शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
2
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
3
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच सारं काही २४ कॅरेट सोन्यांने बनवलेलं...
4
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
5
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
6
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
7
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
8
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...
9
Hero Motors चा IPO येतोय! कंपनीचा बिझनेस पाहून तुम्हीही व्हाल थक्क! काय आहे भविष्यातील प्लॅन?
10
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न, ताफ्यावर फेकली बाटली, बाटलीत होतं... 
11
चातुर्मास कधीपासून सुरू होणार? व्रत-वैकल्ये, सण-उत्सवांची रेलचेल; पाहा, महात्म्य अन् मान्यता
12
मी कुठंही असो.. तो मला शोधतोच! 'त्या' चर्चेवर पहिल्यांदाच व्यक्त झाली काव्या मारन
13
‘सासरा मालीश करायला लावायचा, पती नेत्यांसोबत झोपायला पाठवायचा’, पीडितेच्या आरोपांनी खळबळ
14
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
15
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
16
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
17
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
18
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
19
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
20
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  

उदयनराजेंच्या दबावतंत्राने राष्ट्रवादी घायाळ

By admin | Updated: September 21, 2014 00:29 IST

जिल्हा परिषद : उपाध्यक्षपदावर राहिले ठाम; आज होणार निर्णय

सातारा : जिल्हा परिषद अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडीत राष्ट्रवादीचेच खासदार असलेल्या उदयनराजे भोसले यांनी टाकलेल्या दबावतंत्रामुळे राष्ट्रवादीच घायाळ झाली आणि नेत्यांना आपला निर्णय पुढे ढकलावा लागला. अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा कालावधी सव्वा वर्षांचा केला असलातरी पहिल्या टप्प्यात उपाध्यक्षपद माझ्या कार्यकर्त्यालाच हवे, असे सांगत उदयनराजेंनी राष्ट्रवादीपुढे मोठा पेच निर्माण केला. दरम्यान, याच बैठकीत पक्षशिस्त, पक्षाची चौकट या अनुषंगाने रामराजे यांनी भाष्य केले.सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष निवड रविवार, दि. २१ रोजी होत आहे. त्यापार्श्वभूमीवर नाव अंतिम करण्यासाठी शनिवारी राष्ट्रवादी भवनात खासदार, आमदारांची बैठक झाली. या बैठकीला पालकमंत्री शशिकांत शिंदे, नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले, आ. मकरंद पाटील, आ. प्रभाकर घार्गे, आ. विक्रमसिंह पाटणकर, आ. बाळासाहेब पाटील, माजी आ. सदाशिवराव पोळ, जिल्हाध्यक्ष सुनील माने उपस्थित होते.राष्ट्रवादी भवनात जिल्हाध्यक्षांच्या दालनात झालेल्या या बैठकीला अन्य पदाधिकाऱ्यांना मज्जाव करण्यात आला होता. मंत्री शिंदे आणि रामराजेंनी सर्व आमदारांची मते जाणून घेतली. प्रत्येकांनी केलेली मागणी लक्षात घेता ती पूर्ण होणे अशक्य असल्यामुळे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सभापती पदांचा कालावधी सव्वा वर्षांचा राहिल, असे जाहीर केले. परिणामी यामुळे बारा लोकांना संधी मिळेल, असे सांगण्यात आले.उदयनराजेंनी आक्रमक होत रवी साळुंखे यांना उपाध्यक्षपद देण्याची मागणी केली. भले सव्वा वर्षाचा प्रस्ताव मला मान्य असला तरी पहिल्यांदा संधी ही साळुंखेंनाच मिळाली पाहिजे, असे ठामपणे मंत्री शिंदे आणि रामराजे यांना सांगितले. ‘जर नाही झाले तर मग मी आहेच...’ असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. उदयनराजे यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे उपस्थितांमध्येही अस्वस्थता पसरली. यानंतर मंत्री शिदे आणि रामराजेंनी यानंतर अन्य आमदारांची भूमिका ऐकून घेतली. आ. मकरंद पाटील यांनी तर अध्यक्षपदी आनंदराव शेळके-पाटील आणि उपाध्यक्षपदी बाळासाहेब भिलारे यांना संधी देण्याची मागणी केली. यावेळी त्यांनी मतदारसंघनिहाय हा निकष न ठेवता तालुका निकष ठेवावा, अशीही मागणी केली.माजी आमदार सदाशिवराव पोळ यांनी माणला अजूनही अध्यक्षपद मिळाले नसल्याचे सांगत यावेळी प्राधान्याने विचार करावा, अशी मागणी केली. याचवेळी पोळ यांनी अध्यक्षपद यावेळी नाही मिळाले तर लोणार समाजाने विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला मतदान न करण्याची शपथ घेतल्याची माहिती दिली. आ. विक्रमसिंह पाटणकर यांनीही आपल्या मागणीचा विचार करत संजय देसाई यांना पुन्हा सभापतिपद देण्याची विनंती मंत्री शिंदे आणि रामराजे यांच्याकडे केली. आ. प्रभाकर घार्गे आणि आ. बाळासाहेब पाटील यांनीही त्यांच्या उमेदवारांची नावे सुचविली. (प्रतिनिधी)