्यात होणार जवळपास स्पष्ट आहे. मागीलवेळी पोळ यांनी आमदार गोरे यांना पराभव पाहायला लावला होता. यंदाही पोळ पुन्हा नव्या जोमाने उतरणार आहेत. त्यांना विजयाचा विश्वास आहे. दुसरीकडे आमदार गोरे यांनी जोरदार तयारी केली आहे. मागील पराभवाचा वचपा काढण्यासाठी त्यांनी डावपेच आखण्यास प्रारंभ केला आहे. या निवडणुकीत कोण जिंकणार हे मतमोजणीनंतरच स्पष्ट होईल. सध्यातरी माणमधील राजकीय वातावरण पूर्णपणे तापले आहे.पोळ प्रथमच राहिले पडद्याआड...माण तालुक्याचा राजकीय इतिहास लिहायचा झाला तर माजी आमदार सदाशिवराव पोळ यांना कदापिही डावलता येणार नाही. दहा-वीस नव्हे तर तब्बल ४० वर्षे तालुक्यावर त्यांनी हुकूमत ठेवली. अलीकडील काही वर्षांत त्यांच्या राजकीय कारकिर्दीला ओहोटी लागली. जिल्हा बँक निवडणुकीसाठी सोसायटी ठरावाच्या निमित्ताने पोळ कुठेही समोर आले नाहीत. पडद्याआडून त्यांनी सारी सूत्रे हलविली. प्रथमच पोळ यांनी अशी भूमिका वठविल्याचे यावेळी दिसून आल्याचे राजकारणातील जाणकार सांगतात.तात्यांची इच्छा लपून राहिली नाही...माण तालुक्यातील सोसायटी मतदारसंघातून आमदार गोरे यांच्याविरोधात पोळ तात्या की शेखर गोरे असणार, असा संभ्रम होता. दोघेही इच्छुक होते. त्यातच गेली ४३ वर्षे संचालक असणारे सदाशिवराव पोळ यांची इच्छा मात्र कधीच लपून राहिली नव्हती. प्रत्येकवेळी मी इच्छूक आहे, असे ते सांगायचे. त्यामुळे तात्या पुन्हा एकदा मैदानात असणार, हे जवळपास सिद्ध झाले आहे.