शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

स्ट्रॉबेरीला हवामान पोषक; पण ‘अवकाळी’ घातक

By admin | Updated: January 2, 2015 00:07 IST

शेतकऱ्यांमध्ये चिंता : दहा वर्षांत पहिल्यांदाच वातावरणात बदल; नगदी पिकावर उत्पादकांचे बारकाईने लक्ष

सातारा : महाबळेश्वरची ओळख केवळ थंड हवेचं ठिकाण राहिली नसून ते एक ‘स्ट्रॉबेरी लँड’ म्हणूनही ओळखले जाते. स्ट्रॉबेरी हे महाबळेश्वरचे मुख्य पीक. या फळासाठी येथील हवामान देखील अनुकूल आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून हवामानात होत असलेल्या सततच्या बदलामुळे ‘स्ट्रॉबेरी’वर अवकाळी संकट कोसळण्याची भीती निर्माण झाली असून, स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. गेल्या दहा वर्षांमध्ये शेतकरी पहिल्यांदाच हिवाळ्यात अशा प्रकारच्या वातावरणाचा अनुभव घेत आहेत.गेली कित्येक वर्षे येथील शेतकरी स्ट्रॉबेरीचा व्यवसाय करीत आहे. देशात स्ट्रॉबेरीचे सर्वाधिक ८७ टक्के उत्पादन एकट्या महाबळेश्वरमधून घेतले जाते. आज महाबळेश्वर तालुक्यात ४० गावांतील सुमारे दीड ते दोन हजार शेतकरी स्ट्रॉबेरीची शेती करतात. स्ट्रॉबेरी या फळासाठी आवश्यक असणारी थंड हवा, लाल हलकी माती, समुद्र सपाटीपासून ४ हजार ३०० फूट उंची आदी गुणधर्म याठिकाणी आढळतात. यामुळे स्ट्रॉबेरी येथील मुख्य पीक आहे.‘स्ट्रॉबेरी’ हे थंड हवेत येणारे फळ आहे. मात्र, वातावरणात बदल झाल्यास याचा पिकावरही परिणाम होतो. सध्या वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलामुळे या पिकाला धोका निर्माण झाला आहे. थंडीचे प्रमाण अधिक असल्याने व काही ठिकाणी रोपांवरील हिमकणांचे दवबिंदूत रूपांतर होत असल्याने पिके कुजण्याचे प्रकार घडत आहे. याचा शेतकऱ्यांना मोठा फटका बसत आहे. ढगाळ वातावरणाबरोबरच पाऊस पडण्याची चिन्हे असल्याने शेतकऱ्यांपुढे मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. हिवाळ्यामध्ये गेल्या अनेक वर्षात प्रथमच अशा प्रकारचे वातावरण निर्माण झाले असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)वातावरणातील बदलाचे गणीत सुटेनामहाबळेश्वरमधील स्ट्रॉबेरी उत्पादक शेतकऱ्यांना गेल्या दहा-पंधरा वर्षांत हिवाळ्यामध्ये पावसासारखी वातावरणनिर्मिती या अगोदर कधीच पाहावयास मिळाली नाही. स्ट्रॉबेरीसाठी थंड हवामान पोषक असल्यामुळे प्रामुख्याने हिवाळा ऋतूत येथे स्ट्रॉबेरीची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मात्र, सध्या वातावरणात होत असलेल्या ससतच्या बदलाचे गणित शेतकऱ्यांना देखील सुटेनासे झाले आहे. ‘अवकाळी पाऊस नको’ एवढीच इच्छा येथील शेतकरी व्यक्त करीत आहे.पाऊस पडला तर स्ट्रॉबेरीचे नुकसान होणार आहे. सध्या रोपांना फुले आली आहेत. पावसामुळे फुले झडून जातात. तर फळांवरही डाग पडतात. त्यामुळे उत्पादन घटते व मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागते. याबरोबरच बाजारपेठेतही स्ट्रॉबेरीची मागणी कमी होते.- श्रीपती भिलारेस्ट्रॉबेरी उत्पादक शेतकरी, अवकाळी