शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

कऱ्हाड तालुक्यात लसीकरण पुन्हा ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:39 IST

कऱ्हाड तालुक्यात कोरोना संक्रमणाचा वेग वाढला आहे. त्यामुळे धास्ती वाढली असून, संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण गतीने होणे गरजेचे आहे. ...

कऱ्हाड तालुक्यात कोरोना संक्रमणाचा वेग वाढला आहे. त्यामुळे धास्ती वाढली असून, संक्रमणाची साखळी तोडण्यासाठी लसीकरण गतीने होणे गरजेचे आहे. मात्र, लसींचा पुरेसा पुरवठा होत नसल्यामुळे परिस्थिती चिंताजनक बनली आहे. सुरुवातीला लसीकरणास नागरिकांचा प्रतिसाद मिळत नव्हता. लस उपलब्ध असतानाही नागरिक केंद्राकडे फिरकत नव्हते. त्यामुळे केंद्रावर शुकशुकाट जाणवायचा. ६० वर्षांपुढील नागरिकांना लस देताना ही परिस्थिती पाहायला मिळत होती. मात्र, त्यानंतर नागरिकांचा प्रतिसाद वाढत गेला. केंद्रावर मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या रांगा लागत होत्या. गत काही दिवसांपासून तर लसीसाठी वादावादीचे प्रकारही घडत आहेत. नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना, लस मात्र पुरेशा प्रमाणात उपलब्ध होत नाही. लसीचे ठरावीकच डोस उपलब्ध होत आहेत. त्यामुळे केंद्रनिहाय त्याचे वितरण करतानाही आरोग्य विभागाला कसरत करावी लागत आहे.

सोमवारपासून तर तालुक्यातील लसीकरण पूर्णपणे बंद झाले आहे. लसच उपलब्ध नसल्यामुळे सर्व केंद्र बंद ठेवण्यात आली आहेत. नागरिक केंद्रावर हेलपाटे घालतात. मात्र, केंद्राबाहेर लावलेला लस संपल्याचा फलक पाहून त्यांना माघारी फिरावे लागते. लस कधी उपलब्ध होणार, याबाबतही आरोग्य विभाग निश्चितपणे सांगू शकत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

फोटो : १८केआरडी०१

कॅप्शन : कऱ्हाडच्या उपजिल्हा रुग्णालयातील लसीकरण केंद्राबाहेर लस संपल्याचा फलक लावण्यात आला आहे.