शहरं
Join us  
Trending Stories
1
India Pakistan: आणखी एक घाव! भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या चौक्या आणि दहशतवादी लॉन्चिंग पॅड्स उडवले, व्हिडीओ बघा
2
पाकिस्तानकडून भारताच्या नागरी वस्त्यांवर भ्याड हल्ले; घरांचे नुकसान, काही जखमी
3
"मसूद अजहर-हाफिज सईद बिनधास्त फिरत आहेत...", 'गोपी बहू'नं पाकिस्तानला दाखवला आरसा, म्हणाली - युद्ध व्हायलाच पाहिजे...
4
रोहित शर्मानंतर विराट कोहलीचाही कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय? BCCI ला दिली माहिती
5
Operation Sindoor Live Updates: अमृतसरवरील ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न भारताने उधळला
6
इंटरनॅशनल मॉनेटरी फंड की 'टेररिस्ट फंड'? पाकिस्तानला IMF च्या फंडिंगवर भडकल्या प्रियंका चतुर्वेदी
7
India Pakistan Tension : उडवून टाकलं! भारत-पाक हल्ल्यादरम्यान अमृतसरमध्ये पाडले ड्रोन
8
Breaking: पाकिस्तानकडून दिल्लीवर फतेह २ बॅलेस्टीक मिसाईल हल्ल्याचा प्रयत्न; हरियाणाच्या सिरसामध्ये हवेतच नष्ट करण्यात यश
9
India Pakistan: पाकिस्तानच्या हल्ल्यात जम्मूमध्ये आयुक्तांचा मृत्यू, अब्दुल्ला म्हणाले, हादरवून टाकणारी बातमी
10
'बुनयान उल मरसूस', तीन एअरबेसवर झालेल्या स्फोटांनंतर पाकिस्तानने भारताविरुद्ध कारवाई सुरू करण्याची घोषणा केली
11
India Pakistan Tension Update: भारताने पाकिस्तानाच्या 'या' हवाई तळांवर डागल्या ६ बॅलेस्टिक मिसाईल्स, मोठे स्फोट
12
आजचे राशीभविष्य, १० मे २०२५: अनेक क्षेत्रात यश व कीर्ती लाभेल, आर्थिक लाभ होईल
13
१४ मे पर्यंत ३२ विमानतळ बंद; पाकिस्तानसोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय
14
पाकिस्तानवर काऊंटर अ‍ॅटॅक सुरू! रावळपिंडी सह तीन एअरबेसवर हल्ला, इस्लामाबाद, लाहोरमध्ये मोठे स्फोट
15
संपादकीय: बीसीसीआयचे चुकलेच! खेळाडूंना दंडांवर काळ्या फिती बांधायला लावली, स्पर्धा रेटली...
16
प्रवासी विमानांना ढाल बनवतोय पाक; कर्नल सोफियांनी पुढे आणला पाकचा चेहरा
17
आकाशातून भारताचे हल्ले होत असतानाच पाकिस्तानात भूकंप; पाकिस्तानी जागच्याजागी हादरले...
18
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
19
महाराष्ट्रात अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; प्रत्येक जिल्ह्यात ‘वॉररूम’
20
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...

धरणातील हक्काच्या पाण्याचा एक थेंबही सोडू देणार नाही

By admin | Updated: April 17, 2015 00:03 IST

भारत पाटणकर : २२ एप्रिल रोजी अनोखे आंदोलन करण्याचा इशारा

सातारा : ‘कारखानदार, बड्या शेतकऱ्यांसाठी धरणातील पाणी सोडून दुष्काळग्रस्त व धरणग्रस्तांना वंचित ठेवण्याचा डाव आता चालू देणार नाही. येत्या काही दिवसांत धरणग्रस्तांच्या प्रश्नांबाबत शासनाने निर्णय घेतला नाही, तर दि. २२ एप्रिल रोजी कुठल्याही धरणातील पाणी सोडू देणार नाही,’ असा इशारा धरणग्रस्तांचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी पत्रकार परिषदेत दिला. तसेच याचदिवशी पाच जिल्ह्यांतील जिल्हाधिकारी कार्यालयांपुढे आंदोलन सुरू ठेवून धरणांवर तसेच अभयारण्यांच्या प्रवेशाद्वारापुढे आंदोलन छेडणार असल्याचेही डॉ. पाटणकर यांनी या पत्रकार परिषदेत बोलताना सांगितले.धरणग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण करावे, पुनर्वसित जमिनींचे पूर्णपणे वाटप करण्यात यावे, पाण्याचे समन्यायी वाटप करावे, आदी मागण्यांसाठी धरणग्रस्त काही दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयापुढे आंदोलनाला बसले आहेत. साताऱ्याप्रमाणेच सोलापूर, सांगली, रायगड, लातूर, औरंगाबाद याठिकाणीही आंदोलन सुरू आहे. डॉ. पाटणकर यांनी गुरुवारी विभागीय आयुक्त चोक्कलिंगम यांची भेट घेऊन विविध प्रश्नांवर सुमारे अडीच तास चर्चा केली. तसेच पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी तेथील ठिय्या आंदोलनाला बसलेल्या धरणग्रस्तांची भेट घेऊन लवकर मार्ग काढण्याचा शब्द दिला आहे. सोलापूर येथे आमदार भारत भालके, बबनराव शिंदे यांनीही धरणग्रस्तांशी चर्चा केली. शासन आमच्याशी चर्चा करण्यासाठी उत्सुक असल्याचे यातून स्पष्ट होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावर आहेत. ते दि. १८ एप्रिल रोजी येत आहेत. त्यानंतर बैठकीचा दिवस ठरविण्यात येईल. मात्र, तोपर्यंत आम्ही शांत राहणार नाही. आम्हाला पूर्वीच्या सरकारनेही आश्वासने देऊन फसविले आहे. आता आम्ही भूलथापांना फसणार नाही. २२ चे आंदोलन तीव्रतेने केले जाईल.’ (प्रतिनिधी)आंदोलन स्थगित केल्यास चुकीचा संदेश जाईल...डॉ. पाटणकर यांनी याबाबत पत्रकारांना माहिती दिली. ते म्हणाले, ‘सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी धरणग्रस्तांच्या प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी बैठक लावण्याचे आश्वासन सोमवारी धरणग्रस्तांच्या शिष्टमंडळाला दिले होते. त्यांनी दूरध्वनीवरून त्याबाबत चर्चा केली. तोपर्यंत आंदोलन स्थगित करण्याची सूचना केली होती; पण निर्णय न होता आंदोलन स्थगित केल्यास चुकीचा संदेश जाऊ शकतो, त्यामुळे मुख्यमंत्र्यांशी चर्चा होत असतानाही आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे आम्ही त्यांना स्पष्ट केले आहे.