शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
4
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
5
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
6
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
7
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
8
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
9
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
10
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
11
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
12
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
13
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
14
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
15
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
20
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे

दोन किलोमीटरमध्ये प्रत्येक झाडावर पक्ष्यांसाठी जलपात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2021 04:34 IST

तळमावले : उन्हाळ्यात अनेक पक्ष्यांचे अन्न, पाण्याविना हाल होतात. पक्ष्यांना आपला जीव गमवावा लागतो. त्यावर उपाय म्हणून पाटण तालुक्यातील ...

तळमावले : उन्हाळ्यात अनेक पक्ष्यांचे अन्न, पाण्याविना हाल होतात. पक्ष्यांना आपला जीव गमवावा लागतो. त्यावर उपाय म्हणून पाटण तालुक्यातील कुंभारगाव येथील धरणीमता फाऊंडेशनकडून पक्ष्यांसाठी पाणी पिण्यासाठी जलपात्र आणि खाण्यासाठी अन्नपात्र तयार करण्यात आले आहे. सुमारे दोन किलोमीटर परिसरात वेगवेगळ्या झाडांवर ती ठेवण्यात आली आहेत. त्यामध्ये दररोज पाणी आणि खाण्यासाठी बाजरी, गहू, तांदूळ, मका, ज्वारी असे विविध प्रकारचे धान्य ठेवले जाते.

सध्याच्या वाढत्या प्रदूषणामुळे आणि वातावरणातील आमूलाग्र बदलामुळे उन्हाळा हा अतिशय तीव्रतेने जाणवू लागला आहे. याच्या झळा जशा माणसाला बसत आहेत त्याचप्रमाणे वन्य जीवांनाही जाणवत आहेत. पक्षी हा निसर्ग रचनेतील एक अविभाज्य आणि मूलभूत घटक आहे. निसर्ग साखळी अभेद्य राहण्यासाठी पक्षी, कीटक यांचे अस्तित्व अतिशय महत्त्वाचे असते. कारण सर्वात जास्त वृक्षारोपणाचे आणि निसर्गाचा समतोल राखण्याचे काम पक्षीच करतात. मात्र, सध्या मानवी चुकांमुळे आणि अतिक्रमणांमुळे पक्षी नामशेष होतील की काय, अशी भीती निर्माण झालेली आहे. माणसाने पक्ष्यांचा जास्तीत जास्त वावर असलेले पाणवठे तसेच नैसर्गिक जलस्रोतांवर अतिक्रमण केलेले आहे. त्यामुळे पक्ष्यांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत असून पक्ष्यांची ही भटकंती थांबविण्यासाठी कुंभारगावातील धरणीमाता फाऊंडेशन सरसावले आहे.

पक्ष्यांची पाणी आणि अन्नासाठी उन्हाळ्यात होणारी भटकंती थांबावी, यासाठी फाऊंडेशनने जलपात्र आणि अन्नपात्र तयार करण्याचा निर्णय घेतला. त्याप्रमाणे ही पात्र तयारही करण्यात आली. त्यानंतर कुंभारगाव परिसरातील सुमारे दोन किलोमीटर अंतरातील वेगवेगळ्या झाडांवर ही पात्र ठेवण्यात आली. त्या पात्रांमध्ये अन्न आणि पाणी ठेवण्याची जबाबदारी फाऊंडेशनच्या प्रत्येक सदस्याने स्वीकारली आहे. दरवर्षी उन्हाळ्यात हा उपक्रम राबविण्याचा संकल्प फाऊंडेशनने केला आहे.

- चौकट

पाखरांचा चिवचिवाट वाढला

एरव्ही गावानजीकच्या झाडांवर पक्ष्यांचे क्वचित दर्शन व्हायचे. पक्षी अन्न आणि पाण्याच्या शोधात इतरत्र भटकत रहायचे. मात्र, सध्या धरणीमाता फाऊंडेशनने गावानजीक दोन किलोमीटर परिसरातील झाडांवर जलपात्र आणि अन्नपात्र ठेवल्यामुळे या झाडांवर पक्ष्यांचे थवेच्या थवे दिसून येत आहेत. या पक्ष्यांच्या चिवचिवाटाने परिसर बहरून जात आहे.

- कोट

धरणीमाता फाउंडेशन स्थापन करण्यामागे ‘वन्य जीव वाचवूया, निसर्गावर प्रेम करूया’ हा उद्देश आहे. उद्देशाप्रमाणेच फाऊंडेशनचे कार्य सुरू आहे. उन्हाळ्यात पक्ष्यांचे होणारे हाल पाहवत नाहीत. त्यामुळे त्यांचे कष्ट कमी करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. गावोगावी अशी चळवळ निर्माण होणे गरजेचे आहे.

- सतीश वाघ

अध्यक्ष, धरणीमाता फाऊंडेशन

फोटो : २१केआरडी०१

कॅप्शन : कुंभारगाव, ता. पाटण येथील धरणीमाता फाऊंडेशनच्यावतीने पक्ष्यांसाठी जलपात्र व अन्नपात्र तयार करण्यात आली असून ती वेगवेगळ्या झाडांवर ठेवण्यात आली आहेत.